शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा निकालाबाबत विद्यार्थ्यांत संताप

By admin | Updated: March 10, 2017 00:28 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिवाळी परीक्षेचे निकाल उशिरा लागत असल्याने विद्यार्थी संतापले आहेत.

अभाविपची कुलगुरुंसोबत भेट : दिरंगाईबद्दल प्रशासनाने घेतली नरमाईची भूमिकाअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिवाळी परीक्षेचे निकाल उशिरा लागत असल्याने विद्यार्थी संतापले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बुधवारी कुलगुरुंची भेट घेऊन ४५ दिवसांच्या आत निकाल का लागले नाही? याबाबत जाब विचारला. अखेर कुलगुरुंनी निकाल उशिरा लागण्याची कारणमिमांसा स्पष्ट करुन विद्यार्थ्यांची समजूत काढली.विद्यापीठाने यावर्षीपासून आॅनलाईन निकाल ही प्रणाली लागू केली आहे. अतिशय जलद गतीने निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. मात्र नवतंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यापीठ प्रशासनाच्या काही तांत्रिक चुका राहून गेल्या आहेत. त्यामुळे हिवाळी परीक्षेच्या अनेक विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले नाहीत. निकाल वेळेवर लागणार असा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला होता. मात्र हा दावा फोल ठरल्याने अभाविपने बुधवारी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांची भेट घेवून निकाल उशिरा लागण्यामागील कारणे जाणून घेतली. यावेळी अभाविपचे प्रदेश मंत्री विक्रमजीत कलाने, जिल्हा संयोजक अखिलेश भारतीय, सहसंयोजक अभिलाष खारोडे आदींनी कुलगुरुंवर प्रश्नांचा भडीमार केला. २९ मार्च २०१६ रोजी अभाविपने विद्यापीठाशी संंबंधित ५८ मागण्यांबाबत धडक मोर्चा काढल्याची माहिती कुलगुरुंच्या पुढ्यात ठेवली. कुलगुरुंनी नुकतेच पदभार स्वीकारल्याने परीक्षा विभागाच माहिती घेऊ द्या, असे सांगितले होते. मात्र वर्षभराच्या कालावधी नंतरही निकाल उशिरा लागत असेल तर विद्यापीठाचा एवढा मोठा पसारा कशाला हवा, असा सवाल विद्यार्थी संघटनेने कुलगुरुंना विचारला. ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला असून अभियांत्रिकी आणि अन्य काही शाखांचे निकाल लावण्यात आले नाही. वेळेवर निकाल लागत नसल्याने उन्हाळी २०१७ आणि बॅकलॉग पेपरचा अभ्यास करायला वेळ मिळणार नाही, अशी कैफियत विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या समोर मांडली. अभियांत्रिकी, विधीसह अन्य शाखांचे निकाल ७ दिवसांच्या आत लावण्यात आले नाही तर अभाविप तिवम आंदोलन छेडणार असा इशारा देण्यात आला आहे. अभियांत्रिकी उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक अजुनही जाहीर करण्यात आले नाही. या परीक्षा मेपर्यत संपल्या नाही तर निकाल हे जूनपर्यत लागतील. निकाल उशिरा लागत असल्याने स्पर्धा परीक्षा, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. यावेळी विक्की पांडे, ज्ञानेश्वर खुपसे, सौरभ लांडगे, श्रीरंग देशमुख, अभय सूर्यवंशी, शास्वत वार्इंदेशकर, मंदार नानोटी, शंतनू भारतीय, संदीप चव्हाण, मनोज साबळे, सारंग झंवर, प्रसन्न कोशेट्टीवार, आकाश येवले, वैभव शिलणकर, सारैभ आगासे आदी उपस्थित होते.