शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

विमा कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवा

By admin | Updated: September 1, 2016 00:21 IST

तालुक्यात यंदा झालेली अतिवृष्टी व अंखड आठवडाभर बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली.

मागणी : दर्यापूर काँग्रेस कमिटीचे निवेदन दर्यापूर : तालुक्यात यंदा झालेली अतिवृष्टी व अंखड आठवडाभर बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली. सततच्या पावसामुळे जमीन देखील खरडून गेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला असला तरी विमा कंपन्यांनी संपर्कासाठी दिलेल्या भ्रमणध्वनीवर कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. विमा कंपन्यांनी चालविलेली शेतकऱ्यांची लूट तातडीने थांबवावी, अशी मागणी स्थानिक काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेती खरडून गेली आहे. परिणामी शेतात साचलेल्या पाण्यामुळे कपाशी व मूगाचे पीक जळून गेले आहे. शासन निर्देशांनसार शेतकऱ्यांनी ६०ते ६२ कोटी रूपयांचा खरीप विमा काढला आहे.शासनाच्या नियम व अटींनुसार नुकसान झाल्यापासून दोन दिवसांमध्ये याबाबतचा अहवाल किंवा माहिती कंपनीला कळविणे अनिवार्य आहे. परंतु यासाठी बाधित शेतकऱ्यांनी कंपनीसोबतस संपर्क केला असला विमा कंपनीकडून दिलेला भ्रमणध्वनीक्रमांकांवर कोणताच प्रतिसाद मिळत नाही. कृषी अधिकारी कार्यालयाकडूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यामुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची ही हानी थांबविण्याची मागणी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, सुनील गावंडे, सरचिटणीस अभिजित देवके, शशांक धर्माळे, अमोल धर्माळे, गुडड्डू गावंडे, विलास टाले, रामभाऊ साखरे, पप्पू होले, सुभाष गावंडे, बबन देशमुख आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)