शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विधिमंडळात तारांकित; शिक्षकांना अशैक्षणिक कामे नकोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 10:52 IST

राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे सोपविली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा पोहोचत असल्याप्रकरणी २० आमदारांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आहे.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण आदींचा पुढाकार

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे सोपविली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा पोहोचत असल्याप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसह २० आमदारांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आहे. पुढील सोमवारी या विषयावर विरोधी पक्षाचे सदस्य सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती आहे.‘राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याबाबत’ यावर तारांकित प्रश्न क्रमांक १२६७२३ विधिमंडळाने स्वीकारला आहे. त्याअनुषंगाने विधानमंडळ सचिवालय कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून माहिती गोळा करीत आहेत. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे या प्रश्नाच्या अनुषंगाने विधिमंडळात उत्तर देणार असल्याची बाब स्पष्ट केली आहे. येत्या काळात निवडणुकांच्या अनुषंगाने नवीन मतदार यादी करण्यासाठी बीएलओ म्हणून शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. जे शिक्षक हे काम स्वीकारणार नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून दाखल केले जाणार आहेत. एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र साकारण्याचे उद्दिष्ट असताना, प्रत्यक्षात अध्यापनापेक्षा अशैक्षणिक कामांमध्ये शिक्षकांना गुंतवून ठेवण्याचा डाव रचला जात आहे. त्यामुळे शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याप्रकरणी शासनाने चौकशी केली असल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली? कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे आदी विषयांवर आमदारांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.शिक्षणाचे तीनतेरा वाजत असताना राज्य सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाही. शिक्षकांवर अध्यापनाची प्रमुख जबाबदारी न सोपविता अशैक्षणिक कामे दिली जात आहे. हा विषय गंभीर असून, सरकारला तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने जाब विचारला जाईल.- राधाकृष्ण विखे पाटीलविरोधी पक्ष नेता, विधानसभा.राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा पाठपुरावाशिक्षकांवर अशैक्षणिक कामे सोपविण्याचा सपाटा सुरू झाला आहे. त्यामुळे अध्यापनकार्य दुय्यम होत चालले आहे. ही बाब शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बाधा पोहचविणारी आहे. शासनाने यासंदर्भात विशेष काळजी घेण्याबाबतचा पाठपुरावा राज्य प्राथमिक शिक्षक समितीने घेतल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र