शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

एसबीआयच्या आणखी दोन खात्यांतून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:49 IST

स्टेट बँकेच्या खात्यांमधून परस्पर रक्कम काढून घेतली जात असल्याच्या धक्क्यातून खातेदार सावरले नसतानाच आता पुन्हा दोन खात्यांवर चोरांनी डल्ला मारला.

ठळक मुद्देअमरावतीकरांचे पैसे असुरक्षित : बँकाही अविश्वसनीय, पैसे ठेवायचे कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्टेट बँकेच्या खात्यांमधून परस्पर रक्कम काढून घेतली जात असल्याच्या धक्क्यातून खातेदार सावरले नसतानाच आता पुन्हा दोन खात्यांवर चोरांनी डल्ला मारला. या घटनेमुळे एसबीआयच्या खात्यांत रक्कम किती सुरक्षित, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नवसारी परिसरातील रहिवासी विष्णू श्यामराव बारब्दे यांच्या एसबीआय खात्यातून ३५ हजारांची रक्कम चोरण्यात आल्याची घटना मंगळवारी समोर आली. यासंदर्भात त्यांनी एसबीआयला तक्रार देऊन गाडगेनगर पोलिसांकडे धाव घेतली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातूनही एका खातेदाराची रक्कम परस्पर काढल्याची विश्वसनीय माहिती आहे. शहरात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण बँकांच्या विश्वासर्हतेवर परिणाम करीत असून, खातेदारांची संपत्तीही धोक्यात आली आहे.शहरात लाखो नागरिकांची विविध बँकांमध्ये खाती असून, त्यामध्ये कोट्यवधींची संपत्ती जमा आहे. सद्यस्थितीत शहरातील स्टेट बँकेच्याच खात्यातून रक्कम काढण्यात आल्याच्या घटना समोर येत आहेत. त्या अनुषंगाने सायबर सेलने केलेल्या चौकशीदरम्यान शहरातील एसबीआयच्या काही एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती लीक केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. ही रक्कम हरियाणा, गुडगाव व आसाम येथून काढण्यात आल्याची पुष्टी झाली असली तरी पोलिसांचे 'लांब' हात अद्याप गुन्हेगारांपर्यंत पोहोचले नाहीत.यांच्या खात्यातून काढली रक्कमजयवंत इंदूरकर (३२, रा. महेंद्र कॉलनी) यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार, सरस्वती नगरातील रहिवासी संतोष किरनाके यांच्या खात्यातून ६४ हजार ५०० व एका महिलेच्या खात्यातून १ लाख २० हजार उडविण्यात आले. या तिन्ही घटना १२ ते १३ आॅक्टोबरदरम्यान घडल्या. या तिघांचे बँक खाते राठीनगरातील एसबीआय शाखेत आहेत. बडनेरा येथील अरुण बेलखेडे यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार रुपये १३ ते १४ आॅक्टोबर दरम्यान काढण्यात आले. विनोद माणिक करंडे (रा.बारीपुरा, बडनेरा) यांच्या एसबीआयच्या चांदूर रेल्वे शाखेच्या खात्यातून १ लाखाची रक्कम काढण्यात आली. १५ ते १६ आॅक्टोबर दरम्यान हा प्रकार घडला. त्याचप्रमाणे शहरातील रहिवासी व मोर्शीत नोकरी करणारे शेख हनिस अब्दुल हमीद यांच्या मोर्शीतील एसबीआय खात्यातील ६० हजारांची रक्कम १६ ते १७ आॅक्टोबर दरम्यान राजस्थानमधील एटीएममधून परस्पर काढण्यात आली आहे. चंदननगरातील रहिवासी गोपाल विनायक इंगळे यांच्या बँक खात्यातून २७ सप्टेंबरपर्यंत १ लाख २७ हजारांची रक्कम लंपास झाली.खातेदारांनो सावधान!एसबीआयच्या खातेदारांची माहिती लीक झाल्याचे सायबर सेलने स्पष्ट केले असून, गुन्हेगारांनी एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती घेतल्याचे निदर्शनास आले आहे. एसबीआय खातेदारांनी आता सावध होण्याची गरज आहे. तपासाच्या अनुषंगाने काही एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस गोळा करीत आहेत.