शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तरीही लहानेंना अभय का?

By admin | Updated: December 30, 2014 23:24 IST

तपोवनातील बालगृहात अनाथ, निराधार, निराश्रित मुली सुरक्षित नसल्याच्या मुद्यावर सर्वांचेच एकमत झाल्यानंतरच ११५ मुलींना इतरत्र हलविण्यात आले. अर्थात् तपोवनातील कारभारात अक्षम्य

हा तर दोषच ना ! : अंबापुरीच्या सन्मानावर घाला, नको कुणाचाही मुलाहिजा!गणेश देशमुख - अमरावतीतपोवनातील बालगृहात अनाथ, निराधार, निराश्रित मुली सुरक्षित नसल्याच्या मुद्यावर सर्वांचेच एकमत झाल्यानंतरच ११५ मुलींना इतरत्र हलविण्यात आले. अर्थात् तपोवनातील कारभारात अक्षम्य सदोषता होती, हेच यायोगे सिद्ध झाले. असा सदोष कारभार सातत्याने हाकला जात असताना तपोवनात संचालकपदी कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी अजय लहाने हे कोणते कर्तव्य पार पाडत होते, हा प्रश्न बोचणारा ठरतो. अजय लहाने यांची सुमारे पाच वर्षांपासून विदर्भ महारोगी सेवा संस्थेच्या संचालकपदी नेमणूक आहे. त्या संस्थेतील कारभार निर्दोष, नियमसंगत आणि बालहक्क संरक्षणाच्या दृष्टीने चालावा यासाठी शासनाच्या या अधिकाऱ्याची नेमणूक आहे. विदर्भ महारोगी सेवा संस्थेत लहाने यांच्या रूपाने असलेला हा शासनाचा ‘तिसरा डोळा’ होता. या डोळ्याला ते सर्व दिसणे अपेक्षित होते, जे संस्थेतील नजरांना कदाचित दिसणार नाही, कधिकाळी दिसूनही ते बघणार नाहीत. सतर्कता, दूरदृष्टी, आकलन, अचूक निर्णयक्षमता आणि परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अंगी असावे, अशी शासनाची अपेक्षा आहे. म्हणून तपोवनाच्या संचालकपदी तशा दर्जाच्या अनुभवसंपन्न अधिकाऱ्याचीच नेमणूक करण्यात आली. शासनाचा वर्ग एकचा अधिकारी संस्थेच्या संचालकपदी असल्यामुळे शासन निर्धास्त होते. तपोवनातील कारभार पार पाडताना लहाने यांनी शासनाला अपेक्षित असलेली 'घारीची नजर' बाळगायलाच हवी होती. तो त्यांच्या कर्तव्याचाच भाग होता. ती नजर लहाने यांनी बाळगली असती तर ज्या मुलींची आयुष्ये उद्ध्वस्त झालीत, ती बचावलीही असती. समाजाचे म्हणा की त्या मुलींचे, हे दुर्दैवच की, असा अधिकारी तपोवनाच्या वाट्याला संचालक म्हणून लाभला की, पाणी डोक्यावरून वाहू लागल्यावरही तो सुस्तच होता. त्याची निद्रा त्यावेळी भंगली ज्यावेळी त्याला करण्यालायक काहीच बाकी उरले नव्हते. संस्थेच्या घटनेत नमूद केल्याप्रमाणे, दैनंदिन कामकाजाची जबाबदारी संस्थेचे सचिव आणि संचालक यांच्या शिरावर आहे. अर्थात् सचिव आणि संचालक हे कमालीचे सतर्क असणे घटनेनुसार अपेक्षितही आहे नि बंधनकारकही! ज्यांच्या शिरावर जबाबदारी त्यांच्याच हाती अधिकारांचा राजदंडही असतो.