शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘केम’द्वारे २० दिवसांत ३२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:48 IST

पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी राबविला जाणाऱ्या कृषिसमृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाने (केम) २० दिवसांत ३२.४० कोटी रुपये निधी खर्च केला आहे. शासनाकडून निधी प्राप्त होण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे सहा जिल्ह्यांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना रोजगाराची साधने आणि विविध विकासकामे होतील, असा दावा ‘केम’ने केला आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेपूर्वीच निविदा प्रक्रिया : पश्चिम विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये विकासकामे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी राबविला जाणाऱ्या कृषिसमृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाने (केम) २० दिवसांत ३२.४० कोटी रुपये निधी खर्च केला आहे. शासनाकडून निधी प्राप्त होण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे सहा जिल्ह्यांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना रोजगाराची साधने आणि विविध विकासकामे होतील, असा दावा ‘केम’ने केला आहे.कृषिसमृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प १३ आॅगस्ट २००९ ला आला. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या सहा जिल्ह्यांमध्ये शासनामार्फत आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयएफएडी) व सर रतन टाटा ट्रस्ट (एसआरटीटी) यांच्या वित्तीय सहयोगाने हा प्रकल्प सुरू आहे. ‘केम’ प्रकल्पाकडे असलेली उर्वरित कामे पूर्ण करणे, प्रकल्प समाप्तीबाबत व प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा ३१ मार्च २०१९ च्या पुढे सुरू ठेवण्यास तसेच प्रकल्पाकडील सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील वितरित निधीपैकी ३२.४० कोटी एवढी रक्कम ३१ मार्च २०१९ पर्यंत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा निर्णय १६ फेब्रुवारी २०१९ रोजी घेतला. या ३२.४० कोटींमधून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे आणि शेतीपूरक व्यवसाय उभारणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक बळ आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी साकारण्यात आला आहे. यापूर्वी ‘केम’ प्रकल्पात अनियिमितता झाल्याप्रकरणी शासनस्तरावर चौकशी सुरू आहे. महत्प्रयासाने या प्रकल्पाला यंदा मुदतवाढ देण्यात आली आहे.बंधारे, शेततळे, नाले खोलीकरणाला प्राधान्य‘केम’ प्रकल्पाला शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगाराची साधने, शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत आदी रोजगाराशी निगडित बाबींवर ३२.४० कोटी रुपयांचा निधी खर्च होणे आवश्यक होते. मात्र, हा निधी सिंचन, बंधारे निर्मिती, नाले खोलीकरण, शेततळे, नदी खोलीकरण अशा दुय्यम बाबींवर खर्च करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ई-निविदा प्रक्रिया राबवून एजन्सींना कामे सोपविली आहेत.१६०६ गावांमध्ये प्रकल्प‘केम’ प्रकल्पाची पाळेमुळे अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये रुजलेली आहेत. त्यामधील ६४ तालुक्यांत एकूण १६०६ गावांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘केम’चा लाभ मिळणे आवश्यक आहे. २ लाख ८६ हजार ८०० कुटुंबसंख्येला लाभ मिळणे अपेक्षित असताना, हा प्रकल्प ठरावीक उपक्रमासाठीच राबविला गेला आहे.नोव्हेंबर २०१८ मध्ये ई-निविदा प्रक्रिया राबविली. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०१९ रोजी निधी मंजूर होताच संबंधित एजन्सीला कार्यारंभ आदेश दिले. आचारसंहितेपूर्वीच ३२.४० कोटी रूपयांच्या निधीतून विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.- दिगंबर नेमाडे,लेखाधिकारी, कृषिसमृद्धी समन्वयित कृषिविकास प्रकल्प