शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

सभापतींना ‘फॉर्च्युनर’साठी नकार

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

दुष्काळ, नापिकी, कर्जाचा डोंगर अशा विविध कारणांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे हित जोपासण्याऐवजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ..

पणन संचालकांचे पत्र : संचालक मंडळ शेतकऱ्यांसाठी की स्वहितासाठी ?अमरावती : दुष्काळ, नापिकी, कर्जाचा डोंगर अशा विविध कारणांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे हित जोपासण्याऐवजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींना नवीन वाहन खरेदीचे वेध लागले आहेत. २८ लाख २६ हजार रूपये किमतीचे ‘फॉर्च्युनर’ वाहन खरेदी करण्याच्या मागणीला पणन् संचालकांनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे बाजार समितीत आरूढ झालेले संचालक मंडळ खरेच शेतकरी हिताचे आहे काय, हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.राज्य शासनाच्या सहकार विभागाने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव, बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती केली आहे. बाजार समितीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल आणि खरेदी-विक्री संघातून संचालकाच्या रूपात प्रतिनिधी पाठविले जातात. केवळ शेतकरीहित जोपासणे हे बाजार समिती सभापती, उपसभापती व संचालक मंडळाचे कर्तव्य असताना ते जोपासले जात नाही. बाजार समितीत नवनियुक्त संचालक मंडळाच्या ४ नोेव्हेंबर २०१५ रोजीच्या पहिल्याच बैठकीत सभापतींसाठी वाहन खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. परंतु एखादा शेतकरीहिताचा विषय मांडण्याचे सौजन्य सत्तास्थानी असलेल्या संचालक मंडळाने दाखविला नाही. त्यामुळे बाजार समितीवर आरूढ संचालक मंडळ खरेच शेतकरी हिताचे आहे काय, हा संशोधनाचा विषय आहे. बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे यांच्या दिमतीला ‘इनोव्हा’ असताना नवीन वाहनाची गरज काय? हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. शेतकऱ्यांपासून वसूल होणारा 'सेस' कसा उधळला जातो हे २८ लाख २६ हजार रूपयांच्या वाहन खरेदी प्रस्तावावरुन लक्षात येते. मात्र, सभापतींच्या या मनसुब्याला पणन ्संचालकांनी चाप लावला आहे. महागडे वाहन खरेदी न करण्याचे निर्देश दिले आहेत. बाजार समितीच्या बजेटमध्ये वाहन खरेदीची तरतूद नसल्याचा आक्षेप सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधकांनी घेतला आहे. पहिल्याच बैठकीत वाहन खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याने सभापतींसह संचालक मंडळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह लागले आहे. (प्रतिनिधी)उपसभापती म्हणाले, वाहन भंगार झालेकृषी उत्पन्न बाजार समितीत नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली बैठक ४ नोव्हेंबर २०१५ रोजी पार पडली. या बैठकीत झालेल्या ठरावानुसार सभापतींच्या दिमतीला असलेले वाहन भंगार झाले असून रात्री-अपरात्री यार्डवर ये-जा करावी लागते. मध्यंतरी वाहन बंददेखील पडले होते. त्यामुळे वाहन दुरुस्तीचा खर्च लक्षात घेता या वाहनाचा हर्रास करुन नवीन वाहन खरेदीला पणन् संचालकांनी मान्यता द्यावी, अशी मागणी उपसभापती किशोर चांगोले यांनी केली होती.प्रस्ताव वेगळा अन् मागणी वेगळी बाजार समिती पदधिकाऱ्यांच्या अफलातून कारभाराने सीमा गाठली आहे. वाहन खरेदीचा ठराव मान्य करायचा. त्यानंतर पणन् संचालकांना वाहन खरेदीच्या ठरावाची प्रत पाठविताना महागडे फॉर्च्युनर वाहन खरेदी करण्याची परवानगी मागायची, असा दुटप्पी कारभार करण्याची किमया सभापती, उपसभापतींनी केली आहे.