शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदी प्रक्रियेला प्रारंभ

By admin | Updated: March 13, 2017 00:01 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायवेवरील ५०० मीटरच्या अंतरावरील सर्व प्रकारची मद्यविक्रीची दुकाने हद्दपार करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे.

‘हायवे’वरील मोजमाप पूर्ण : ३१ मार्चनंतर ‘त्या’ मद्यविक्री परवान्यांचे नूतनीकरण नाहीअमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायवेवरील ५०० मीटरच्या अंतरावरील सर्व प्रकारची मद्यविक्रीची दुकाने हद्दपार करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अन्य यंत्रणांच्या माध्यमातून हायवेवरील अंतराचे मोजमाप पूर्ण केले असून त्याअनुषंगाने राज्य शासनाकडे अहवाल पाठविला आहे.हायवेवरील बियरबार, मद्यविक्रीची दुकाने हटविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य तत्सम यंत्रणांच्या सहकार्याने महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारुविक्री व बियरबार, परमीट रूमचे अंतर निश्चित करुन त्यांची परवानगी घेतली जात आहे. यात बांधकाम विभागाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. ३१ मार्च २०१७ नंतर हायवेवरील दारुविक्री, बियर बार परवान्यांचे नूतनीकरण करु नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. अशी माहिती राज्य उत्पादनशुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानभवनात दिली. याबाबतची चिंता आता मद्यविक्रेत्यांना लागून राहिली आहे. तामिळनाडू राज्य विरुद्ध के.बालू व इतरांद्वारे दाखल सिव्हिल अपीलावर आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. ही कार्यवाही निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली होती. यासमितीची बैठक जानेवारी २०१७ मध्ये पार पडली. त्यानुसार महामार्गावरील ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री दुकानांचे मोजमाप करून संकलन करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘आहार’चे २० मार्चकडे लक्षआॅल इंडिया हॉटेल अ‍ॅन्ड रेस्टारेंट संघटनेच्यावतीने (आहार) सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या पाच बेंचपुढे सादर करण्यात आली आहे. याचिकेवर २० मार्च रोजी सुनावणी होणार असल्याने एकुणच मद्यविक्रेत्यांच्या नजरा २० मार्चकडे लागल्या आहेत.जिल्ह्यात ३९८ मद्यपरवान्यांचे नूतनीकरण नाहीसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री दुकानांवर कारवाई करायची झाल्यास जिल्ह्यात ४८२ पैकी ३९८ मद्यविक्री दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण होणार नाही, असे संकेत आहेत. त्यानुसार राज्य सरकारकडे उत्पादन शुल्क विभागाने अहवाल पाठविला आहे.