शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करावे

By admin | Updated: June 30, 2015 00:19 IST

'कुशल महाराष्ट्र, सशक्त महाराष्ट्र' ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम आत्मसात करावे,

गृहराज्यमंत्री रणजीत पाटील : परतवाडा येथे रोजगार मेळावा अमरावती : 'कुशल महाराष्ट्र, सशक्त महाराष्ट्र' ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम आत्मसात करावे, असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी परतवाडा येथे केले. परतवाडा येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र अमरावती यांच्याद्वारे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, आमदार रमेश बुंदिले, आमदार श्रीकांत देशपांडे, अचलपूरचे नगराध्यक्ष नंदलाल नंदवंशी, चांदूरबाजारच्या नगराध्यक्ष शुभांगी देशमुख, उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के, झडके, गावंडे, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक अशोक पाईकराव, चिमणकर, गिरीश झंझाड, नागपूर विभागातील रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी आदी उपस्थित होते. ना. रणजित पाटील पुढे म्हणाले की, देशात तरूणांची सर्वाधिक संख्या आहे. त्यांचे वयोमान हे २५ ते ३५ वयोगटातील आहे. आपल्या देशाला जागतिक पातळीवर महासत्ता बनविण्यासाठी तरूणांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रम आत्मसात केल्यास देशाची प्रगती नक्कीच होईल. देशात व राज्यात विविध कौशल्य आधारित अशा अनेक कंपनी आणि शासकीय संस्थांमध्ये युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध आहे. याचा युवकांनी उपयोग करावा, असे आवाहन पाटील यांनी केले. युवकांना विविध क्षेत्रात रोजगार उपलब्धीसाठी राज्य शासनाने कौशल्य विकास व उद्योजकता खाते निर्माण केले आहे. या खात्यामार्फत राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणावर सुमारे १५ लाख रूपयांची तरतूद केली आहे. राज्यातील पाच लाख युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट असून रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन या विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध रोजगारभिमुख उपक्रमासाठी अंदाजित ९०० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. राज्यात तालुका, जिल्हास्तरावर व विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये अशा रोजगार मेळाव्याचे २२ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या रोजगार मेळाव्यात सुमारे ८०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी चार कंपन्या सहभागी झाल्या आहेत, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार बच्चू कडू आणि रमेश बुंदीले यांनीही विद्यार्थ्यांना रोजगारासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक अशोक पाईकराव यांनी केले. (प्रतिनिधी)