शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारणासाठी हवे विशेष पॅकेज

By admin | Updated: November 27, 2014 23:24 IST

मागील वर्षी ओला दुष्काळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी पावसाअभावी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात अल्प, अत्यल्प व कमालभूधारक शेतकऱ्यांचे ७ लाख ५ हजार २६७ हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झाले.

जिल्हावासीयांची अपेक्षा : मलमपट्टी नको, दीर्घकालीन उपाययोजना हवीगजानन मोहोड - अमरावतीमागील वर्षी ओला दुष्काळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी पावसाअभावी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात अल्प, अत्यल्प व कमालभूधारक शेतकऱ्यांचे ७ लाख ५ हजार २६७ हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झाले. पेरणीक्षेत्राच्या ९६ टक्के ही सरासरी आहे. जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार २९७४ शेतकरी कुटुंब या आपत्तीचा सामना करीत आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्याने कोलमडलेल्या कोरडवाहू व बागाईतदारांना सावरण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. यंदा जिल्ह्याची पैसेवारी केवळ ४६ पैसे असल्याने शासनाने विशेष पॅकेज मंजूर करावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. गतवर्षी खरीप हंगाम पेरणीपासून सततचा पाऊस, परतीचा पाऊस, सरासरीपेक्षा १४० पट अधिक पाऊस यामध्ये गारद झाला. सरासरी उत्पन्नात ५० ते ६० टक्क्यांनी घट झाली. दुष्काळाची स्थितीयंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यापासून पावसाने दडी मारली, दीड महिना पाऊस बेपत्ता होता. त्यामुळे किमान २ महिने खरिपाची पेरणी उशिरा झाली, त्यानंतरही पावसात खंड, निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत पावसाची दडी, जमिनीत आर्द्रता नाही, कपाशीवर लाल्या, तुरीवर शेंग पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला. सरासरीपेक्षा ५० ते ७० टक्क्यांनी उत्पन्नात घट झाली, जिल्ह्याची पैसेवारी केवळ ४६ टक्के आहे. किमान रबी पीक तरी सावरेल, अशी अपेक्षा असताना परतीचा पाऊस नाही, जमिनीत आर्द्रता नाही त्यामुळे सद्यस्थितीत ८० टक्के रबीची पेरणी व्हायला पाहीजे परंतु केवळ ३० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. केवळ मुख्यमंत्री दौऱ्यामुळे कृषी विभाग फुगीर आकडेवारी दाखवत आहे यात कुठेही तथ्य नाही. हरभरा पेरणीची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर असते ती होऊन गेली. प्रत्यक्षात एकूण सरासरी क्षेत्राच्या केवळ २० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट अन बेहाल अशी अवस्था आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसल्याने बाजारपेठाही थंडावल्या आहेत. जिल्हा दुष्काळग्रस्त आहेच या पार्श्वभूमिवर शासनाकडून विशेष पॅकेज मिळेल अशी आस शेतकरी बाळगून आहे. शासनाद्वारे राज्यातील जमिनीपासून मिळणारा महसूल व उत्पन्नाचा अहवाल घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील नियमानुसार खरीप व रबी पिकांची पैसेवारी काढल्या जाते. पिकाची पैसेवारी ५० पैस्याच्या आत असल्यास दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर केल्या जाते.