शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ग्रामपंचायतींमधील विषय समित्या नामधारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:14 IST

अमरावती : गावाच्या विकासात लोकांच्या निर्णयाचा सहभाग असावा, या उद्देशाने ग्रामपंचायत सदस्यांच्या विविध विषय समित्या कार्यान्वित केल्या आहेत. ...

अमरावती : गावाच्या विकासात लोकांच्या निर्णयाचा सहभाग असावा, या उद्देशाने ग्रामपंचायत सदस्यांच्या विविध विषय समित्या कार्यान्वित केल्या आहेत. परंतु, काही अपवाद सोडला तर बहुतांश समित्या स्थापन झालेल्या नाहीत. याकडे शासन व प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायतला मिळालेल्या अधिकारांबाबत लोकनियुक्त विरोधी प्रतिनिधी म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कार्याबद्दल उदासीन असतात. त्यासाठी शासनाकडून वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून त्यांच्या कार्याची जाणीव करण्याची कामे करत होती. परंतु, अलीकडे तसे प्रशिक्षण शिबिरे बंद झाली आहेत. गावातील नागरिकांची जबाबदारी आणि विश्वासातील संस्था म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विविध जबाबदाऱ्या व अधिकार देण्यात आले आहेत. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या विविध समित्या स्थापन करून त्यांची कार्य निश्चित केली आहेत. त्यात बांधकाम समिती, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, ग्राम आरोग्य समिती, सामाजिक अंकेक्षण समिती, लेखापरीक्षण, बालहक्क संरक्षण, हुंडा प्रतिबंधक समिती, वनहक्क समिती, ग्राम दक्षता, ग्राम कृषी विकास, नानाजी देशमुख कृषी संजवनी समिती, जैवविविधता समिती अशा समित्या स्थापन करून त्यांची कार्ये निश्चित केली आहेत. त्यात बांधकाम समिती, पाणीपुरवठा समिती, रस्ते विकास समिती, शालेय शिक्षण समिती, आरोग्य व स्वच्छता समिती, दक्षता समिती तंटामुक्त समिती, संयुक्त पर्यावरण समिती अशा विविध समित्या ग्रामपंचायतला निर्माण करून या समित्या गावातील मूलभूत कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. परंतु, या समित्या फक्त नामधारीच असल्याचे दिसून येत आहे. अनेक ग्रामपंचायतीत या समित्यांची बैठक आयोजित करताना दिसत नाही. परिणामी या समित्यांचा गाव विकासाला हातभार लागल्याचे दिसून येत नाही. परिणामी शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामपंचायत दप्तरामध्ये स्थापन असल्याचा चित्र दिसून येत आहे

कोट

ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करावयाच्या विविध समित्या आहेत. आतापर्यंत बहुतांश समिती स्थापन करण्यात आला होत्या. परंतु, आता नव्याने या समित्याचे गठण करावयाचे आहे. परंतु, कोरोना संसर्गामुळे ग्रामसभा होऊ शकल्या नाहीत. ग्रामसभा घेण्याबाबतचे शासनाचे आदेश येताच या समितीच्या गठण केले जाणार आहे.

- कमलाकर वनवे, जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक युनियन