शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात २२ गावांवर विशेष लक्ष

By admin | Updated: June 1, 2017 00:11 IST

पावसाळ्यामध्ये सतर्क राहण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

सतर्क राहण्याच्या सूचना : साथीचा उद्रेक झाल्यास दोषींवर कारवाईजितेंद्र दखने । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाळ्यामध्ये सतर्क राहण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मागील तीन वर्षात साथीचा उद्रेक झालेल्या गावांसह जिल्ह्यातील एकूण २२ गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.पावसाळयाच्या दिवसात नैसर्गिक आपत्ती व पूरपस्थितीमध्ये कोणतीही साथ उद्भवू नये, यासाठी आरोग्य विभागाने प्रतिबंधक उपाययोजनांची आखणी केली आहे. गत तीन वर्षात डेंग्यू, चिकनगुनिया, गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, लेप्टोस्पायरोसिन आदी साथींचा उद्रेक झालेल्या गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. पावसाळयातील संभाव्य पूरग्रस्त भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच तालुकास्तर व जिल्हास्तरावर २४ तास वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच या गावांना आरोग्य कर्मचारी, पर्यवेक्षकांनी वेळोवेळी भेट देऊन नियमित रोगविषयक सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींनाही नियमित पाणी शुध्दीकरण जलजन्य साथीचा आजार, उपचाराबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. घरोघरी मेडिक्लोरचे वाटप तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालय पूर्व परवानगी शिवाय सोडू नये, अशा कडक सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.जोखीमग्रस्त गावेतांगडा, चोपन, कावळा, झिरी, किन्हाखेडा, कुड, धोकड, सोनाबर्डी, डोलार, परसोली, पळळसकुंडी, डोमी, कुही, रूईपठार, कुटीदा, सुमिता, कारंजखेडा, मारिता, राक्षा, अढाव, रेहटयाखेडा, बिच्छूखेडा, माडीझडप आदी गावे जोखीमग्रस्त आहेत.असे आहे नियोजनवैद्यकीय पथकाची स्थापना, जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क, जनतेला आरोग्य शिक्षण देण्याच्या सूचना, जिल्हास्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन,साथ नियंत्रण अधिकारी नियुक्त, घरोघरी मेडिक्लोर वाटप, २४ तास वैद्यकीय पथके कार्यरत राहणार, प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच तालुकास्तर व जिल्हास्तरावर २४ तास वैद्यकीय पथक ाची स्थापना, जिल्ह्यातील ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ३३३ उपकेंद्रांना आरोग्य विभागाकडून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात येणार आहे.पावसाळ्याचे दिवस तोंडावर असल्यामुळे आरोग्य विभागाने संभाव्य साथरोगाचा उद्रेक रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहे. संबंधितांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.- नितीन भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी