शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांनाच अडथळा

By admin | Updated: June 3, 2015 00:30 IST

शहरातील विस्कळीत वाहतूकीमुळे रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाच्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.

अत्यावश्यक सेवेला फटका : सिग्नलवर थांबतात वाहनेअमरावती : शहरातील विस्कळीत वाहतूकीमुळे रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाच्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. दररोज आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज असणारी वाहने सिग्नलवरील अस्तव्यस्त वाहतुकीमुळे मध्यच थांबत आहेत. याबाबत प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांकडूनही सहकार्य मिळत नसल्याने वाहनचालकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी सत्वपरीक्षाच द्यावी लागत आहे.कोणतीही घटना सांगून येत नाही, असे म्हटले जाते. मात्र, घटना घडल्यानंतरही आतप्कालीन स्थितीत सज्ज असणाऱ्या वाहनांना सुरक्षित घटनास्थळी पोहोण्यास मोठे परिश्रम घ्यावे लागत आहेत. जिल्ह्यात दररोज विविध घटना घडतात, कुठे अपघात तर कुठे आग लागल्याच्या घटना सुरुच असतात. अशा स्थितीत रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाच्या वाहनांना वेळेत पोहोचणे गरजेचे असते. मोठ्या तत्परतेने रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी पोहोचण्यासाठी धडपड करतात. लवकरात लवकर मदत करण्याचा त्यांचा उद्देश असतो. मात्र, शहरातील विस्कळीत वाहतुकीमुळे आपत्कालीन वाहने तत्काळ घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नसल्याची विदारक स्थिती शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील राजकमल व राजापेठ या दोन्ही वर्दळीच्या मुख्य चौकात दिवसभर वाहनांची ये-जा सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते.शहरातील अस्तव्यस्त वाहतूक व सिग्नलवर थांबणारी वाहने आपत्कालीन स्थितीसाठी अडथळा निर्माण करतात. शहरात गतिरोधकांची संख्या अधिक असल्यामुळे अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण होते. याकडे प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. - भरतसिंग चव्हाण, प्रभारी अधीक्षक, अग्निशमन विभाग.रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा मिळण्याच्या उद्देशाने रुग्णवाहिका वेगाने न्यावी लागते. मात्र, अस्तव्यस्त वाहतूक व गतिरोधकांमुळे रुग्णांचे हाल होतात. सिग्नलवर नेहमीच वाहनांचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका रुग्णालयात तत्काळ पोहोचून शकत नाही. अशावेळी रुग्णांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. - अभिजित देशपांडे, रुग्णवाहिका चालक.