शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींना ‘फॉर्च्युनर’साठी नकार

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

दुष्काळ, नापिकी, कर्जाचा डोंगर अशा विविध कारणांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे हित जोपासण्याऐवजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ..

पणन संचालकांचे पत्र : संचालक मंडळ शेतकऱ्यांसाठी की स्वहितासाठी ?अमरावती : दुष्काळ, नापिकी, कर्जाचा डोंगर अशा विविध कारणांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे हित जोपासण्याऐवजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींना नवीन वाहन खरेदीचे वेध लागले आहेत. २८ लाख २६ हजार रूपये किमतीचे ‘फॉर्च्युनर’ वाहन खरेदी करण्याच्या मागणीला पणन् संचालकांनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे बाजार समितीत आरूढ झालेले संचालक मंडळ खरेच शेतकरी हिताचे आहे काय, हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.राज्य शासनाच्या सहकार विभागाने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव, बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती केली आहे. बाजार समितीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल आणि खरेदी-विक्री संघातून संचालकाच्या रूपात प्रतिनिधी पाठविले जातात. केवळ शेतकरीहित जोपासणे हे बाजार समिती सभापती, उपसभापती व संचालक मंडळाचे कर्तव्य असताना ते जोपासले जात नाही. बाजार समितीत नवनियुक्त संचालक मंडळाच्या ४ नोेव्हेंबर २०१५ रोजीच्या पहिल्याच बैठकीत सभापतींसाठी वाहन खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. परंतु एखादा शेतकरीहिताचा विषय मांडण्याचे सौजन्य सत्तास्थानी असलेल्या संचालक मंडळाने दाखविला नाही. त्यामुळे बाजार समितीवर आरूढ संचालक मंडळ खरेच शेतकरी हिताचे आहे काय, हा संशोधनाचा विषय आहे. बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे यांच्या दिमतीला ‘इनोव्हा’ असताना नवीन वाहनाची गरज काय? हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. शेतकऱ्यांपासून वसूल होणारा 'सेस' कसा उधळला जातो हे २८ लाख २६ हजार रूपयांच्या वाहन खरेदी प्रस्तावावरुन लक्षात येते. मात्र, सभापतींच्या या मनसुब्याला पणन ्संचालकांनी चाप लावला आहे. महागडे वाहन खरेदी न करण्याचे निर्देश दिले आहेत. बाजार समितीच्या बजेटमध्ये वाहन खरेदीची तरतूद नसल्याचा आक्षेप सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधकांनी घेतला आहे. पहिल्याच बैठकीत वाहन खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याने सभापतींसह संचालक मंडळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह लागले आहे. (प्रतिनिधी)उपसभापती म्हणाले, वाहन भंगार झालेकृषी उत्पन्न बाजार समितीत नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली बैठक ४ नोव्हेंबर २०१५ रोजी पार पडली. या बैठकीत झालेल्या ठरावानुसार सभापतींच्या दिमतीला असलेले वाहन भंगार झाले असून रात्री-अपरात्री यार्डवर ये-जा करावी लागते. मध्यंतरी वाहन बंददेखील पडले होते. त्यामुळे वाहन दुरुस्तीचा खर्च लक्षात घेता या वाहनाचा हर्रास करुन नवीन वाहन खरेदीला पणन् संचालकांनी मान्यता द्यावी, अशी मागणी उपसभापती किशोर चांगोले यांनी केली होती.प्रस्ताव वेगळा अन् मागणी वेगळी बाजार समिती पदधिकाऱ्यांच्या अफलातून कारभाराने सीमा गाठली आहे. वाहन खरेदीचा ठराव मान्य करायचा. त्यानंतर पणन् संचालकांना वाहन खरेदीच्या ठरावाची प्रत पाठविताना महागडे फॉर्च्युनर वाहन खरेदी करण्याची परवानगी मागायची, असा दुटप्पी कारभार करण्याची किमया सभापती, उपसभापतींनी केली आहे.