शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

मिरवणुकीच्या मुद्यावरुन येवद्यात तणाव; एसपी डेरेदाखल

By admin | Updated: September 19, 2016 00:09 IST

गणेश विसर्जनावरून निर्माण झालेला तणाव अखेर रविवारी निवळला. गावातील दोन्ही धर्माच्या नागरिकांनी दाखविलेले सामंजस्य, ...

अखेर झाले विसर्जन : पोलिसांच्या भूमिकेला गावकऱ्यांचा विरोध येवदा : गणेश विसर्जनावरून निर्माण झालेला तणाव अखेर रविवारी निवळला. गावातील दोन्ही धर्माच्या नागरिकांनी दाखविलेले सामंजस्य, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीमुळे या प्रकारावर पडदा पडला. स्थानिक एका गणेशोत्सव मंडळाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष होते. मागील ७५ वर्षांपासून या मंडळाची विसर्जन मिरवणूक येथील छोट्या मशिदीजवळून काढली जाते. इतकेच नव्हे तर गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांचा मुस्लिम समुदायाच्यावतीने गौरवदेखील केला जातो. मात्र, यावेळी पोलिसांनी मशिदीसमोरून एकाचवेळी नऊ गणपती नेण्यास परवानगी नाकारली. मंडळाजवळ एकाच गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची परवानगी असल्याने अन्य आठ गणपती मशिदीसमोरुन जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतली. उलटपक्षी मंडळही भुमिकेवर ठाम राहिले. या मंडळाचे नऊही गणपती मशिदीसमोरूनच जातील, अशी भूमिका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. पोलीस आणि मंडळांचे पदाधिकारी आपापल्या भूमिकेवर अडून राहिल्याने गावात तणावाचे वातावरण होते. वास्तविक शनिवारीच या मंडळाची विसर्जन मिरवणूक निघणार होती. मात्र, तोडगा न निघाल्याने रविवारी लोकप्रतिनिधींना मध्यस्थी करावी लागली. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षक लखमी गौतम येवद्यात डेरे दाखल झाले. शनिवारी निघालीच नाही मिरवणूकयेवदा : या वादावर शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत कोणताच तोडगा न निघाल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे नऊही गणपती पोेलिसांच्या स्वाधिन केले आणि ते घराकडे परतले. परिणामी विसर्जन मिरवणूक शनिवारी निघालीच नाही. गावकऱ्यांमध्ये असंतोष व तणावजन्य स्थिती पाहता रविवारी पहाटेपासूनच गावात पोलिसांचा ताफा व अतिरिक्त कुमक तैनात झाली. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. हिंदू व मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम स्वत: येवदा येथे तळ ठोकून होते. येवदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश पिंपळकर यांनीदेखील संवेदनशील स्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केलेत. इतकेच नव्हे, तर संवेदनशील स्थिती लक्षात घेऊन अकोटचे आ.प्रकाश भारसाकळे, दर्यापूरचे आ. रमेश बुंदिले, तहसीलदार राहुल तायडे, उपविभागीय अधिकारी, दर्यापूर इब्राहिम चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे, सरपंच प्रदीप देशमुख, उपसरपंच नईम जमादार, माजी सरपंच बाळासाहेब राऊत, माजी सरपंच संतोष तिडके, गजानन वाकोडे, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेखा ठाकरे, सुनील डिके, विजय मेंढे, अरूणा गावंडे, अतुल गोळे, धारणी उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. अखेर एसपी लखमी गौतम यांनी गावातील हिंदू व मुस्लिम समाजातील प्रमुख मान्यवरांच बैठक घेऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी ग्रामपंचायतीकडून मशिदीसमोरून मिरवणूक काढण्याची लेखी परवानगी घेतल्यानंतर ही मिरवणूक कडेकोट बंदोबस्तात पार पडली. (वार्ताहर)गावकऱ्यांनी ठेवले गाव बंदमशिदीसमोरून एकाच वेळी नऊ गणपतींची मिरवणूक नेण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर गावकऱ्यांमध्ये सुप्त असंतोष होता. गणपती पोलिसांच्या हवाली करून शनिवारी गावकरी घरी परतले. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळपासूनच गावकऱ्यांनी या निषेधार्थ स्वयंस्फूर्त बंद ठेवला होता. गावाला पोलीस छावणीचे स्वरूपयेवदा हे गाव पूर्वीपासूनच संवेदनशिल म्हणून गणले जाते. यावेळीही गणपती विसर्जनाच्या मुद्यावरून तणाव निर्माण झाल्याने कोणताही अनर्थ घडू नये, यासाठी गावात पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात होती. अमरावती राखीव पोलीस दल, दर्यापूर, खल्लार व चिंचोली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.