शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कुलगुरू नियुक्तीत आता राज्य शासनाचे विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST

अमरावती : राज्यात अकृषि विद्यापीठांमध्ये कुलगुरुपदी पात्र व्यक्तींची नियुक्ती होण्यासाठी आता राज्य शासनाचे विशेष लक्ष असणार आहे. त्याकरिता ...

अमरावती : राज्यात अकृषि विद्यापीठांमध्ये कुलगुरुपदी पात्र व्यक्तींची नियुक्ती होण्यासाठी आता राज्य शासनाचे विशेष लक्ष असणार आहे. त्याकरिता शिक्षण क्षेत्रातील १३ जणांची समिती गठित करण्यात आली असून, समितीचा अहवाल प्राप्त होताच त्वरेने अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

ना. सामंत हे शनिवारी अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रपरिषदेतून उच्च व तंत्र शिक्षण विभागातील नव्या घडामोडींविषयी माहिती दिली. यादरम्यान माजी आमदार आशिष देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते आणि बहुतांश अकृषि विद्यापीठात संघ विचारसरणीचे कुलगुरू नियुक्त करण्यात आल्याची बाब शासनाच्या लक्षात आणून दिली होती. या प्रश्नांवर ना. सामंत यांचे लक्ष वेधले असता, आता अकृषि विद्यापीठात कुलगुरू नियुक्तीत राज्य शासनाचे विशेष लक्ष आहे, असे ते म्हणाले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेत १३ जणांची समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येत्या काही दिवसांत शासनाला मिळणार आहे.

अहवालाचा आधार घेत अकृषि विद्यापीठात कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया राबविली जाईल. कोणत्याही विचारसरणीपेक्षा ती व्यक्ती पदासाठी पात्र आहे अथवा नाही, याकडे अधिक भर दिला जाणार असल्याचे ना. सामंत म्हणाले.

पत्रपरिषदेला आमदार किरण सरनाईक, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, श्याम देशमुख, राजेश वानखडे, दिलीप जाधव, आशिष धर्माळे उपस्थित होते.

----------------

विद्यापीठांच्या परीक्षा तूर्त ऑनलाईनच

कोविड १९ चा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे पुढील काही काळ विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्यात येणार आहेत तसेच महाविद्यालयेदेखील तूर्त सुरू होणार नाही, ही बाब ना. उदय सामंत यांनी स्पष्ट केली. भविष्यातही महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहील, असे त्यांनी सांगितले.