शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

एसटी फेऱ्या वाढणार: आठवडाभरात १५०० संपकरी कामावर परतले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

एसटीच्या अमरावती विभागातील अनेक कर्मचारी गत पाच महिन्यांपासून संपावर होते.  त्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा प्रभावित झाली होती. आता हळूहळू कर्मचारी कामावर परत येत आहेत. जिल्ह्यातील एकूण ८ आगारामधील एकंदरीत ३७७ बसगाड्यांपैकी २१५ बस आता रस्त्यावर धावू लागल्या  आहेत. सर्वच प्रमुख शहरांसाठी बसगाड्या उपलब्ध झाल्या आहेत तथापी अजूनही ग्रामीण भागात लालपरी धावत नसल्याने गावकऱ्यांची अडचण कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप आता संपुष्टात येत आहे. उच्च न्यायालयाने येत्या २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याचे आदेश दिला आहे. त्यामुळे कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये आतापर्यंत  १ हजार ६००  कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत; परिणामी लालपरी पूर्वपदावर येत आहे.एसटीच्या अमरावती विभागातील अनेक कर्मचारी गत पाच महिन्यांपासून संपावर होते.  त्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा प्रभावित झाली होती. आता हळूहळू कर्मचारी कामावर परत येत आहेत. जिल्ह्यातील एकूण ८ आगारामधील एकंदरीत ३७७ बसगाड्यांपैकी २१५ बस आता रस्त्यावर धावू लागल्या  आहेत. सर्वच प्रमुख शहरांसाठी बसगाड्या उपलब्ध झाल्या आहेत तथापी अजूनही ग्रामीण भागात लालपरी धावत नसल्याने गावकऱ्यांची अडचण कायम आहे.

४०० चालक ५०० वाहक परतले जिल्ह्यातील ८ आगारातील संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ४०० चालक,५०० वाहक आणि ७०० यांत्रिकी व प्रशासकीय कर्मचारी कामावर परतले आहे.  अजूनही बरेच कर्मचारी कामावर रुजू झालेले नसले तरी २२ एप्रिलपर्यंत बहुतांश कर्मचारी कर्तव्यावर परतण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बस फेऱ्या सुरू होऊन येत्या आठवडाभरात लालपरी पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत.

२२ एप्रिलची डेडलाईन

- संपकरी कर्मचाऱ्यांना २२ पर्यंत कामावर  हजार व्हावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. परत येणाऱ्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशात नमूद आहे. - बडतर्फ कर्मचाऱ्यांना अपील सादर करून सुनावणी झाल्यानंतर कामावर रुजू करून घेण्यात येत आहे.- २२ नंतरही रुजू न होणाऱ्यांचा विचार केला जाणार नाही.

एसटीच्या फेऱ्या वाढणार

- संपातील कर्मचारी हळूहळू कामावर परत येत असल्यामुळे सर्व आगारातील  अनेक बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर एसटीच्या फेऱ्या वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप