शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

एसटीच्या टोलमुक्तीची घोषणा हवेतच

By admin | Updated: August 19, 2014 23:26 IST

टोलच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये सरकारच्या घोषणा हवेतच विरली आहे. मागील जुलै महिन्यात राज्य सरकारने विधानसभेत एसटीला टोलमुक्त करण्याची घोषणा केली होती.

अमरावती : टोलच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये सरकारच्या घोषणा हवेतच विरली आहे. मागील जुलै महिन्यात राज्य सरकारने विधानसभेत एसटीला टोलमुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जुलै महिन्यापासून एसटी टोल भरणे बंद करेल असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र एसटीला टोलपासून सुटका मिळालेलीच नाही. राज्यातील विविध टोल नाक्यावर एसटी आजही टोल भरतेच आहे त्यामुळे एसटीच्या टोलमुक्तीची घोषणा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केल्याची चर्चा सुरू झाली आहे. एसटीला टोलमधून वगळण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली होती. जुलै महिन्यात घोषणा प्रत्यक्षात येणार असल्याचे बोलले जात होते परंतु प्रत्यक्षात आॅगस्ट महिना उजाडला तरीही एसटीला टोल भरणे चुकलेले नाही. राज्यातील ४४ बंद केलेल्या टोल नाक्याचेच पत्र महामंडळाला प्राप्त झाले आहे. त्याउपर टोलमुक्तीच्या घोषणेबाबत काहीही अधिकृत माहिती सरकारकडून मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. टोल नाका चालकांशीही संपर्क केला असता एसटीला टोलमधून वगळण्याबाबत अधिकृत काहीच माहिती नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे राज्य शासनाने विधानसभेत टोलमुक्तीच्या धोरणाबाबत निर्णय घेण्याचे सुतोवाच केले असली तरी प्रत्यक्षात शासन निर्णयाची अंमलबजावणी वेळीच होत नसल्याने याचा फायदा कुठल्याही शासकीय यंत्रणेला असो की सामाजिक नागरिकांना होत नाही. परिणामी घोषणा करुन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)