शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खासगीत कापूस @ ५१००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:31 IST

यंदाच्या हंगामात प्रथमच या दोन दिवसांत कापसासह सोयाबीनचे दरात वाढ झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देयंदाचा सर्वाधिक दर : रूईची दरवाढ, मागणी वाढली

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदाच्या हंगामात प्रथमच या दोन दिवसांत कापसासह सोयाबीनचे दरात वाढ झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. कापसाच्य दरात ४०० ते ५०० रूपये प्रतिक्विंटल, तर सोयाबीनमध्येही २०० ते ३०० रूपयांपर्यंत वाढ झालीे आहे. खरेदी केंद्रावर आॅनलाइन नोंदणीसह अटी, शर्तींचा भडीमार असल्याने शेतकºयांचा कल खासगी व्यापाºयांकडे अधिक दिसत आहे.खासगी बाजारात शनिवारी कापसाची ४७०० ते ५१०० रूपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली. यंदाच्या हंगामात गुलाबी बोंड अळीने सरासरी उत्पन्नात ५० ते ६० टक्क्यांनी घट येणार आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात रूईचे दर वाढल्याने भाववाढ झालेली आहे.जिल्ह्यात सध्या नाफेडची सहा, तर सीसीआयची दोन, अशा आठ केंद्रांवर आधारभूत किमतीने कापसाची खरेदी सुरू आहे.मात्र, केंद्र सुरू झाल्यापासूनच खासगीत कापसाला अधिक दर असल्याने केंद्र ओस पडली आहेत. या सर्व केंद्रांवर गेल्या दोन महिण्यात केवळ २ हजार क्विंटल खरेदी करण्यात आली. त्यातुलनेत व्यापाºयांनी सध्यास्थितीत एक लाख ३० हजारांवर क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.बाजार समितीमध्ये शनिवारी सोयाबीन २४०० ते २९०० रूपये प्रति क्विंटल विकल्या गेले, वास्तविकता २०० रूपये बोनससह सोयाबीनची अधारभूत किंमत ३०५० रूपये आहे. मात्र, जिल्ह्यातील १० नाफेड केंद्रांवर नॉन एफएक्यू सोयाबीन नाकरल्या जात आहे. आता आर्द्रता नसल्यामुळे स्थानिक बाजारात व्यापाºयांनीदेखील दरवाढ केली. यामागे अनेक कारणे असली तरी खासगी खरेदीत प्रथमच दरवाढ झालेली आहे. यंदा मळणीच्या हंगामात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सोयाबीन डागी झाले. नॉन एफएक्यू प्रतवारी असल्याने नाफेडच्या केंद्रांवर नाकारले जात असल्याने व्यापाºयांनीही बेभाव खरेदी केली. आता मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसीची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली व्याºयांनी सांगितले.डीओसी, रूईचे आंतरराष्ट्रीय दरात वाढयंदा कापसाचे उत्पादनात ४० टक्क्यांनी कमी येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात ३.५६ ची गाठ सध्या ४ हजार रूपयांपर्यंत मागणी आहे. यामुळे कापसाची दरवाढ झाली. सोयाबीनमध्ये सद्यस्थितीत आर्द्रता नाही व डीओसीची मागणी वाढल्याने सोयाबीनच्या दरात वाढ झाली. मात्र, पुढील आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सौदे कमी होणार असल्याने किमान आठ ते दहा दिवस १०० ते १५० रूपयांनी भाव कमी होऊ शकतात, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.सध्या स्थानिक बाजारात हरभरा, तुरीला उठाव नाही. सोयाबीनची आर्द्रता कमी झालेली आहे व डीओसीची मागणी वाढल्याने सोयाबीनची दरवाढ झाली. कपाशीचे उत्पादनात कमी येत आहे व रूईची दरवाढ झाल्याने कापसातही तेजी आली.- अमर बांबल, अडते, व्यापारी