शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
3
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
4
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
5
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
6
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
7
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
8
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
9
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
10
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
11
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
12
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
13
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
14
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
15
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
16
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
17
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
18
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
19
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
20
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय

शेततळे योजनेच्या आॅनलाईन अर्जाला सुरुवात

By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST

शेतकऱ्यांकडे त्यांची स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही वैयक्तिक लाभाची ...

संकेतस्थळावर अर्ज : प्रथम येणाऱ्या अर्जाला प्राधान्यअमरावती : शेतकऱ्यांकडे त्यांची स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही वैयक्तिक लाभाची योजना शासनाने सुरू केली. याअंतर्गत राज्यात ५१ हजार व विभागात १३ हजार शेततळे उभारणीचे लक्ष्य आहे. योजनेच्या आॅनलाईन अर्ज नोंदणीला सोमवारपासून सुरुवात झाली. प्रथम येणाऱ्या अर्जाला प्राधान्य दिले जाईल. हे अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंधारणाच्या माध्यमातून उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून शासनाद्वारे यापूर्वीच शेततळे योजना राबविण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झालेली आहे. सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांकडे स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण होण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही वैयक्तिक लाभाची योजना शासनाने सुरू केली. यासाठी शेतकऱ्यांकडे स्वत:ची कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे. यात कमाल मर्यादा नाही. शेतकऱ्यांची जमीन शेततळ्यांकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे गरजेचे आहे. शिवाय दारिद्र्यरेषेखालील शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना निवड प्रक्रियेत ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येणार आहे. ५० हजारांचे अनुदानया योजनेत प्रत्येक शेततळ्याला ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. ३० मीटर लांब व ३० मीटर रुंद व ३ मीटर खोल या आकारमानाचे छोटे शेततळे खोदण्यासाठी हे अनुदान मिळणार आहे. पाच वर्षांत किमान एकदा तरी ५० पैशाच्या खाली आणेवारी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना प्राधान्याने हे शेततळे मिळणार आहेत. यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या गठित करण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय समितीचे पालकमंत्री प्रमुख आहेत.