शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

एसटी बस बंद, ग्रामीण नागरिकांचे हाल; खासगी वाहनांना सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:01 IST

लग्न, अंत्यविधी, तेरवी, दवाखाने, बाजारपेठेसाठी होणारा प्रवास व कार्यालयीन कामकाजासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे आदी बाबींसाठी प्रवास करण्यासाठी एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. एसटी बंद असल्याने धानोरा गुरव, माहुली चोर, पिंपळगाव निपाणी, नांदसावंगी, खंडाळा, येणस, सुलतानपूर, वाघोडा, मंगरूळ चव्हाळा तसेच परिसरातील गावातील शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे.

संजय जेवडे लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासासाठी प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. खाजगी वाहनाने प्रवास करताना प्रवाशांना ज्यादा भाड्याचा भुर्दंड पडत आहे. अतिमहत्त्वाच्या कामास जायचे असले, तर काही किलोमीटरच्या प्रवासासाठी संपूर्ण दिवस लागतो, असेही कित्येक प्रवाशांनी सांगितले. लग्न, अंत्यविधी, तेरवी, दवाखाने, बाजारपेठेसाठी होणारा प्रवास व कार्यालयीन कामकाजासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे आदी बाबींसाठी प्रवास करण्यासाठी एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. एसटी बंद असल्याने धानोरा गुरव, माहुली चोर, पिंपळगाव निपाणी, नांदसावंगी, खंडाळा, येणस, सुलतानपूर, वाघोडा, मंगरूळ चव्हाळा तसेच परिसरातील गावातील शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. कधी एकदाची एसटी सुरू होते, ही आस नागरिकांना लागली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा ही ग्रामीण भागाची जीवनदायी ठरली असून ती ठप्प झाल्याने बरेच दिवसापासून प्रवाशांचे हाल सुरू आहे.

नांदगाव तालुक्यातील एसटी फेऱ्या नांदगाव खंडेश्वर बस स्थानकाहून अमरावती ते हैदराबाद, अमरावती ते पुसद, अमरावती ते पांढरकवडा, अमरावती ते माहूर, अमरावती ते चंद्रपूर, वरूड ते यवतमाळ, यवतमाळ ते तेल्हारा, दर्यापूर ते यवतमाळ, अमरावती ते बोरी, अमरावती ते मंगरूळ चव्हाळा, अमरावती ते खरबी, चांदूर ते नांदगाव खंडेश्वर अशा एसटीच्या फेऱ्या होत्या. धानोरा गुरववरून अमरावती ते दारव्हा, अमरावती ते वाढोणा रामनाथ या फेऱ्या होत्या. त्यामुळे नागरिकांची प्रवासाची सोय होत होती. पण, आता एसटी फेर्या बंद असल्याने प्रवाशांना अनेक तास बस स्टॉपवर खासगी वाहनाच्या शोधात ताटकळत थांबावे लागते. 

एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. शासनाने तोडगा काढून पूर्ववत सुरू करावी.- ओंकार ठाकरे, माजी सभापती, पंचायत समिती 

एसटी सेवा ठप्प झाल्याने नागरिक, शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. नागरिकांना खासगी वाहनाचा खर्च झेपत नाही. - नारायणदास वैष्णव, विश्वस्त, श्री खंडेश्वर संस्थान

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप