शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पावसाळ्यात २२ गावांवर विशेष लक्ष

By admin | Updated: June 1, 2017 00:11 IST

पावसाळ्यामध्ये सतर्क राहण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

सतर्क राहण्याच्या सूचना : साथीचा उद्रेक झाल्यास दोषींवर कारवाईजितेंद्र दखने । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाळ्यामध्ये सतर्क राहण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मागील तीन वर्षात साथीचा उद्रेक झालेल्या गावांसह जिल्ह्यातील एकूण २२ गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.पावसाळयाच्या दिवसात नैसर्गिक आपत्ती व पूरपस्थितीमध्ये कोणतीही साथ उद्भवू नये, यासाठी आरोग्य विभागाने प्रतिबंधक उपाययोजनांची आखणी केली आहे. गत तीन वर्षात डेंग्यू, चिकनगुनिया, गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, लेप्टोस्पायरोसिन आदी साथींचा उद्रेक झालेल्या गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. पावसाळयातील संभाव्य पूरग्रस्त भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच तालुकास्तर व जिल्हास्तरावर २४ तास वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच या गावांना आरोग्य कर्मचारी, पर्यवेक्षकांनी वेळोवेळी भेट देऊन नियमित रोगविषयक सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींनाही नियमित पाणी शुध्दीकरण जलजन्य साथीचा आजार, उपचाराबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. घरोघरी मेडिक्लोरचे वाटप तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालय पूर्व परवानगी शिवाय सोडू नये, अशा कडक सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.जोखीमग्रस्त गावेतांगडा, चोपन, कावळा, झिरी, किन्हाखेडा, कुड, धोकड, सोनाबर्डी, डोलार, परसोली, पळळसकुंडी, डोमी, कुही, रूईपठार, कुटीदा, सुमिता, कारंजखेडा, मारिता, राक्षा, अढाव, रेहटयाखेडा, बिच्छूखेडा, माडीझडप आदी गावे जोखीमग्रस्त आहेत.असे आहे नियोजनवैद्यकीय पथकाची स्थापना, जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क, जनतेला आरोग्य शिक्षण देण्याच्या सूचना, जिल्हास्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन,साथ नियंत्रण अधिकारी नियुक्त, घरोघरी मेडिक्लोर वाटप, २४ तास वैद्यकीय पथके कार्यरत राहणार, प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच तालुकास्तर व जिल्हास्तरावर २४ तास वैद्यकीय पथक ाची स्थापना, जिल्ह्यातील ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ३३३ उपकेंद्रांना आरोग्य विभागाकडून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात येणार आहे.पावसाळ्याचे दिवस तोंडावर असल्यामुळे आरोग्य विभागाने संभाव्य साथरोगाचा उद्रेक रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहे. संबंधितांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.- नितीन भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी