शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सातबारा कोरा करण्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: April 15, 2017 00:12 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांंच्या मालाला भाव नाही.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन : वाहने रोखली, वाहतूक विस्कळीत, कार्यकर्त्यांना अटक व सुटका वरुड : शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांंच्या मालाला भाव नाही. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप करीत शुक्रवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलक कार्यकर्त्यांनी दुपारी १ च्या सुमारास वाहने रोखून धरली. यामुळे सुमारे १ तास शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मात्र, त्यांना शेतकरी हिताची चिंता नाही. कर्जमुक्ती होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र शासनाने हा निर्णय घेतला नाही. याचा विरोध करण्यासाठी वरूड तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यात ग्रामीण भागातील शेकडो शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी भाजप सरकार विरोधात निषेध व्यक्त केला. जोपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरूड तालुका अध्यक्ष बाळू पाटील, वर्धा लोेकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व पं.स. सभापती विक्रम ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर दाभाडे, वरूड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अजय नागमोते, जि.प. समाजकल्याण सभापती सुशिला कुकडे, राजू बहुरूपी, चंद्रशेखर अळसपुरे, राजेंद्र पाटील, विष्णुपंत निकम, राजू पापडकर, सिंधू कर्नाके, दुर्गा हरणे, पांडुरंग निकम, अनिल गुल्हाने, अजय पांडव, रोषण देशमुख, नीलेश मगर्दे, रोशन दारोकर, धनंजय बोकडे, विलास उघडे, दीपक देशमुख, अनिल कडू, किशोर गोमकाळे, सुभाष शेळके, अरूण ताथोडे, रामभाऊ शेळके, पुरूषोत्तम अनासाने उपस्थित होते. यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली व नंतर सोडले. (ताुलका प्रतिनीधी)