शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

-तर प्रहार उतरणार रस्त्यावर

By admin | Updated: March 31, 2016 00:13 IST

मुंबई येथे मंत्रालयात कामानिमित्त गेलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यावर खोटे आरोप करीत गुन्हा नोंदविण्यात आला आहे

बच्चू कडूंना समर्थन : गुन्हे मागे घेण्याची मागणीपरतवाडा/दर्यापूर : मुंबई येथे मंत्रालयात कामानिमित्त गेलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यावर खोटे आरोप करीत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यानिषेधार्थ बुधवारी सकाळी ११ वाजता प्रहार कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. मंत्रालयातील उपसचिव हे जाधव नामक लिपिकाचे काम करण्यात हयगय करीत असल्याने अचलपूरचे आ. बच्चू कडू यांनी सामान्य प्रशासन विभागात जाऊन त्यांची भेट घेऊन जाधव यांचे काम करुन देण्याची मागणी केली होती. त्यावर सबंधितांमध्ये वाद झाला. मात्र, घटनेचा विपर्यास करून आमदार बच्चू कडूंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरुन मंत्रालयातील कामकाजबंद करण्यात आले. यासर्व बाबी निषेधार्ह असून अचलपूर तालुका प्रहार संघटनेच्यावतीने या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात तालुका प्रहार संघटनेच्यावतीने आंदोलन करून मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले. आ. कडुंवरील खोटे आरोप मागे घेऊन सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये. असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रहारचे बल्लू जवंजाळ, अविनाश सुरंजे, संजय तट्टे, प्रवीण पाटील, शाम अग्रवाल, गजानन मोरे, दीपक धूळधर, प्रशांत आवारे, दीपक भोरे, नीलेश भांडे, दिलीप जवंजाळ, अनिल विधळे, राजा टेकाम, पंजाब बेदरकर, रूपेश लहाने, विजय धावाणी, अंकुश जवंजाळ, मोहन सातपुते आदींची उपस्थिती होती.दर्यापुरातही प्रहारने दिले निवेदन दर्यापूर : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी मुंबई मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव डी.आर. गावीत यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. परंतु आ.बच्चू कडू यांना अटक केल्यास प्रहार युवाशक्ती संघटनेने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. अपंग अशोक जाधव नामक कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागणीसाठी विचारणा केली असता गावित यांनी आ.कडू यांना उध्दट उत्तर दिले. तसेच दमदाटी केल्यामुळेच आमदारांचा पारा चढल्याने हा वाद झाला. याप्रकरणात आ. बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आमदारांना अटक झाल्यास प्रहार युवाशक्ती संघटनेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा तालुकाध्यक्ष महेश कुरळकर, रितेश बाराहाते, गजानन आगलावे, प्रमोद इंगळे, मनोज अढाऊकर, गजानन रोडे, सुधीर पवित्रकार, अर्जुन रघुवंशी, प्रशांत कडू, विजय हरणे, अरविंद हरणे, अरविंद कराळे आदींनी दिला आहे.