शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

राजकमल चौकात रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: February 22, 2015 00:06 IST

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ शनिवारी येथील राजकमल चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्ष,..

अमरावती : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ शनिवारी येथील राजकमल चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जिल्हा काऊन्सील डावी आघाडी व सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने अर्धातास रास्ता रोको आंदोलन करुन शासनाविरोधात घोषणाबाजी करुन आपला संताप व्यक्त केला. दरम्यान या आंदोलनानंतर राजकमल चौकात कामगार नेते पी.बी. उके यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. यामध्ये जिजाऊ ब्रिगेड, भाकप, माकप, रिपाई, क्रांति ज्योती ब्रिगेड अशा संघटनांनी सहभाग घेतला होता. कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावरील झालेला हल्ला हा अत्यंत निंदनिय असून पुरोगामी महाराष्ट्रात दाभोळकरानंतर झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पानसरेवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध सर्वत्र व्यक्त होत असतांना हल्लेखोरांचा तातडीने शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी अर्धातास रास्ता रोको आंदोलन करीत वाहतूक रोखून धरली. यावेळी सहभागी आंदोलकांनी राज्य व केंद्र शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करुन या प्रकाराला आपला संताप व्यक्त केला. यानंतर राजकमल चौकात गोविंद पानसरे यांच्या निधनानिमित्त शोकसभा घेण्यात आली. या शोक सभेला पी.बी. उके, प्राचार्य रमेश अंधारे, श्रीकृष्ण माहोरे, वर्षा पागोटे, ज्ञानेश्वर जुनघरे, व्ही.एन. देवीकर, रिपाईचे हिम्मत ढोले, सुनील देशमुख, प्रकाश पांडे, माकपचे सुभाष पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप राऊत, जिजाऊ ब्रिगेडच्या मयूरा देशमुख, बी.के जाधव, नंदू नेतनवार, माधव गारपवार, सुनील घटाळे, बबन इंगोले, रुपेश फसाटे आदिंनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी माकप व भाकपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिजाऊ बिग्रेडतर्फे पानसरेंवरील हल्ल्याचा निषेध कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा जिजाऊ बिग्रेडने तीव्र निषेध केला. याविरोधात शनिवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सोपवून या घटनेतील हल्लेखोरांचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. कॉम्रेड नेते गोविंद पानसरे यांनी फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा घेऊन समाजप्रबोधनासाठी लढत होते.त्याची हत्या म्हणजे पुरोगामी विचारावर केलेला भ्याड हल्ला होय. महाराष्ट्राच्या भूमित रूजलेल्या विवेकवादी विचाराच्या विरोधात ज्यांनी हे कृत्य केले त्या हल्लेखोरांचा शोध घेऊन कारवाई करावी आणि या घटनेमागील सुत्रधारांनाही अटक करण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष मयुरा देशमुख,विभागीय अध्यक्ष किर्तीमाला चौधरी,कार्याध्यक्ष प्रभा आवारे, उपाध्यक्ष सुनंदा खरड, जिल्हाध्यक्ष कांचन उल्हे, सदस्य सरोज कुंटेवार, मनाली तायडे, शीला पाटील,शोभना देशमुख आदीची उपस्थिती होती.