शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

परतवाड्यात शेतकरी कर्जमाफीसाठी मनसेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 00:16 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने

१५० कार्यकर्त्यांना अटक : चांदूरबाजार नाक्यावर वाहनांच्या रांगापरतवाडा : शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परतवाडा-अमरावती महामार्गावरील चांदूरबाजार नाक्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. पोलिसांनी ५० कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पोटे यांच्या नेतृत्वात गुरुवारी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रीयीकृत बॅँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, पाच एकर व पाच एकरापेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश करावा. कृषी संबंधित शासनाने दिलेल्या योजनांचे नियम व अटी शिथील करावे, कृषी मंत्रालयाने राबविण्यात येणाऱ्या योजनांची पुस्तिका काढून शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभारी तालुका अध्यक्ष विजय पोटे, जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, राहुल अतकरे, सचिन जिचकार,देवराव केदार, रितेश कडू, अंकुश जवंजाळ, सुधीर बदरके, श्याम पिसार, चेतन चौधरी, स्वप्निल सोलव, नीकेश उघडे, रुपेश शर्मा, अमोल भुयार, उमेश भुयार, प्रमोद चौधरी आदी आंदोलनात सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)वाहनांच्या रांगा, अटक व सुटका मनसे कार्यकर्ते रास्तारोको आंदोलनात उतरल्याने परतवाडा अमरावती मार्गावरील वाहनांची दुतर्फा रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलीसांनी मनसे कार्यकर्त्यांना अटक करुन वाहतूक सुरळीत केली व नंतर सोडून देण्यात आले. आंदोलनादरम्यान शेतकरी हिताचे असल्याचे पाहून प्रवासातील काही शेतकरी वाहनातून आपला पाठींबा दर्शवित होते हे विशेष.