शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांनाच अडथळा

By admin | Updated: June 3, 2015 00:30 IST

शहरातील विस्कळीत वाहतूकीमुळे रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाच्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.

अत्यावश्यक सेवेला फटका : सिग्नलवर थांबतात वाहनेअमरावती : शहरातील विस्कळीत वाहतूकीमुळे रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाच्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. दररोज आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज असणारी वाहने सिग्नलवरील अस्तव्यस्त वाहतुकीमुळे मध्यच थांबत आहेत. याबाबत प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांकडूनही सहकार्य मिळत नसल्याने वाहनचालकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी सत्वपरीक्षाच द्यावी लागत आहे.कोणतीही घटना सांगून येत नाही, असे म्हटले जाते. मात्र, घटना घडल्यानंतरही आतप्कालीन स्थितीत सज्ज असणाऱ्या वाहनांना सुरक्षित घटनास्थळी पोहोण्यास मोठे परिश्रम घ्यावे लागत आहेत. जिल्ह्यात दररोज विविध घटना घडतात, कुठे अपघात तर कुठे आग लागल्याच्या घटना सुरुच असतात. अशा स्थितीत रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाच्या वाहनांना वेळेत पोहोचणे गरजेचे असते. मोठ्या तत्परतेने रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी पोहोचण्यासाठी धडपड करतात. लवकरात लवकर मदत करण्याचा त्यांचा उद्देश असतो. मात्र, शहरातील विस्कळीत वाहतुकीमुळे आपत्कालीन वाहने तत्काळ घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नसल्याची विदारक स्थिती शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील राजकमल व राजापेठ या दोन्ही वर्दळीच्या मुख्य चौकात दिवसभर वाहनांची ये-जा सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते.शहरातील अस्तव्यस्त वाहतूक व सिग्नलवर थांबणारी वाहने आपत्कालीन स्थितीसाठी अडथळा निर्माण करतात. शहरात गतिरोधकांची संख्या अधिक असल्यामुळे अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण होते. याकडे प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. - भरतसिंग चव्हाण, प्रभारी अधीक्षक, अग्निशमन विभाग.रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा मिळण्याच्या उद्देशाने रुग्णवाहिका वेगाने न्यावी लागते. मात्र, अस्तव्यस्त वाहतूक व गतिरोधकांमुळे रुग्णांचे हाल होतात. सिग्नलवर नेहमीच वाहनांचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका रुग्णालयात तत्काळ पोहोचून शकत नाही. अशावेळी रुग्णांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. - अभिजित देशपांडे, रुग्णवाहिका चालक.