शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

धारणीत प्रशिक्षणाच्या नावाखाली दांडी मारण्याचा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:44 IST

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभाराला गटशिक्षणाधिकाऱ्यांकडूनच खतपाणी घातले जात असल्याने येथील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देगटशिक्षणाधिकाऱ्यांची धृतराष्ट्राची भूमिका : मेळघाटात शिक्षणाचे तीनतेरा

आॅनलाईन लोकमतधारणी : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभाराला गटशिक्षणाधिकाऱ्यांकडूनच खतपाणी घातले जात असल्याने येथील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दुर्गम व अतिदुर्गम शाळेतील शिक्षक प्रशिक्षणाच्या नावाखाली आळीपाळीने कर्तव्य बजावून शाळा उघडण्याचे सोपस्कार पार पाडतात. मुख्यालयातील व तालुक्याच्या जवळपासच्या शिक्षकांनी नवीनच तंत्राचा वापर केला आहे.सध्या केंद्र शाळानिहाय शिक्षकांना विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक शाळेतील शिक्षकांना गुरूवार, शुक्रवार व शनिवार असे तीन दिवस प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी गुरुवार व शुक्रवारी १०.३० ते ५, तर शनिवारी सकाळी ७.३० ते ११ असे शालेय वेळापत्रकाप्रमाणे ठरविण्यात आले आहे. यासाठी निवड झालेल्या शिक्षकांना शाळेत जाण्यापासून सूट मिळते. प्रशिक्षण स्थळी चहा, नाश्ता व जेवणाची सुविधा केली जाते. मात्र, या प्रशिक्षणाला बहुतांश शिक्षक दांडी मारतात. शाळांमध्येही अनेक शिक्षक केवळ स्वाक्षरी करून गायब होत असल्याचे चित्र आहे. शनिवारीही स्वाक्षरी करून गावाकडे निघण्याचा सपाटाच शिक्षकांनी लावला. प्रस्तुत प्रतिनिधीने तालुक्यातील जुटपानी, बारू, बिजुधावडी, माणसुधावडी, गडगा मालूर, झिलांगपाटी, तातरा, मोगर्दा या शाळांना सकाळी ८ ते १०.३० दरम्यान भेटी दिल्या असता, या शाळांतील अर्धे शिक्षक बेपत्ता होते. शिक्षकच येत नसल्याने विद्यार्थीही दांड्या मारण्यात पटाईत झाल्याचे दिसून आले. एका वर्गात दोन ते चार विद्यार्थीच दिसले.गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळते साचेबद्ध उत्तरपं.स. गटशिक्षणाधिकारी यांचे शिक्षणाकडे दुर्लत सतत होत असते. तक्रारींवर कारवाई ऐवजी ‘समायोजन’ करण्याकडेच त्यांचे प्राधान्य असते. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मी चौकशी करतो’ असे नेहमीचे साचेबद्ध उत्तर मिळाले.शनिवार व सोमवारी हमखास दांडीतालुक्यातील जि. प. शाळेतील आठवड्यातील पहिला दिवस व शेवटच्या दिवशी शिक्षकांची उपस्थिती नगण्य असते. सोमवारी उशिरा शाळेत पोहोचणे व शनिवारी जमल्यास दांडी मारणे किंवा लवकर निघून जाणे हा क्रमच ठरला आहे. याकडे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांचे कमालीचे दुर्लक्ष असून, नुकसान गरीब विद्यार्थ्यांना होत आहे.