शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

१ ऑगस्टपासून अमरावती विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये अध्ययन होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:21 IST

राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना विद्यापीठ, महाविद्यालयांत १ ऑगस्टपासून अध्ययन सुरू केले जाणार आहे. त्याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठाचे कुलगुरुंच्या नावे पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देउच्च शिक्षण विभागाचे पत्र प्रथम वर्ष वगळता उर्वरित अभ्यासक्रमांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना विद्यापीठ, महाविद्यालयांत १ ऑगस्टपासून अध्ययन सुरू केले जाणार आहे. त्याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठाचे कुलगुरुंच्या नावे पत्र पाठविले आहे.कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’मध्ये विद्यापीठ, महाविद्यालये बंद आहेत. परीक्षा होणार की नाही, याबाबत एकमत झाले नाही. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील अभ्यासक्रम अध्ययनाबाबत उच्च शिक्षण विभागाने तयारी चालविली आहे. ४० टक्के ऑनलाइन आणि ६० टक्के ऑफलाइन अभ्यासक्रमावर भर दिला जाणार आहे. प्रथम वर्ष वगळता अन्य अभ्यासक्रम ऑगस्टपासून व प्रथम वर्ष अभ्यासक्रम १ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. कोरोनाची स्थिती सुधारेल अथवा नाही, याबाबत खात्री नाही. तथापि, विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये अध्ययन सुरू व्हावे, यासाठी उच्च शिक्षण विभाग सरसावला आहे. अध्ययनासाठी महाविद्यालयांना विद्यापीठाने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. यात तंत्रज्ञान प्लॅटफार्म निर्मिती, ऑनलाइन अभ्यासक्रम प्रभावीपणे पोहचविण्यासाठी अध्यापनशास्त्र मार्गदर्शक तत्त्वे, शैक्षणिक व्हिडीओ आकर्षित व रंजन करण्यासाठी लागणारे सहाय्य करणे, स्वयंम व तत्सम प्लॅटफॉर्मवरील शैक्षणिक साहित्यदेखील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाशी मॅप करून या संदर्भातील क्रेडिट मिळण्याच्यादृष्टीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहे. विद्यापीठ, महाविद्यालयांत अध्ययन संदर्भात कृती आराखडा तयार करून तो उच्च शिक्षण विभागाकडे ९ जून २०२० पर्यंत पाठवावा लागणार आहे.उच्च शिक्षण विभागाने १ ऑगस्टपासून विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये अध्ययन सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. कुलगुरूंना कृती आराखडा तयार करून पाठवावा लागणार आहे. याबाबत विद्यापीठाला अवगत करण्यात आले आहे.- केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण अमरावती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र