शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

परतवाड्यात शेतकरी कर्जमाफीसाठी मनसेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 00:16 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने

१५० कार्यकर्त्यांना अटक : चांदूरबाजार नाक्यावर वाहनांच्या रांगापरतवाडा : शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परतवाडा-अमरावती महामार्गावरील चांदूरबाजार नाक्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. पोलिसांनी ५० कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पोटे यांच्या नेतृत्वात गुरुवारी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रीयीकृत बॅँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, पाच एकर व पाच एकरापेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश करावा. कृषी संबंधित शासनाने दिलेल्या योजनांचे नियम व अटी शिथील करावे, कृषी मंत्रालयाने राबविण्यात येणाऱ्या योजनांची पुस्तिका काढून शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभारी तालुका अध्यक्ष विजय पोटे, जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, राहुल अतकरे, सचिन जिचकार,देवराव केदार, रितेश कडू, अंकुश जवंजाळ, सुधीर बदरके, श्याम पिसार, चेतन चौधरी, स्वप्निल सोलव, नीकेश उघडे, रुपेश शर्मा, अमोल भुयार, उमेश भुयार, प्रमोद चौधरी आदी आंदोलनात सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)वाहनांच्या रांगा, अटक व सुटका मनसे कार्यकर्ते रास्तारोको आंदोलनात उतरल्याने परतवाडा अमरावती मार्गावरील वाहनांची दुतर्फा रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलीसांनी मनसे कार्यकर्त्यांना अटक करुन वाहतूक सुरळीत केली व नंतर सोडून देण्यात आले. आंदोलनादरम्यान शेतकरी हिताचे असल्याचे पाहून प्रवासातील काही शेतकरी वाहनातून आपला पाठींबा दर्शवित होते हे विशेष.