शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उपोषण मंडपात स्वत:ची तिरडी रचून विद्यार्थ्यांनी केला शासनाचा निषेध

By उज्वल भालेकर | Updated: December 18, 2023 19:25 IST

२०२१ मध्ये राबविलेल्या सुरक्षा रक्षक भरतीचा निकाल जाहीर करण्याची मागणी

उज्वल भालेकर, अमरावती : सुरक्षा रक्षक मंडळ अमरावतीच्यावतीने वर्ष २०२१ मध्ये सुरक्षा रक्षकपदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. जवळपास ५०० जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती. परंतु तीन वर्षांनंतरही या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल मंडळाने जाहीर केलेला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऑल इंडिया पँथर सेनेच्या नेतृत्वात उपोषण सुरू आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वत:ची तिरडी रचून आंदोलन केले.

सुरक्षा रक्षक मंडळ विभाग अमरावतीच्यावतीने १७ जानेवारी २०२१ रोजी ५०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून २५ डिसेंबर २०२१ रोजी शारीरिक चाचणी परीक्षा घेऊन १५ सप्टेंबर २०२२ रोजी मिळालेल्या गुण देखील संकेतस्थळावर देण्यात आले होते. परंतु या भरती प्रक्रियेतील अंतिम निवड यादी अजूनही मंडळाने जारी केलेली नाही. त्यामुळे यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षक भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने निकाल जाहीर करण्याची मागणी केली होती. परंतु अजूनही निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे १६ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत चिता आमरण उपोषण सुरू केले आहे.

या आंदोलनाची लोकप्रतिनिधी तसेच शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी स्वत:ची तिरडी रचून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनातून तत्काळ सुरक्षा रक्षक भरतीचा निकाल जाहीर करावा, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने नियुक्ती द्यावी, सुरक्षा रक्षकांच्या रिक्त जागांची माहिती द्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या उपोषणामध्ये अनंत भताने, डिगांबर सरकटे, राहुल पवार, नरेश बावणकर, अमोल महल्ले. अनिकेत इंगळे, शुभम माथुरकर, विनोद गव्हाणे, मंगेश ठाकरे, चेतन बांडे, सचिन खंडारे आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी आहेत.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार