शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खासगीत कापूस @ ५१००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:31 IST

यंदाच्या हंगामात प्रथमच या दोन दिवसांत कापसासह सोयाबीनचे दरात वाढ झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देयंदाचा सर्वाधिक दर : रूईची दरवाढ, मागणी वाढली

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदाच्या हंगामात प्रथमच या दोन दिवसांत कापसासह सोयाबीनचे दरात वाढ झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. कापसाच्य दरात ४०० ते ५०० रूपये प्रतिक्विंटल, तर सोयाबीनमध्येही २०० ते ३०० रूपयांपर्यंत वाढ झालीे आहे. खरेदी केंद्रावर आॅनलाइन नोंदणीसह अटी, शर्तींचा भडीमार असल्याने शेतकºयांचा कल खासगी व्यापाºयांकडे अधिक दिसत आहे.खासगी बाजारात शनिवारी कापसाची ४७०० ते ५१०० रूपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली. यंदाच्या हंगामात गुलाबी बोंड अळीने सरासरी उत्पन्नात ५० ते ६० टक्क्यांनी घट येणार आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात रूईचे दर वाढल्याने भाववाढ झालेली आहे.जिल्ह्यात सध्या नाफेडची सहा, तर सीसीआयची दोन, अशा आठ केंद्रांवर आधारभूत किमतीने कापसाची खरेदी सुरू आहे.मात्र, केंद्र सुरू झाल्यापासूनच खासगीत कापसाला अधिक दर असल्याने केंद्र ओस पडली आहेत. या सर्व केंद्रांवर गेल्या दोन महिण्यात केवळ २ हजार क्विंटल खरेदी करण्यात आली. त्यातुलनेत व्यापाºयांनी सध्यास्थितीत एक लाख ३० हजारांवर क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.बाजार समितीमध्ये शनिवारी सोयाबीन २४०० ते २९०० रूपये प्रति क्विंटल विकल्या गेले, वास्तविकता २०० रूपये बोनससह सोयाबीनची अधारभूत किंमत ३०५० रूपये आहे. मात्र, जिल्ह्यातील १० नाफेड केंद्रांवर नॉन एफएक्यू सोयाबीन नाकरल्या जात आहे. आता आर्द्रता नसल्यामुळे स्थानिक बाजारात व्यापाºयांनीदेखील दरवाढ केली. यामागे अनेक कारणे असली तरी खासगी खरेदीत प्रथमच दरवाढ झालेली आहे. यंदा मळणीच्या हंगामात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सोयाबीन डागी झाले. नॉन एफएक्यू प्रतवारी असल्याने नाफेडच्या केंद्रांवर नाकारले जात असल्याने व्यापाºयांनीही बेभाव खरेदी केली. आता मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसीची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली व्याºयांनी सांगितले.डीओसी, रूईचे आंतरराष्ट्रीय दरात वाढयंदा कापसाचे उत्पादनात ४० टक्क्यांनी कमी येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात ३.५६ ची गाठ सध्या ४ हजार रूपयांपर्यंत मागणी आहे. यामुळे कापसाची दरवाढ झाली. सोयाबीनमध्ये सद्यस्थितीत आर्द्रता नाही व डीओसीची मागणी वाढल्याने सोयाबीनच्या दरात वाढ झाली. मात्र, पुढील आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सौदे कमी होणार असल्याने किमान आठ ते दहा दिवस १०० ते १५० रूपयांनी भाव कमी होऊ शकतात, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.सध्या स्थानिक बाजारात हरभरा, तुरीला उठाव नाही. सोयाबीनची आर्द्रता कमी झालेली आहे व डीओसीची मागणी वाढल्याने सोयाबीनची दरवाढ झाली. कपाशीचे उत्पादनात कमी येत आहे व रूईची दरवाढ झाल्याने कापसातही तेजी आली.- अमर बांबल, अडते, व्यापारी