शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

एसटी फेऱ्या वाढणार: आठवडाभरात १५०० संपकरी कामावर परतले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

एसटीच्या अमरावती विभागातील अनेक कर्मचारी गत पाच महिन्यांपासून संपावर होते.  त्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा प्रभावित झाली होती. आता हळूहळू कर्मचारी कामावर परत येत आहेत. जिल्ह्यातील एकूण ८ आगारामधील एकंदरीत ३७७ बसगाड्यांपैकी २१५ बस आता रस्त्यावर धावू लागल्या  आहेत. सर्वच प्रमुख शहरांसाठी बसगाड्या उपलब्ध झाल्या आहेत तथापी अजूनही ग्रामीण भागात लालपरी धावत नसल्याने गावकऱ्यांची अडचण कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप आता संपुष्टात येत आहे. उच्च न्यायालयाने येत्या २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याचे आदेश दिला आहे. त्यामुळे कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये आतापर्यंत  १ हजार ६००  कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत; परिणामी लालपरी पूर्वपदावर येत आहे.एसटीच्या अमरावती विभागातील अनेक कर्मचारी गत पाच महिन्यांपासून संपावर होते.  त्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा प्रभावित झाली होती. आता हळूहळू कर्मचारी कामावर परत येत आहेत. जिल्ह्यातील एकूण ८ आगारामधील एकंदरीत ३७७ बसगाड्यांपैकी २१५ बस आता रस्त्यावर धावू लागल्या  आहेत. सर्वच प्रमुख शहरांसाठी बसगाड्या उपलब्ध झाल्या आहेत तथापी अजूनही ग्रामीण भागात लालपरी धावत नसल्याने गावकऱ्यांची अडचण कायम आहे.

४०० चालक ५०० वाहक परतले जिल्ह्यातील ८ आगारातील संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ४०० चालक,५०० वाहक आणि ७०० यांत्रिकी व प्रशासकीय कर्मचारी कामावर परतले आहे.  अजूनही बरेच कर्मचारी कामावर रुजू झालेले नसले तरी २२ एप्रिलपर्यंत बहुतांश कर्मचारी कर्तव्यावर परतण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बस फेऱ्या सुरू होऊन येत्या आठवडाभरात लालपरी पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत.

२२ एप्रिलची डेडलाईन

- संपकरी कर्मचाऱ्यांना २२ पर्यंत कामावर  हजार व्हावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. परत येणाऱ्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशात नमूद आहे. - बडतर्फ कर्मचाऱ्यांना अपील सादर करून सुनावणी झाल्यानंतर कामावर रुजू करून घेण्यात येत आहे.- २२ नंतरही रुजू न होणाऱ्यांचा विचार केला जाणार नाही.

एसटीच्या फेऱ्या वाढणार

- संपातील कर्मचारी हळूहळू कामावर परत येत असल्यामुळे सर्व आगारातील  अनेक बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर एसटीच्या फेऱ्या वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप