शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

विशेष सभेचा प्रस्ताव धुडकावला!

By admin | Updated: March 8, 2016 00:15 IST

'जलयुक्त शिवार व पाणीटंचाई' या विषयावर संयुक्त सभा घेण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय २५ सदस्यांनी अध्यक्ष सतीश उईके यांना २३ फेब्रुवारी रोजी पत्राव्दारे मागणी केली होती.

जिल्हा परिषद : २५ सदस्यांची होती मागणीअमरावती : 'जलयुक्त शिवार व पाणीटंचाई' या विषयावर संयुक्त सभा घेण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय २५ सदस्यांनी अध्यक्ष सतीश उईके यांना २३ फेब्रुवारी रोजी पत्राव्दारे मागणी केली होती. मात्र हा प्रस्तावच सत्ताधाऱ्यांनी धुडकावल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील गावांमध्ये भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये व मागील दोन वर्षांपासून पाण्याचा स्त्रोत वाढावा याकरिता जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या लेखाशिर्षातून खर्च करण्यात येत आहे. यामधील कामाचा आढावा घेण्यासाठी जलयुक्त शिवार आणि पाणीटंचाई विषयावर विशेष सभा बोलावण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी अध्यक्षांकडे लावून धरली होती. यासंदर्भात २५ सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र अध्यक्षांना मंगळवार २३ फेब्रुवारीला दिले होते. जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. परिणामी भविष्यात पाणीटंचाईचा सामना करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाण्याचा स्त्रोत वाढावा याकरिता जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे.होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च कितपत फायदेशीर ठरला यासह दोन वर्षांतील कामांचा आढावा घेण्यासाठी जलयुक्त शिवार, पाणीटंचाई या विषयावर संयुक्त सभा घेण्याची मागणी पत्राद्वारे अध्यक्षांकडे केली आहे. या पत्रावर जि.प.च्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, सुधीर सूर्यवंशी, प्रमोद वाकोडे, अभिजित ढेपे, जया बुंदिले, चित्रा डहाणे, वनमाला खडके, सुषमा कलाने, विद्या तट्टे, संगीता चक्रे, वर्षा आहाके, अरुणा गावंडे, सुनीता देशमुख, पुष्पा सावरकर, मंदा गवई, सुधाकर उईके, प्रवीण घुईखेडकर, मोहन पाटील, ममता भांबूरकर, भुरा बेठे, चंद्रपाल तुरकाने, सदाशिव खडके आदी जि.प. सदस्य आणि विनोद टेकाडे, गणेश राजनकर, अर्चना वेरुळकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र सदस्यांच्या मागणीचा हा प्रस्तावच जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाने फेटाळल्याने याविषयावरच पडदा टाकण्यात आल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)काही सदस्यांचे समाधान झाल्याचे पत्रजिल्हा परिषदेतील जवळपास २५ सदस्यांनी जलयुक्त शिवार व पाणीटंचाई या विषयावर संयुक्त सभा घेण्याची मागणी केली होती. मात्र यावर स्वाक्षरी करणाऱ्या काही सदस्यांनी आमचे समाधान झाल्याचे पत्र अध्यक्षांकडे दिले आहेत. मग अगोदरच सभेची मागणी करण्यासाठी निवेदनावर स्वाक्षरी क शाला केली, अशी चर्चा सुरू झाली आहे.जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी विशेष सभेसाठी माझ्याकडे लेखी पत्र दिले होते. मात्र याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.- सतीश उईके, अध्यक्ष, जिल्हा परिषदजलयुक्त शिवार व पाणी टंचाईची विशेष सभा बोलविण्यात यावी यासंदर्भात काही सदस्यांचे पत्र अध्यक्षांना दिले होते. परंतु यावर कुठलाही तोडगा काढला नाही.- सतीश हाडोळे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद