शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

अबलांवर लाठ्या, बच्चू कडूंचे अन्नत्याग

By admin | Updated: January 6, 2017 00:15 IST

शेतमालाला भाव मागण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुरुष, महिलांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्यानंतर नांगर आंदोलनाचे रुपांतर

बच्चू कडू म्हणतात, हे तर षड्यंत्रच : टप्प्या टप्प्याने आंदोलन तीव्र, आधी दिला ठिय्या नंतर त्यागले अन्न, आणखी दोन दिवस संघर्ष अमरावती : शेतमालाला भाव मागण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुरुष, महिलांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्यानंतर नांगर आंदोलनाचे रुपांतर ठिय्या आंदोलनात आणि उशिरा रात्री अन्नत्याग आंदोलनात करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता दिलेला ठिय्या वृत्त लिहिस्तोवर कायम होता. महिला-मुले अशा अबलांवर केलेला लाठीमार अत्यंत क्लेषदायक आहे. दोषींवर कारवाई व्हायलाच हवी, या मागणीच्या पूर्ततेसाठी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवून ते अन्नत्याग आंदोलनात रुपांतरित केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्री उशिरापर्यंत मोठा जनसमुदाय होता. कडाक्याच्या थंडीत उपाशीपोटी आमदार बच्चू कडू आणि सहभागी सर्व आंदोलक रात्र काढत होते. लाठीमार करायचाच होता तर पुरुषांवर करायला हवा होता. आम्ही छातीवर लाठ्या झेलायला तयार होतो. किमान एक सूचना तरी पोलिसांनी द्यायला हवी होती. लहान मुले, वृद्ध महिलांवर पोलीस बळाचा वापर करुच कसे शकतात, असा सवाल बच्चू कडू यांचा आहे. लाठीमार का करण्यात आला, आदेश दिले कुणी, आमचे काय चुकले, या प्रश्नांची उत्तरे बच्चू कडू यांना हवी आहेत. स्थितीचे गांभीर्य बघून जिल्हाधिकाऱ्यांनी सत्यपडताळणी अहवाल तातडीने मागितला. तथापि रात्री उशिरापर्यंत तो सादर व्हायचा होता. उशीर लागू द्या, आणखी दोन दिवस आम्ही अन्नपाण्याविना येथेच बसले राहू, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली. मीणा, पुंडकरांवर आरोप अमरावती : नांगर आंदोलनात अग्रस्थानी महिला असताना सुद्धा बळाचा वापर करण्यात पोलीस उपायुक्त शशिकुमार मीना, गाडगेनगरचे ठाणेदार पुंडकर यांनी पुढाकार घेतल्याचा आरोप आ.बच्चू कडुंनी केला. लाठीहल्ला करण्याचे आदेश कुणी दिलेत, असा सवाल आ. क डुंनी जिल्हाधिकाऱ्यांना केला. प्रहारचे कार्यकर्ते दोषी असतील तर कारवाई करा. मात्र, निरपराध महिला मोर्चेकऱ्यांवर लाठीहल्ला करणारे पोलीस उपायुक्त शशिकुमार मीना, गाडगेनगरचे ठाणेदार पुंडकर यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. ११ ला मोदींच्या जन्मगावी ‘आसूड’ आंदोलन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेले नांगर आंदोलन चिरडून काढण्यासाठी पोलिसांनी महिलांवर लाठीहल्ला केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचा आरोप आ. बच्चू कडू यांनी केला. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मगावी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीदिनी म्हणजे ११ एप्रिल रोजी आसूड आंदोलन क रणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मायक्रो फायनान्स कार्यालयांना आठ दिवसांत कुलूप ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांच्या जाचामुळे आतापर्यंत चार महिलांनी अआत्महत्या करून मृत्युला कवटाळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात मायक्रो फायनान्सचे कार्यालय सुरु असल्यास त्याचे छायाचित्र दाखवा. आठवडाभरात या कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिला आहे. विनोद शिरभाते, ईब्राहिम चौधरी यांची शिष्टाई प्रहारच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर आ.बच्चू कडुंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात येऊन शेतकऱ्यांच्या मागण्या-समस्या मांडाव्यात, याकरिता निवासी उपजिल्हाधिकारी विनोद शिरभाते, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी हे मोर्चेकऱ्यांना सामोरे गेलेत. आ.कडुंची भेट घेऊन त्यांनी चर्चेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात यावे, असे सांगितले. त्यानुसार आ. कडुंसह प्रहारचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांकडे चर्चेसाठी गेलेत, हे विशेष. बच्चू कडूंवर दाखल होणार गुन्हे जिल्ह्यात बुधवारी रात्री १२ वाजतापासून पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे मतदारांना प्रलोभन देऊन मोर्चात आणता येत नाही किंवा मतदारांवर प्रभाव पडेल असे कृत्य करता येत नाही. त्यामुळे आ. बच्चू कडू व सहकाऱ्यांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. तुरीवरचा दवाळ शासनाला दिसत नाही काय? तुरीवर दवाळ आल्याने जिल्ह्यातील तुरीचे पीक जागीच जळत आहे, हे शासनाला दिसत नाही काय? असा सवाल आ. बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. तीन तालुक्यांत दवाचा प्रादुर्भाव अधिक आहे. कृषीविभागाद्वारे यापिकांची पाहणी करून तसा अहवाल शासनाला पाठविल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.