शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

राज्याच्या महिला, बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाडच !

By admin | Updated: August 19, 2015 00:48 IST

राज्यात सत्तापालट होऊन एक वर्ष झाले. मात्र जिल्ह्याच्या मिनीमंत्रालयात अद्यापही राज्याच्या मागील आघाडी सरकारच्या कार्यकाळात महिला...

दुर्लक्ष : आघाडी सरकारच्या कार्यकाळातील फलक अद्यापही कायम अमरावती : राज्यात सत्तापालट होऊन एक वर्ष झाले. मात्र जिल्ह्याच्या मिनीमंत्रालयात अद्यापही राज्याच्या मागील आघाडी सरकारच्या कार्यकाळात महिला व बालकल्याण मंत्री असलेल्या वर्षा गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख असलेले फलक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या इमारतीवर मोठ्या दिमाखाने झळकत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नसून प्रशासन किती सजग आहे, याचा परिपाक या निमित्ताने अनुभवास येत आहे. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण आहार अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती दर्शविणारे भले मोठे फलक जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा परिषदेच्या आवारात नागरिकांच्या माहितीसाठी लावले आहे. सदर योजना व अभियान मागील आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू झाल्याने या माहिती दर्शविणाऱ्या फलकावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड व याच विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान या चार मंत्र्यांचे छायाचित्र या माहिती फलकावर आद्यापही झळकत आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप -शिवसेनेचे युती सरकार सत्तारुढ झाल्यानंतरही शासकीय कार्यालयांत मात्र जुन्या आघाडी सरकारचाच बोलबाला कायम असल्याचा प्रत्यय या निमित्ताने स्पष्ट दिसून येत आहे. एकीकडे राज्य शासन शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृतीच्या नावावर लाखो रुपये खर्च करते. मात्र सरकारी काम व दफ्तरदिरंगाईत 'थांब' या म्हणीप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा जनहितासाठी किती जागरूक आहे, हे यावरुन दिसून येते. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेल्या जिल्हा परिषदेत एवढी मोठी अनभिज्ञता सर्वांच्या दृष्टीस पडत असताना जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडू नये, हा आश्चर्याचा विषय ठरला आहे.