शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

दारुबंदी प्रक्रियेला प्रारंभ

By admin | Updated: March 13, 2017 00:01 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायवेवरील ५०० मीटरच्या अंतरावरील सर्व प्रकारची मद्यविक्रीची दुकाने हद्दपार करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे.

‘हायवे’वरील मोजमाप पूर्ण : ३१ मार्चनंतर ‘त्या’ मद्यविक्री परवान्यांचे नूतनीकरण नाहीअमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायवेवरील ५०० मीटरच्या अंतरावरील सर्व प्रकारची मद्यविक्रीची दुकाने हद्दपार करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अन्य यंत्रणांच्या माध्यमातून हायवेवरील अंतराचे मोजमाप पूर्ण केले असून त्याअनुषंगाने राज्य शासनाकडे अहवाल पाठविला आहे.हायवेवरील बियरबार, मद्यविक्रीची दुकाने हटविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य तत्सम यंत्रणांच्या सहकार्याने महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारुविक्री व बियरबार, परमीट रूमचे अंतर निश्चित करुन त्यांची परवानगी घेतली जात आहे. यात बांधकाम विभागाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. ३१ मार्च २०१७ नंतर हायवेवरील दारुविक्री, बियर बार परवान्यांचे नूतनीकरण करु नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. अशी माहिती राज्य उत्पादनशुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानभवनात दिली. याबाबतची चिंता आता मद्यविक्रेत्यांना लागून राहिली आहे. तामिळनाडू राज्य विरुद्ध के.बालू व इतरांद्वारे दाखल सिव्हिल अपीलावर आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. ही कार्यवाही निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली होती. यासमितीची बैठक जानेवारी २०१७ मध्ये पार पडली. त्यानुसार महामार्गावरील ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री दुकानांचे मोजमाप करून संकलन करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘आहार’चे २० मार्चकडे लक्षआॅल इंडिया हॉटेल अ‍ॅन्ड रेस्टारेंट संघटनेच्यावतीने (आहार) सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या पाच बेंचपुढे सादर करण्यात आली आहे. याचिकेवर २० मार्च रोजी सुनावणी होणार असल्याने एकुणच मद्यविक्रेत्यांच्या नजरा २० मार्चकडे लागल्या आहेत.जिल्ह्यात ३९८ मद्यपरवान्यांचे नूतनीकरण नाहीसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री दुकानांवर कारवाई करायची झाल्यास जिल्ह्यात ४८२ पैकी ३९८ मद्यविक्री दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण होणार नाही, असे संकेत आहेत. त्यानुसार राज्य सरकारकडे उत्पादन शुल्क विभागाने अहवाल पाठविला आहे.