शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

उशिरा निकालाबाबत विद्यार्थ्यांत संताप

By admin | Updated: March 10, 2017 00:28 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिवाळी परीक्षेचे निकाल उशिरा लागत असल्याने विद्यार्थी संतापले आहेत.

अभाविपची कुलगुरुंसोबत भेट : दिरंगाईबद्दल प्रशासनाने घेतली नरमाईची भूमिकाअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिवाळी परीक्षेचे निकाल उशिरा लागत असल्याने विद्यार्थी संतापले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बुधवारी कुलगुरुंची भेट घेऊन ४५ दिवसांच्या आत निकाल का लागले नाही? याबाबत जाब विचारला. अखेर कुलगुरुंनी निकाल उशिरा लागण्याची कारणमिमांसा स्पष्ट करुन विद्यार्थ्यांची समजूत काढली.विद्यापीठाने यावर्षीपासून आॅनलाईन निकाल ही प्रणाली लागू केली आहे. अतिशय जलद गतीने निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. मात्र नवतंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यापीठ प्रशासनाच्या काही तांत्रिक चुका राहून गेल्या आहेत. त्यामुळे हिवाळी परीक्षेच्या अनेक विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले नाहीत. निकाल वेळेवर लागणार असा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला होता. मात्र हा दावा फोल ठरल्याने अभाविपने बुधवारी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांची भेट घेवून निकाल उशिरा लागण्यामागील कारणे जाणून घेतली. यावेळी अभाविपचे प्रदेश मंत्री विक्रमजीत कलाने, जिल्हा संयोजक अखिलेश भारतीय, सहसंयोजक अभिलाष खारोडे आदींनी कुलगुरुंवर प्रश्नांचा भडीमार केला. २९ मार्च २०१६ रोजी अभाविपने विद्यापीठाशी संंबंधित ५८ मागण्यांबाबत धडक मोर्चा काढल्याची माहिती कुलगुरुंच्या पुढ्यात ठेवली. कुलगुरुंनी नुकतेच पदभार स्वीकारल्याने परीक्षा विभागाच माहिती घेऊ द्या, असे सांगितले होते. मात्र वर्षभराच्या कालावधी नंतरही निकाल उशिरा लागत असेल तर विद्यापीठाचा एवढा मोठा पसारा कशाला हवा, असा सवाल विद्यार्थी संघटनेने कुलगुरुंना विचारला. ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला असून अभियांत्रिकी आणि अन्य काही शाखांचे निकाल लावण्यात आले नाही. वेळेवर निकाल लागत नसल्याने उन्हाळी २०१७ आणि बॅकलॉग पेपरचा अभ्यास करायला वेळ मिळणार नाही, अशी कैफियत विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या समोर मांडली. अभियांत्रिकी, विधीसह अन्य शाखांचे निकाल ७ दिवसांच्या आत लावण्यात आले नाही तर अभाविप तिवम आंदोलन छेडणार असा इशारा देण्यात आला आहे. अभियांत्रिकी उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक अजुनही जाहीर करण्यात आले नाही. या परीक्षा मेपर्यत संपल्या नाही तर निकाल हे जूनपर्यत लागतील. निकाल उशिरा लागत असल्याने स्पर्धा परीक्षा, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. यावेळी विक्की पांडे, ज्ञानेश्वर खुपसे, सौरभ लांडगे, श्रीरंग देशमुख, अभय सूर्यवंशी, शास्वत वार्इंदेशकर, मंदार नानोटी, शंतनू भारतीय, संदीप चव्हाण, मनोज साबळे, सारंग झंवर, प्रसन्न कोशेट्टीवार, आकाश येवले, वैभव शिलणकर, सारैभ आगासे आदी उपस्थित होते.