शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

वादळी पावसाचा हिरापूर गावाला जबर फटका

By admin | Updated: June 27, 2016 00:14 IST

तालुक्यातील गुरुवार २४ जून रोजी आलेल्या वादळी पावसाने शंभर ते दीडशे वर्षे जुनी असलेली अनेक वृक्ष उळमळून पडली,...

शेतीचेही नुकसान : अनेक घरांवरची टिनपत्रे उडालीअंजनगाव सुर्जी : तालुक्यातील गुरुवार २४ जून रोजी आलेल्या वादळी पावसाने शंभर ते दीडशे वर्षे जुनी असलेली अनेक वृक्ष उळमळून पडली, तर हिरापूर, निमखेड, तवसाळा, खिराळा आदी गावांसह तालुक्यात १७८ घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याशिवाय २५ हेक्टरवरील बागायती पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. मागील ४ दिवसांपासून दररोज तुरळक पावसाने शुक्रवारी सायंकाळी वादळ व विजेच्या कडकडाटासह रुद्ररुप धारण केले होते. २४ जून रोजी रात्रीच्या सुमारास अचानक वादळासह पावसाला सुरुवात झाली. या वादळाने अंजनगाव, अकोट मार्गावरील शहरी व्याप्त भागातील १०० ते १५० वर्षे जूनी आठ ते दहा कडूलिंबाची झाडे उळमळून पडल्याने रात्रभर मार्ग बंद होता. यासह अंजनगाव शहरासह हिरापूर येथील ११५ घरांचे तर निमखेड भागात येथील ३०, तवसाडा येथील १५, अंजनगाव शहरातील १० आणि खिराळा गावातील ८ अशा १७८ घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोबतच संत्रा व केळी उत्पादन शेतकऱ्यांचे सुमारे २५ हेक्टर वरील पिकांना या वादळाचा तडाका बसला आहे.हिरापूर, निमखेड व परिसरात शुक्रवारी रात्री सुसाटाच्या वादळी वाऱ्यासह पावसाने अर्ध्यातासातच अनेक घरावरील टिनपत्रे, कवेलू व अन्य साहित्याच्या पार चुराळा केला आहे. या गांवामधील अनेक वृक्ष उळमळून पडल्यामुळे घरांच्या भिंती, विजेचे खांब, तार तुटून पडले आहेत. त्यामुळे या गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक घरांना या वादळाचा तडाका बसल्याने बरेच कुटुंब उघड्यावर आली आहेत. काही घरातील धान्य, कपडे व इतर साहित्यांचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेलगत असलेल्या हिरापूर येथील अंगणवाडी केंद्राचे शेड पूर्णता नेस्तनाबूत झाले आहे. याशिवाय काही वाहनांवरसुद्धा वृक्ष उळमळून पडल्यामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील टिनपत्रे, पीव्हीसी पाईप व इतर साहित्य वादळामुळे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत उडून गेली होती. विशेष म्हणजे या संकटात कुठलीही जीवित हानीची घटना सुदैवाने घडली नाही. या नुकसानीची माहिती अंजनगाव पंचायत समितीचे सभापती विनोद टेकाडे व हिरापूर येथील संरपच मिनल दखणे तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सदस्य यांनी महसूल विभागाला दिली. दरम्यान तहसीलदार विजय चव्हाण, तलाठी गावंडे, ग्रामसेवक पवार, आदिंनी गावातील नुकसानीचे सर्व्हे करून पंचनामा केला. नुकसानग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सर्व गावकरी मदतीला धावले. विशेष म्हणजे तालुक्यात या वादळी पावसाचा तडाका हिरापूर गावाला सर्वाधिक बसला आहे. त्यामुळे शासनाने नुकसान कुटूंबाना व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीने दखलअंजनगाव सुर्जी तालुक्यात शुक्रवारी रात्री अचानक वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या दौऱ्यामुळे व्यस्त असतानाही नुकसानग्रस्त गावातील नुकसानीचे तातडीने संर्वेक्षण करण्याचे आदेश अंजनगावचे तहसीलदार यांना दिलेत. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येताच नुकसानग्रस्त गावाचे सर्र्वेक्षणाचे काम महसूल विभागाने पूर्ण केले आहे.नुकसानग्रस्त भागाची पाहणी महसूल यंत्रणेने पूर्ण केली असून अंजनगाव तालुक्यात झालेल्या नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत देण्यासाठी २६ जून रोजी तहसीलदार विजय चव्हाण यांना सूचना दिल्या आहेत. येत्या तीन दिवसांत नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप केले जाणार आहे. किरण गीत्ते, जिल्हाधिकारी