शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

श्वानांनी केली चितळाची शिकार, नाव बिबटाचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:25 IST

वडाळीच्या जंगलात भटक्या श्वानांचा वावर वाढला असून, श्वानांनी चितळाचा फडशा पाडला. ही शिकार बिबट्याने केल्याची दावा वनविभागाने केला आहे. जंगल संवर्धनासाठी वन्यप्रेमींची धडपड सुरू असताना, वनविभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : वनसंवर्धनासाठी वन्यप्रेमींची धडपड

आॅनलाईन लोकमतअमरावती : वडाळीच्या जंगलात भटक्या श्वानांचा वावर वाढला असून, श्वानांनी चितळाचा फडशा पाडला. ही शिकार बिबट्याने केल्याची दावा वनविभागाने केला आहे. जंगल संवर्धनासाठी वन्यप्रेमींची धडपड सुरू असताना, वनविभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.शहरालगत समृद्ध जंगलाचा ठेवा आहे. मात्र, दिवसेंदिवस जंगलाचा ऱ्हास होताना दिसून येते. वडाळी वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास असून, हे जंगल जैवविविधतेचे भंडार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत नागरी हस्तक्षेप वाढल्याने जंगलातील वन्यप्राण्यांच्या अधिवासावर गदा आली आहे. त्यातच आता मोकाट व भटक्या श्वान वन्यप्राण्यांच्या जिवावर उठले आहे. वडाळी वनपरिक्षेत्रात शहरी श्वानांचा हैदोस वाढला आहे. वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात आलेला आहे. मंगळवारी वडाळी वनपरिक्षेत्रातील एका तलावावर श्वानांच्या कळपाने एका नर चितळाची शिकार केली. दुसऱ्या दिवशी गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना चितळाचा अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केले. घटनास्थळी आढळलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे व चितळाला खाण्याची पद्धत पाहून निष्कर्ष वनविभागाने काढला. मात्र, ही शिकार श्वानाने केल्याचा आरोप वन्यप्रेमी करीत आहेत. त्यामुळे चितळाची शिकार कुणी केली असावी, याबाबत संभ्रम कायम आहे.शवविच्छेदन ‘आॅन द स्पॉट’ का नाही ?वन्यजीव अधिनियमांनुसार बिबट्याने शिकार केली, तर त्या वन्यप्राण्याला त्याच ठिकाणी ठेवावे लागते. याकडे वनकर्मचाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे काम करावे लागते. मात्र, वनविभागाने चितळाचा मृतदेह ट्रकमध्ये टाकून शवविच्छेदनासाठी नेले होते.श्वानांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेस पत्रवडाळी जंगलात फिरणाऱ्या मोकाट श्वानांचा बंदोबस्त लावून कारवाई करण्यासंदर्भात उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सोबतच जंगलात भटकणाºया श्वानांच्या बंदोबस्तासाठी महापालिका आयुक्तांना पत्र दिले जाईल. शहरी भागातील श्वान पकडून जंगलात सोडले जात असल्याने त्यांचा वावर वाढल्याचे निदर्शनास येत आहे