शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतर कर्जवाटपाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:34 IST

यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असतांना बँकानी कर्जवाटपाला सुरूवातच केली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली. आठवड्यात दोन वेळा आढावा घेण्यात येत असल्याने आता कर्जवाटपाला गती प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्दे११ सहायक निबंधकांना नोटीस : २७ हजार शेतकऱ्यांना २८६ कोटींचे पीककर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असतांना बँकानी कर्जवाटपाला सुरूवातच केली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली. आठवड्यात दोन वेळा आढावा घेण्यात येत असल्याने आता कर्जवाटपाला गती प्राप्त झाली आहे.यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात खरीप कर्जवाटपाचे लक्ष्यांक १,६३० कोटींचे आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांना १०९६ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असतांना २२ जूनपर्यत १५ हजार ७७७ शेतकऱ्यांना १८५.१७ कोटींचे वाटप करण्यात आले. ही टक्केवारी १७ अशी आहे. ग्रामीण बँकांना १४ कोटींचा लक्ष्यांक असताना २३९ शेतकºयांना २.३० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी १६ अशी आहे. जिल्हा बँंकेला ५२० कोटींचा लक्ष्यांक असतांना ११,३४५ शेतकऱ्यांना ९८ कोटी ८९ लाकांचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी १९ अशी आहे.जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख २१ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. तसेच ५० हजारांवर शेतकरी नियमित खातेदार आहेत व २० हजारांवर शेतकऱ्यांनी प्रोत्साहन, ओटीएस योजनेतंर्गत कर्जाचा भरणा केलेला आहे. असे एकूण किमान दोन लाख शेतकरी कर्ज मिळण्यास पात्र आहेत. मात्र बँकांचे उंबरठे झिजवित असतांना त्यांना माघारी पाठविण्यात येत आहे. यंदाच्या खरिपासाठी १ एप्रिलपासून कर्जवाटपास सुरूवात झाली. मात्र दोन महिण्यात तीन टक्केच कर्जवाटप झाल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतली. अनावश्यक कागदपत्रे मागवून बँका शेतकºयांना त्रास देत असल्याने कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची निश्चिती केली व दर आठवड्यात दोन वेळा कर्ज वाटपाचा आढावा घेतला जात असल्याने आता कर्जवाटपास गती आलेली आहे.-तर प्रशासकीय कारवाई, नोटीस जारीभातकुली, चिखलदरा व धारणी वगळता उर्वरित तालुक्यांमधील जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये कर्जवाटप माघारल्याने ११ तालुक्यातील सहाय्यक निबंधकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस दिली आहे. लक्ष्यांक पुर्तीसाठी नियोजन करून गरजू शेतकºयांना तत्काळ कर्जवाटप पुर्ण करावे. कर्जवाटपासंदर्भात कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास वैतयक्तिक दोषी धरण्यात येऊन प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.पीक कर्जवाटपासाठी आता ग्रामस्तरीय समितीविहित मुदतीत लक्ष्यांकपूर्ती व्हावी, यासाठी सर्व गावांमध्ये चार सदस्यीय ग्रामस्तर समिती गठीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या समितीचे अध्यक्ष तलाठी व कृषी सहाय्यक सदस्य सचिव राहणार आहे. या समितीमध्ये ग्रामसेवक व सबंधित सोसायटींचे गटसचिव देखील राहणार आहे. ग्रामस्तरावरील या समितीने पीककर्ज मागणी अर्ज प्रत्येक शेतकऱ्यांपर्यत पोहचण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.