शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

दुष्काळ निवारणासाठी हवे विशेष पॅकेज

By admin | Updated: November 27, 2014 23:24 IST

मागील वर्षी ओला दुष्काळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी पावसाअभावी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात अल्प, अत्यल्प व कमालभूधारक शेतकऱ्यांचे ७ लाख ५ हजार २६७ हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झाले.

जिल्हावासीयांची अपेक्षा : मलमपट्टी नको, दीर्घकालीन उपाययोजना हवीगजानन मोहोड - अमरावतीमागील वर्षी ओला दुष्काळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी पावसाअभावी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात अल्प, अत्यल्प व कमालभूधारक शेतकऱ्यांचे ७ लाख ५ हजार २६७ हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झाले. पेरणीक्षेत्राच्या ९६ टक्के ही सरासरी आहे. जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार २९७४ शेतकरी कुटुंब या आपत्तीचा सामना करीत आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्याने कोलमडलेल्या कोरडवाहू व बागाईतदारांना सावरण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. यंदा जिल्ह्याची पैसेवारी केवळ ४६ पैसे असल्याने शासनाने विशेष पॅकेज मंजूर करावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. गतवर्षी खरीप हंगाम पेरणीपासून सततचा पाऊस, परतीचा पाऊस, सरासरीपेक्षा १४० पट अधिक पाऊस यामध्ये गारद झाला. सरासरी उत्पन्नात ५० ते ६० टक्क्यांनी घट झाली. दुष्काळाची स्थितीयंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यापासून पावसाने दडी मारली, दीड महिना पाऊस बेपत्ता होता. त्यामुळे किमान २ महिने खरिपाची पेरणी उशिरा झाली, त्यानंतरही पावसात खंड, निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत पावसाची दडी, जमिनीत आर्द्रता नाही, कपाशीवर लाल्या, तुरीवर शेंग पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला. सरासरीपेक्षा ५० ते ७० टक्क्यांनी उत्पन्नात घट झाली, जिल्ह्याची पैसेवारी केवळ ४६ टक्के आहे. किमान रबी पीक तरी सावरेल, अशी अपेक्षा असताना परतीचा पाऊस नाही, जमिनीत आर्द्रता नाही त्यामुळे सद्यस्थितीत ८० टक्के रबीची पेरणी व्हायला पाहीजे परंतु केवळ ३० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. केवळ मुख्यमंत्री दौऱ्यामुळे कृषी विभाग फुगीर आकडेवारी दाखवत आहे यात कुठेही तथ्य नाही. हरभरा पेरणीची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर असते ती होऊन गेली. प्रत्यक्षात एकूण सरासरी क्षेत्राच्या केवळ २० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट अन बेहाल अशी अवस्था आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसल्याने बाजारपेठाही थंडावल्या आहेत. जिल्हा दुष्काळग्रस्त आहेच या पार्श्वभूमिवर शासनाकडून विशेष पॅकेज मिळेल अशी आस शेतकरी बाळगून आहे. शासनाद्वारे राज्यातील जमिनीपासून मिळणारा महसूल व उत्पन्नाचा अहवाल घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील नियमानुसार खरीप व रबी पिकांची पैसेवारी काढल्या जाते. पिकाची पैसेवारी ५० पैस्याच्या आत असल्यास दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर केल्या जाते.