शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

प्राथमिक शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:16 IST

धारणी : राज्यात मागील मार्च २०२० पासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

धारणी : राज्यात मागील मार्च २०२० पासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कोरोना महामारीच्या नियमांना अनुसरून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू कराव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या धारणी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अतुल पटोले यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे केली.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता ऑॅनलाईन शिक्षण यशस्वी होणे शक्य नाही. नेटवर्क समस्यामुळे ग्रामीण व गरीब पालकांना परवडणारे नसल्याने ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षण हा पाया असून तोच ठिसूळ होत असल्याचे चित्र आहे. कोरोना महामारीच्या नियम व अटीनुसार इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग ग्रामीण भागात सुरू आहेत. मात्र, यामुळे ग्रामीण क्षेत्रात कोरोना वाढलेला नाही. त्यामुळे पहिली ते सातवीचे टप्प्याने वर्ग सुरू करण्यास हरकत नसल्याचासुद्धा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे थांबविण्यासाठी प्राथमिक शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अमरावती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रभुदास बिसंदरे, जिल्हा कार्यवाह रवींद्र घवळे, शिक्षक बँकेचे संचालक तथा जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चौकसे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज कांदे, परिषदेचे धारणी तालुका अध्यक्ष संजय गंगराडे, तालुका कार्यवाह प्रशांत रोहणकर, तालुका कार्याध्यक्ष विजय जावरकर, तालुका उपाध्यक्ष गोविंद फुलमाली, तालुका उपाध्यक्ष उमेश पटोरकर, कार्यकारिणी सदस्य उमेश आकोडे, तालुका कोषाध्यक्ष राजेश खाडे, संघटक रवींद्र मालवीय उपस्थित होते.