शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

सभापती, उपसभापती पदांच्या निवडणुकीला वेग

By admin | Updated: September 23, 2015 00:30 IST

अमरावती, भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीत स्पष्ट बहुमत कोणत्याही पॅनेलला मिळाले नाही.

इंगोले, अट्टल, वानखडे लक्ष्य : संजय बंड, खोडके लागले कामालालोकमत विशेषअमरावती : अमरावती, भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीत स्पष्ट बहुमत कोणत्याही पॅनेलला मिळाले नाही. मात्र सत्ता स्थापनेसाठी नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गणेश विसर्जनानंतर सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीला वेग येण्याचे संकेत आहेत.मागील आठवड्यात बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी निवडणूक पार पडली. यात परिवर्तन पॅनेलने आठ, सहकार पॅनेलने सहा तर शेतकरी एकता पॅनेलने एक जागा काबीज केली. अडते, व्यापारीमधून प्रमोद इंगोले, सतीश अट्टल हे दोन तर हमाल, तोलारी मतदारसंघातून बंडू वानखडे हे एका जागेवर विजयी झालेत. बाजार समितीची सत्ता काबीज करण्यासाठी किमान १० संचालकांची आवश्यकता आहे. मात्र हा जादुई आकडा कोणाकडेही नाही. त्यामुळे हा आक डा पार करण्यासाठी बाजार समितीत लवकरच ‘लक्ष्मी’चे दर्शन होईल, असे चित्र आहे. सतीश अट्टल, प्रमोद इंगोले व बंडू वानखडे या नवनियुक्त संचालकांच्या भूमिकेवरच बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणुकीचा ‘गेम प्लॅन’ आहे. माजी आ. संजय बंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनेलने सर्वाधिक आठ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळविण्याच्या दिशेने कूच केली आहे. आ.यशोमती ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके, विलास महल्ले यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेलनेदेखील बाजार समितीवर सहा संचालकांच्या बळावर कब्जा मिळविण्यासाठी गनिमी काव्याची रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. आ.रवी राणा, संयोगिता निंबाळकर यांच्या शेतकरी एकता पॅनेलकडे मिलिंद तायडे हे एकमात्र संचालक आहेत. तायडे यांचे बहुमत सभापती, उपसभापतीपदांच्या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे. गणेश विसर्जन आटोपताच या प्रक्रियेला वेग येणार, असे संकेत आहेत. माजी आमदार संजय बंड, आ. यशोमती ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके, आ.रवी राणा आदी नेत्यांच्या नजरा या अडते, व्यापारी मतदारसंघातून विजयी सतीश अट्टल, प्रमोद इंगोले तर हमाल, तोलारी मतदारसंघातून विजयी बंडू वानखडे यांच्या भूमिकेवर लागल्या आहेत. सोसायटी, ग्राम पंचायतीमधून पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीसभापती, उपसभापतीपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी आणि ग्राम पंचायत मतदारसंघातून विजयी झालेल्या संचालकांची निवड केली जाणार आहे. सभापती, उपसभापतीपदावर अडते, व्यापारी अथवा हमाल, तोलारी मतदारसंघातून निवडून आलेल्या संचालकांची नियुक्ती करता येत नाही, असा बाजार समितीचा कायदा आहे. त्यामुळे सेवा सहकारी सोसायटी, ग्राम पंचायत मतदारसंघातून विजयी झालेल्या संचालकापैकी कोणाची सभापती, उपसभापतीपदी वर्णी लागते, हे लवकरच स्पष्ट होईल.संचालकांची सहकार विभागात नोंद नाहीबाजार समितीत निवडून आलेल्या १८ नवनियुक्त संचालकांची अद्यापपर्यत येथील सहकार नोंदणी विभागात नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना प्रशासनाने काढली नसल्याची माहिती पुढे आली आहे. सहकार विभागात नोंदणीनंतरच बाजार समिती सभापती, उपसभापती, विविध समित्यांवर संचालकाच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईल.