शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

हिंदी महासंघाच्या कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:49 IST

येथील हिंदी महासंघाच्यावतीने हिंदी दिवसाचे औचित्य साधून बुधवारी पार पडलेल्या कवि संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात उसळलेल्या रसिकांच्या गर्दीने वातावरण हिंदीमय झाले होते.

ठळक मुद्देसांस्कृतिक भवन हाऊसफुल्ल : वेदप्रताप वैदिकांच्या मार्गदर्शनाने चैतन्य संचारले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील हिंदी महासंघाच्यावतीने हिंदी दिवसाचे औचित्य साधून बुधवारी पार पडलेल्या कवि संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात उसळलेल्या रसिकांच्या गर्दीने वातावरण हिंदीमय झाले होते. ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत वेदप्रताप वैदिक यांच्या मार्गदर्शनाने जणू चैतन्य संचारल्याचा अनुभव आला.अमरावतीच्या हिंदी महासंघातर्फे आयोजित कविसंमेलनात वेदप्रताप वैदिक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर कविसंमेलनाला प्रारंभ झाला. ओमपालसिंह निडर, सुनील समैया, कपिल जैन, कर्नल बी.पी. सिंह, सुचिता मिश्रा, माधुरी शबनम आदींनी एकापेक्षा एक हास्य, वीररस आणि गजल सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी स्थानिक कवी किरण जोशी यांच्या निवेदनाने कविसंमेलनात प्राण फुंकला. नागपूर येथील कवियत्री सुचिता मिश्रा यांनी ‘आशिष दे मां शारदे’ या ओळीने सरस्वती वंदना सादर केली. त्यानंतर सुनील समैय्या यांनी सादर केलेल्या कवितेने हास्याचे फवारे उडाले. ‘जितने बम बारूद पाकिस्तान तेरे तहखाने मे है, उतने प्रतिवर्ष फोड डालते है हम दीपावली मै’ या कवितेतून त्यांनी भारतवासीयांची प्रतिमा जगासमोर कशी आहे, हे पटवून दिले. ‘हर दिशा में वहां देंगे गंगो जमन रक्त से हम सिचेंगे चमन, हम जिएंगे, मरेंगे तुम्हारे लिए ये वतन- ये वतन तुझको शत् शत ्नमन’ ही देशाप्रती भावना असलेली कविता सादर केली. किरण जोशी यांनी ‘यहां ताजी मिठाईयां मिलती है’ ही ज्ञानावर आधारित कविता सादर करताना कोण, कसे विचार लादतात, अशा भावप्रधान ओळी त्यांनी सादर केल्यात. माधुरी शबनम यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. ‘आंधिया साथ लेकर चलती हूं, बिजलियां साथ लेकर चलती हूं और मुझको खतरा नहीं जमाने से, राखियां साथ लेकर चलती हूं’ ही व्यंग कविता भरपूर भाव खावून गेली. त्यानंतर शबनम यांनी देशभक्ती, प्रेम आदी विषयांवर गजल सादरीकरणाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. उशिरा रात्रीपर्यंत चाललेल्या कविसंमेलनातून राजकारण, समाजकारण, देशभक्ती, प्रेम, शत्रू राष्ट्रांचे धोरण, जातीयवाद आदी प्रश्न, समस्यांविषयी कविता सादर करून व्यवस्थेचा खरपूस समाचार घेतला. कवि संमेलनाला माजी महापौर चरणजित कौर नंदा, उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया, संजय अग्रवाल, पवन जाजोदिया, माधुरी सुदा, रामेश्वर अभ्यंकर, राधा कुरील आदी उपस्थित होते.