शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू नियुक्तीत आता राज्य शासनाचे विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST

अमरावती : राज्यात अकृषि विद्यापीठांमध्ये कुलगुरुपदी पात्र व्यक्तींची नियुक्ती होण्यासाठी आता राज्य शासनाचे विशेष लक्ष असणार आहे. त्याकरिता ...

अमरावती : राज्यात अकृषि विद्यापीठांमध्ये कुलगुरुपदी पात्र व्यक्तींची नियुक्ती होण्यासाठी आता राज्य शासनाचे विशेष लक्ष असणार आहे. त्याकरिता शिक्षण क्षेत्रातील १३ जणांची समिती गठित करण्यात आली असून, समितीचा अहवाल प्राप्त होताच त्वरेने अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

ना. सामंत हे शनिवारी अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रपरिषदेतून उच्च व तंत्र शिक्षण विभागातील नव्या घडामोडींविषयी माहिती दिली. यादरम्यान माजी आमदार आशिष देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते आणि बहुतांश अकृषि विद्यापीठात संघ विचारसरणीचे कुलगुरू नियुक्त करण्यात आल्याची बाब शासनाच्या लक्षात आणून दिली होती. या प्रश्नांवर ना. सामंत यांचे लक्ष वेधले असता, आता अकृषि विद्यापीठात कुलगुरू नियुक्तीत राज्य शासनाचे विशेष लक्ष आहे, असे ते म्हणाले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेत १३ जणांची समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येत्या काही दिवसांत शासनाला मिळणार आहे.

अहवालाचा आधार घेत अकृषि विद्यापीठात कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया राबविली जाईल. कोणत्याही विचारसरणीपेक्षा ती व्यक्ती पदासाठी पात्र आहे अथवा नाही, याकडे अधिक भर दिला जाणार असल्याचे ना. सामंत म्हणाले.

पत्रपरिषदेला आमदार किरण सरनाईक, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, श्याम देशमुख, राजेश वानखडे, दिलीप जाधव, आशिष धर्माळे उपस्थित होते.

----------------

विद्यापीठांच्या परीक्षा तूर्त ऑनलाईनच

कोविड १९ चा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे पुढील काही काळ विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्यात येणार आहेत तसेच महाविद्यालयेदेखील तूर्त सुरू होणार नाही, ही बाब ना. उदय सामंत यांनी स्पष्ट केली. भविष्यातही महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहील, असे त्यांनी सांगितले.