शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आदिवासींच्या ‘खावटी’साठी पोर्टलवर नोंदणीला वेग; लाभार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:35 IST

दोन हजार रुपयांचे अनुदान अन्‌ दोन हजारांचे जीवनावश्यक साहित्य मिळणार

अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाला ‘खावटी’ दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने डीबीटी पोर्टलवर नोंदणीला वेग आला असून, दोन हजार रुपये अनुदान आणि दोन हजार रुपयांचे जीवनाश्यक साहित्य लाभार्थींच्या घरी पोहोचून दिले जाईल, आदिवासी विकास विभागामार्फत नव्या वर्षात या योजनेचा लाभ मिळेल, असे नियोजन चालविले आहे. अमरावती विभागाची लक्ष्यांक गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

गत महिन्यात आदिवासी समाजाच्या काही संघटनांनी ‘खावटी’मधून साहित्य वाटप न करता थेट चार हजार रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी आदिवासी विकास महामंडळाकडे केली होती. मात्र, यासंदर्भात तसे कोणतेही शासनादेश नाही. दोन हजारांचे अनुदान आणि दोन हजारांचे साहित्य असेच ‘खावटी’चे स्वरूप असेल, अशी माहिती महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

शासनाने आदिवासी समाजासाठी ‘खावटी’ योजना १२ ऑगस्ट २०२० रोजी मंत्रिमंडळात लागू केली. याबाबत ९ सप्टेंबर रोजी शासनादेश जारी झाला. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. ‘खावटी’साठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला असून, यात वैयक्तिक वनहक्क लाभधारक, आदिम जमात, पारधी, मनरेगा लाभार्थी आणि जनगणनेची आकडेवारी असलेल्या आदिवासींना लाभ मिळणार आहे.

‘खावटी’ योजनेची ग्रामसभेने यादी मंजूर केल्यानंतर प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त आणि त्यानंतर आयुक्तांकडे अंतिम मान्यतेसाठी ही यादी मंजुरीसाठी जाणार आहे. त्यानंतरच लाभार्थींच्या खात्यात थेट दोन हजारांचे अनुदान जमा होईल, असे नियोजन चालविले आहे. ‘ट्रायबल’च्या अमरावती विभागात १ लाख ९८ हजार लाभार्थी लक्ष्यांक असून, आतापर्यंत १ लाख ६२ हजार ३४३ एवढी डीबीटीसाठी पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे.

प्रकल्पनिहाय ‘खावटी’चे लक्ष्यांक

प्रकल्पाचे नाव लक्ष्यांक नोंदणीअकोला            ३०००० २४६८४

पुसद             २८५०० १६७५३पांढरकवडा ५७००० ४८९८९

धारणी            ४५००० ३३७१८कळमनुरी १६५०० १३४८९

किनवट ३०००० १५११८औरंगाबाद २१००० ९७६७

आदिवासी समाजासाठी ‘खावटी’ योजना लाभदायक ठरणारी आहे. या योजनेत पारदर्शकता असावी, यासाठी थेट लाभार्थींच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील. त्यानंतर दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू दिल्या जातील. अमरावतीने लक्ष्यांकांकडे वाटचाल सुरू केली आहे.

- विनोद पाटील, अपर आयुक्त, अमरावती.

टॅग्स :Amravatiअमरावती