शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
2
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
3
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
4
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
6
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
7
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
8
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
9
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
10
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
11
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
12
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
13
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
14
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
15
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
16
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
17
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
18
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
19
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
20
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

एसबीआयच्या आणखी दोन खात्यांतून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:49 IST

स्टेट बँकेच्या खात्यांमधून परस्पर रक्कम काढून घेतली जात असल्याच्या धक्क्यातून खातेदार सावरले नसतानाच आता पुन्हा दोन खात्यांवर चोरांनी डल्ला मारला.

ठळक मुद्देअमरावतीकरांचे पैसे असुरक्षित : बँकाही अविश्वसनीय, पैसे ठेवायचे कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्टेट बँकेच्या खात्यांमधून परस्पर रक्कम काढून घेतली जात असल्याच्या धक्क्यातून खातेदार सावरले नसतानाच आता पुन्हा दोन खात्यांवर चोरांनी डल्ला मारला. या घटनेमुळे एसबीआयच्या खात्यांत रक्कम किती सुरक्षित, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नवसारी परिसरातील रहिवासी विष्णू श्यामराव बारब्दे यांच्या एसबीआय खात्यातून ३५ हजारांची रक्कम चोरण्यात आल्याची घटना मंगळवारी समोर आली. यासंदर्भात त्यांनी एसबीआयला तक्रार देऊन गाडगेनगर पोलिसांकडे धाव घेतली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातूनही एका खातेदाराची रक्कम परस्पर काढल्याची विश्वसनीय माहिती आहे. शहरात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण बँकांच्या विश्वासर्हतेवर परिणाम करीत असून, खातेदारांची संपत्तीही धोक्यात आली आहे.शहरात लाखो नागरिकांची विविध बँकांमध्ये खाती असून, त्यामध्ये कोट्यवधींची संपत्ती जमा आहे. सद्यस्थितीत शहरातील स्टेट बँकेच्याच खात्यातून रक्कम काढण्यात आल्याच्या घटना समोर येत आहेत. त्या अनुषंगाने सायबर सेलने केलेल्या चौकशीदरम्यान शहरातील एसबीआयच्या काही एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती लीक केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. ही रक्कम हरियाणा, गुडगाव व आसाम येथून काढण्यात आल्याची पुष्टी झाली असली तरी पोलिसांचे 'लांब' हात अद्याप गुन्हेगारांपर्यंत पोहोचले नाहीत.यांच्या खात्यातून काढली रक्कमजयवंत इंदूरकर (३२, रा. महेंद्र कॉलनी) यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार, सरस्वती नगरातील रहिवासी संतोष किरनाके यांच्या खात्यातून ६४ हजार ५०० व एका महिलेच्या खात्यातून १ लाख २० हजार उडविण्यात आले. या तिन्ही घटना १२ ते १३ आॅक्टोबरदरम्यान घडल्या. या तिघांचे बँक खाते राठीनगरातील एसबीआय शाखेत आहेत. बडनेरा येथील अरुण बेलखेडे यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार रुपये १३ ते १४ आॅक्टोबर दरम्यान काढण्यात आले. विनोद माणिक करंडे (रा.बारीपुरा, बडनेरा) यांच्या एसबीआयच्या चांदूर रेल्वे शाखेच्या खात्यातून १ लाखाची रक्कम काढण्यात आली. १५ ते १६ आॅक्टोबर दरम्यान हा प्रकार घडला. त्याचप्रमाणे शहरातील रहिवासी व मोर्शीत नोकरी करणारे शेख हनिस अब्दुल हमीद यांच्या मोर्शीतील एसबीआय खात्यातील ६० हजारांची रक्कम १६ ते १७ आॅक्टोबर दरम्यान राजस्थानमधील एटीएममधून परस्पर काढण्यात आली आहे. चंदननगरातील रहिवासी गोपाल विनायक इंगळे यांच्या बँक खात्यातून २७ सप्टेंबरपर्यंत १ लाख २७ हजारांची रक्कम लंपास झाली.खातेदारांनो सावधान!एसबीआयच्या खातेदारांची माहिती लीक झाल्याचे सायबर सेलने स्पष्ट केले असून, गुन्हेगारांनी एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती घेतल्याचे निदर्शनास आले आहे. एसबीआय खातेदारांनी आता सावध होण्याची गरज आहे. तपासाच्या अनुषंगाने काही एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस गोळा करीत आहेत.