शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उपोषण मंडपात स्वत:ची तिरडी रचून विद्यार्थ्यांनी केला शासनाचा निषेध

By उज्वल भालेकर | Updated: December 18, 2023 19:25 IST

२०२१ मध्ये राबविलेल्या सुरक्षा रक्षक भरतीचा निकाल जाहीर करण्याची मागणी

उज्वल भालेकर, अमरावती : सुरक्षा रक्षक मंडळ अमरावतीच्यावतीने वर्ष २०२१ मध्ये सुरक्षा रक्षकपदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. जवळपास ५०० जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती. परंतु तीन वर्षांनंतरही या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल मंडळाने जाहीर केलेला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऑल इंडिया पँथर सेनेच्या नेतृत्वात उपोषण सुरू आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वत:ची तिरडी रचून आंदोलन केले.

सुरक्षा रक्षक मंडळ विभाग अमरावतीच्यावतीने १७ जानेवारी २०२१ रोजी ५०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून २५ डिसेंबर २०२१ रोजी शारीरिक चाचणी परीक्षा घेऊन १५ सप्टेंबर २०२२ रोजी मिळालेल्या गुण देखील संकेतस्थळावर देण्यात आले होते. परंतु या भरती प्रक्रियेतील अंतिम निवड यादी अजूनही मंडळाने जारी केलेली नाही. त्यामुळे यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षक भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने निकाल जाहीर करण्याची मागणी केली होती. परंतु अजूनही निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे १६ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत चिता आमरण उपोषण सुरू केले आहे.

या आंदोलनाची लोकप्रतिनिधी तसेच शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी स्वत:ची तिरडी रचून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनातून तत्काळ सुरक्षा रक्षक भरतीचा निकाल जाहीर करावा, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने नियुक्ती द्यावी, सुरक्षा रक्षकांच्या रिक्त जागांची माहिती द्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या उपोषणामध्ये अनंत भताने, डिगांबर सरकटे, राहुल पवार, नरेश बावणकर, अमोल महल्ले. अनिकेत इंगळे, शुभम माथुरकर, विनोद गव्हाणे, मंगेश ठाकरे, चेतन बांडे, सचिन खंडारे आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी आहेत.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार