शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
4
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
5
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
6
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
7
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
8
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
9
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
10
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
11
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
12
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
13
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
14
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
15
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
16
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
17
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
18
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
19
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
20
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी

हिंदी महासंघाच्या कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:49 IST

येथील हिंदी महासंघाच्यावतीने हिंदी दिवसाचे औचित्य साधून बुधवारी पार पडलेल्या कवि संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात उसळलेल्या रसिकांच्या गर्दीने वातावरण हिंदीमय झाले होते.

ठळक मुद्देसांस्कृतिक भवन हाऊसफुल्ल : वेदप्रताप वैदिकांच्या मार्गदर्शनाने चैतन्य संचारले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील हिंदी महासंघाच्यावतीने हिंदी दिवसाचे औचित्य साधून बुधवारी पार पडलेल्या कवि संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात उसळलेल्या रसिकांच्या गर्दीने वातावरण हिंदीमय झाले होते. ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत वेदप्रताप वैदिक यांच्या मार्गदर्शनाने जणू चैतन्य संचारल्याचा अनुभव आला.अमरावतीच्या हिंदी महासंघातर्फे आयोजित कविसंमेलनात वेदप्रताप वैदिक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर कविसंमेलनाला प्रारंभ झाला. ओमपालसिंह निडर, सुनील समैया, कपिल जैन, कर्नल बी.पी. सिंह, सुचिता मिश्रा, माधुरी शबनम आदींनी एकापेक्षा एक हास्य, वीररस आणि गजल सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी स्थानिक कवी किरण जोशी यांच्या निवेदनाने कविसंमेलनात प्राण फुंकला. नागपूर येथील कवियत्री सुचिता मिश्रा यांनी ‘आशिष दे मां शारदे’ या ओळीने सरस्वती वंदना सादर केली. त्यानंतर सुनील समैय्या यांनी सादर केलेल्या कवितेने हास्याचे फवारे उडाले. ‘जितने बम बारूद पाकिस्तान तेरे तहखाने मे है, उतने प्रतिवर्ष फोड डालते है हम दीपावली मै’ या कवितेतून त्यांनी भारतवासीयांची प्रतिमा जगासमोर कशी आहे, हे पटवून दिले. ‘हर दिशा में वहां देंगे गंगो जमन रक्त से हम सिचेंगे चमन, हम जिएंगे, मरेंगे तुम्हारे लिए ये वतन- ये वतन तुझको शत् शत ्नमन’ ही देशाप्रती भावना असलेली कविता सादर केली. किरण जोशी यांनी ‘यहां ताजी मिठाईयां मिलती है’ ही ज्ञानावर आधारित कविता सादर करताना कोण, कसे विचार लादतात, अशा भावप्रधान ओळी त्यांनी सादर केल्यात. माधुरी शबनम यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. ‘आंधिया साथ लेकर चलती हूं, बिजलियां साथ लेकर चलती हूं और मुझको खतरा नहीं जमाने से, राखियां साथ लेकर चलती हूं’ ही व्यंग कविता भरपूर भाव खावून गेली. त्यानंतर शबनम यांनी देशभक्ती, प्रेम आदी विषयांवर गजल सादरीकरणाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. उशिरा रात्रीपर्यंत चाललेल्या कविसंमेलनातून राजकारण, समाजकारण, देशभक्ती, प्रेम, शत्रू राष्ट्रांचे धोरण, जातीयवाद आदी प्रश्न, समस्यांविषयी कविता सादर करून व्यवस्थेचा खरपूस समाचार घेतला. कवि संमेलनाला माजी महापौर चरणजित कौर नंदा, उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया, संजय अग्रवाल, पवन जाजोदिया, माधुरी सुदा, रामेश्वर अभ्यंकर, राधा कुरील आदी उपस्थित होते.