शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

दर्यापुरात अवकाळीचा मारा सुरूच

By admin | Updated: March 13, 2015 00:17 IST

तालुक्यावर अवकाळी पावसाची वक्रदृष्टी कायम असून बुधवारनंतर गुरूवारीदेखील तालुक्याला पावसाने झोडपूून काढले.

किरण होले दर्यापूरतालुक्यावर अवकाळी पावसाची वक्रदृष्टी कायम असून बुधवारनंतर गुरूवारीदेखील तालुक्याला पावसाने झोडपूून काढले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने जगावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांनी हरभरा कापून त्याचे ढीग शेतात रचून ठेवले होते. मात्र, बुधवारी पहाटे आणि गुरूवारी बरसलेल्या अवकाळी पावसाने हे पीक भिजले. त्यामुळे हरभरा काळा पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे. यापूर्वीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची इतर पिके हातची गेली. त्यामुळे त्यांची सगळी भिस्त आता हरभऱ्यावरच होती. परंतु अवकाळी पावसाने हरभऱ्याचीदेखील पूरती वाट लावली आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांचे २० ते २५ पोत्यांचे नुकसान झाले. शासनाकडून पुरेशी आर्थिक मदत मिळेलच याची काही शाश्वती नसल्याने पेरणीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकरी गुरफटला आहे. खरिपाचे पीक हातचे गेल्यानंतर सारी मदार रबी पिकावर होती. परंतु अवकाळी पावसाने रबीवरही कुठाराघात केला. हरभरा कापणीवर आला असताना अचानक पाऊस बरसल्याने सवंगणीत अडचणी निर्माण झाल्या. जेमतेम सवंगणी करून ठेवलेला हरभरा शेतात गंजी लावून ठेवला. त्यावर दोन दिवस पाऊस बरसल्याने काढणीला उसंत मिळू शकली नाही. त्यामुळे गंजीतला हरभरा पाण्यात ओला झाल्याने काळा पडण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. पुन्हा शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची पार दैना झाली आहे. शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली जात आहे.