शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बस बंद, ग्रामीण नागरिकांचे हाल; खासगी वाहनांना सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:01 IST

लग्न, अंत्यविधी, तेरवी, दवाखाने, बाजारपेठेसाठी होणारा प्रवास व कार्यालयीन कामकाजासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे आदी बाबींसाठी प्रवास करण्यासाठी एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. एसटी बंद असल्याने धानोरा गुरव, माहुली चोर, पिंपळगाव निपाणी, नांदसावंगी, खंडाळा, येणस, सुलतानपूर, वाघोडा, मंगरूळ चव्हाळा तसेच परिसरातील गावातील शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे.

संजय जेवडे लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासासाठी प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. खाजगी वाहनाने प्रवास करताना प्रवाशांना ज्यादा भाड्याचा भुर्दंड पडत आहे. अतिमहत्त्वाच्या कामास जायचे असले, तर काही किलोमीटरच्या प्रवासासाठी संपूर्ण दिवस लागतो, असेही कित्येक प्रवाशांनी सांगितले. लग्न, अंत्यविधी, तेरवी, दवाखाने, बाजारपेठेसाठी होणारा प्रवास व कार्यालयीन कामकाजासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे आदी बाबींसाठी प्रवास करण्यासाठी एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. एसटी बंद असल्याने धानोरा गुरव, माहुली चोर, पिंपळगाव निपाणी, नांदसावंगी, खंडाळा, येणस, सुलतानपूर, वाघोडा, मंगरूळ चव्हाळा तसेच परिसरातील गावातील शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. कधी एकदाची एसटी सुरू होते, ही आस नागरिकांना लागली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा ही ग्रामीण भागाची जीवनदायी ठरली असून ती ठप्प झाल्याने बरेच दिवसापासून प्रवाशांचे हाल सुरू आहे.

नांदगाव तालुक्यातील एसटी फेऱ्या नांदगाव खंडेश्वर बस स्थानकाहून अमरावती ते हैदराबाद, अमरावती ते पुसद, अमरावती ते पांढरकवडा, अमरावती ते माहूर, अमरावती ते चंद्रपूर, वरूड ते यवतमाळ, यवतमाळ ते तेल्हारा, दर्यापूर ते यवतमाळ, अमरावती ते बोरी, अमरावती ते मंगरूळ चव्हाळा, अमरावती ते खरबी, चांदूर ते नांदगाव खंडेश्वर अशा एसटीच्या फेऱ्या होत्या. धानोरा गुरववरून अमरावती ते दारव्हा, अमरावती ते वाढोणा रामनाथ या फेऱ्या होत्या. त्यामुळे नागरिकांची प्रवासाची सोय होत होती. पण, आता एसटी फेर्या बंद असल्याने प्रवाशांना अनेक तास बस स्टॉपवर खासगी वाहनाच्या शोधात ताटकळत थांबावे लागते. 

एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. शासनाने तोडगा काढून पूर्ववत सुरू करावी.- ओंकार ठाकरे, माजी सभापती, पंचायत समिती 

एसटी सेवा ठप्प झाल्याने नागरिक, शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. नागरिकांना खासगी वाहनाचा खर्च झेपत नाही. - नारायणदास वैष्णव, विश्वस्त, श्री खंडेश्वर संस्थान

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप