शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

खोटे बोला, रेटून बोला, त्यांचेच नाव ‘मोदी’

By admin | Updated: October 9, 2014 22:54 IST

‘अच्छे दिन’ येणार असल्याची स्वप्ने दाखवून भाजपच्या मोदी सरकारने निवडणूक जिंकली. परंतु गेल्या चार महिन्यांत सर्वसामान्यांच्या सर्व मूलभूत गरजा महाग करून मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला.

नारायण राणेंचा कडाडून हल्ला : चांदूररेल्वे, अंजनगाव सुर्जीत जाहीर सभा चांदूररेल्वे/अंजनगाव सुर्जी : ‘अच्छे दिन’ येणार असल्याची स्वप्ने दाखवून भाजपच्या मोदी सरकारने निवडणूक जिंकली. परंतु गेल्या चार महिन्यांत सर्वसामान्यांच्या सर्व मूलभूत गरजा महाग करून मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला. ‘खोटे बोला पण रेटून बोला त्यांचेच नाव मोदी’, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणेंनी भाजप आणि मोदींवर हल्ला चढविला. काँग्रेस, रिपाइंच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे येथे आयोजित जाहीर प्रचारसभांना ते संबोधित करीत होते. सर्वसामान्य जनतेसाठी ज्या जीवनावश्यक औषधींचे भाव काँग्रेस शासनाने स्थिर ठेवले, त्या ६९२ औषधींपैकी तब्बल १०८ औषधींना मोदी शासनाने स्थिर किमतीच्या यादीतून बाहेर काढले. याचा फायदा उद्योजकांना देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही राणेंनी यावेळी केला. मोदी सरकारवर घणाघाती टीका करताना राणे म्हणाले की, मोदींनी नाशिकच्या कांद्याची निर्यात बंद करुन तेथील शीतगृहात आता ईजिप्तचा कांदा भरला आहे. मालवाहतुकीसाठी असलेली मुंबईची गोदी बंद करुन गुजरातला नेली. त्या गोदीची १८०० एकर जमीन गुजरातच्या उद्योगपतींना दिली. ठाणे येथील संरक्षणविषयक प्रशिक्षण केंद्रसुध्दा गुजरातला पळविण्यात आले. सध्याचे पंतप्रधान देशाचे की फक्त गुजरातचे हे, कळण्यास मार्ग नाही, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला. आता मोदी ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चलो मोदी के साथ’ असा नारा देत आहेत. महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवरायांनी गुजरातवर अनेक चढाया केल्या. तेव्हा गुजरातवाले शिवरायांना नको नको ते बोलत असत. आज तेच शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागताहेत. खरेच शिवाजी महाराज यांना आशीर्वाद देतील का, असा संतप्त सवालही राणे यांनी यावेळी उपस्थित केला. ‘अच्छे दिन’ आले; पण कोणाचे? मोदींच्या मित्रांचे. त्यांची संपत्ती चार महिन्यांत दुप्पट, तिप्पट झाली, असा आरोप करीत नारायण राणे यांनी मोदींच्या विदेश दौऱ्यावरही टीका केली. मोदी विदेशात गेले, तेथील उद्योजकांना भारतात उद्योगधंद्यासाठी बोलाविले. भारतात चांगली साधन संपत्ती आहे, असे सांगितले. पण, ही साधन संपत्ती, हे रस्ते, वीज, पाणी कोणी उभे केले? काँग्रेसनेच ना? असे राणे म्हणाले. सेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत बोलताना राणे म्हणाले, कालपर्यंत सेना-भाजपची युती होती, तोपर्यंत सर्व सुरळीत होते. युती तुटली आणि आज भाजपवाले शिवसेनेला उंदीर म्हणत आहेत. काँग्रेसने विरोधक असूनही शिवसेनेला फक्त मांजरच म्हटले होते. पण, त्यांचेच एकेकाळचे साथीदार त्यांच्यावर अत्यंत लाजीरवाणी टीका करीत आहेत.मोदी म्हणतात, गोपीनाथ मुंडे त्यांच्या लहान भावाप्रमाणे होते. पण, हा लहान भाऊ केंद्रीय मंत्री असूनदेखील मोदी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी का झाले नाहीत? अशा प्रखर शब्दांत राणेंनी मोदींवर हल्लाबोल केला. जोगेंद्र कवाडे यांनीही यावेळी भाजप व बसपचा खरपूस समाचार घेतला.