शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

एसटी आंदोलकांचे पुढे काय; माझ्या गावात बस येणार नाय काय? ग्रामीण प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 18:05 IST

मुख्य मार्गावर बस सुरू झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात बस अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तातडीने बस सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देविलीनीकरणाची शक्यता कमीच, कर्मचाऱ्यांचा लढा राहणार सुरूच

अमरावती : एसटी महामंडळ विलीनीकरणाची शक्यता आता संपुष्टात आली आहे. विलीनीकरण होणार नसल्याचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पुढे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे अद्यापही अनेक गावात बसेस सुरू नाही. त्यामुळे गावात बस कधी येणार, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.

चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अद्यापही हा संप मिटलेला नाही. परिवहन मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ४६६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यानुसार १२३ बस विविध मार्गांवर धावत आहे. दररोज ४११ बसच्या फेऱ्या होत असून १३ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. अद्यापही २०० पेक्षा जास्त बस बंद आहेत आणि १,२६६ कर्मचारी संपावर आहेत.

ग्रामीण भागातील एसटी बंदच

मुख्य मार्गावर बस सुरू झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात बस अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तातडीने बस सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.

४५० जण बडतर्फ

वारंवार आवाहन करूनही कामावर हजर न झालेल्या ४५० जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी अपील करून कामावर हजर व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एसटी महामंडळ विलीनीकरणाची शक्यता आता संपुष्टात आली आहे. विलीनीकरण होणार नसल्याचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी कामावर हजर झाले पाहिजे.

- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक

आंदोलक कर्मचारी काय म्हणतात?

चार महिन्यांपासून आम्ही आमच्या हक्कासाठी आंदोलन करीत आहोत. आम्हाला वाटले होते की, विलीनीकरण होईल, परंतु तसे झाले नाही. आमचा लढा सुरू राहणार आहे. ५ एप्रिल रोजी यावर न्यायालयात सुनावणी आहे. त्यानंतर संपाबाबत निर्णय होईल.

- संजय मालवीय, संपकरी एसटी कर्मचारी

आम्ही गेल्या चार महिन्यांपासून विलीनीकरणासाठी आंदोलन करीत आहोत. आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. शासनाने आमचा विचार करून विलीनीकरण द्यावे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील.

- सतीश कडू, संपकरी एसटी कर्मचारी

टॅग्स :ST Strikeएसटी संपroad transportरस्ते वाहतूक