शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतर कर्जवाटपाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:34 IST

यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असतांना बँकानी कर्जवाटपाला सुरूवातच केली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली. आठवड्यात दोन वेळा आढावा घेण्यात येत असल्याने आता कर्जवाटपाला गती प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्दे११ सहायक निबंधकांना नोटीस : २७ हजार शेतकऱ्यांना २८६ कोटींचे पीककर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असतांना बँकानी कर्जवाटपाला सुरूवातच केली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली. आठवड्यात दोन वेळा आढावा घेण्यात येत असल्याने आता कर्जवाटपाला गती प्राप्त झाली आहे.यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात खरीप कर्जवाटपाचे लक्ष्यांक १,६३० कोटींचे आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांना १०९६ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असतांना २२ जूनपर्यत १५ हजार ७७७ शेतकऱ्यांना १८५.१७ कोटींचे वाटप करण्यात आले. ही टक्केवारी १७ अशी आहे. ग्रामीण बँकांना १४ कोटींचा लक्ष्यांक असताना २३९ शेतकºयांना २.३० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी १६ अशी आहे. जिल्हा बँंकेला ५२० कोटींचा लक्ष्यांक असतांना ११,३४५ शेतकऱ्यांना ९८ कोटी ८९ लाकांचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी १९ अशी आहे.जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख २१ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. तसेच ५० हजारांवर शेतकरी नियमित खातेदार आहेत व २० हजारांवर शेतकऱ्यांनी प्रोत्साहन, ओटीएस योजनेतंर्गत कर्जाचा भरणा केलेला आहे. असे एकूण किमान दोन लाख शेतकरी कर्ज मिळण्यास पात्र आहेत. मात्र बँकांचे उंबरठे झिजवित असतांना त्यांना माघारी पाठविण्यात येत आहे. यंदाच्या खरिपासाठी १ एप्रिलपासून कर्जवाटपास सुरूवात झाली. मात्र दोन महिण्यात तीन टक्केच कर्जवाटप झाल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतली. अनावश्यक कागदपत्रे मागवून बँका शेतकºयांना त्रास देत असल्याने कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची निश्चिती केली व दर आठवड्यात दोन वेळा कर्ज वाटपाचा आढावा घेतला जात असल्याने आता कर्जवाटपास गती आलेली आहे.-तर प्रशासकीय कारवाई, नोटीस जारीभातकुली, चिखलदरा व धारणी वगळता उर्वरित तालुक्यांमधील जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये कर्जवाटप माघारल्याने ११ तालुक्यातील सहाय्यक निबंधकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस दिली आहे. लक्ष्यांक पुर्तीसाठी नियोजन करून गरजू शेतकºयांना तत्काळ कर्जवाटप पुर्ण करावे. कर्जवाटपासंदर्भात कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास वैतयक्तिक दोषी धरण्यात येऊन प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.पीक कर्जवाटपासाठी आता ग्रामस्तरीय समितीविहित मुदतीत लक्ष्यांकपूर्ती व्हावी, यासाठी सर्व गावांमध्ये चार सदस्यीय ग्रामस्तर समिती गठीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या समितीचे अध्यक्ष तलाठी व कृषी सहाय्यक सदस्य सचिव राहणार आहे. या समितीमध्ये ग्रामसेवक व सबंधित सोसायटींचे गटसचिव देखील राहणार आहे. ग्रामस्तरावरील या समितीने पीककर्ज मागणी अर्ज प्रत्येक शेतकऱ्यांपर्यत पोहचण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.