शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

खोटे बोला, रेटून बोला, त्यांचेच नाव ‘मोदी’

By admin | Updated: October 9, 2014 22:54 IST

‘अच्छे दिन’ येणार असल्याची स्वप्ने दाखवून भाजपच्या मोदी सरकारने निवडणूक जिंकली. परंतु गेल्या चार महिन्यांत सर्वसामान्यांच्या सर्व मूलभूत गरजा महाग करून मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला.

नारायण राणेंचा कडाडून हल्ला : चांदूररेल्वे, अंजनगाव सुर्जीत जाहीर सभा चांदूररेल्वे/अंजनगाव सुर्जी : ‘अच्छे दिन’ येणार असल्याची स्वप्ने दाखवून भाजपच्या मोदी सरकारने निवडणूक जिंकली. परंतु गेल्या चार महिन्यांत सर्वसामान्यांच्या सर्व मूलभूत गरजा महाग करून मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला. ‘खोटे बोला पण रेटून बोला त्यांचेच नाव मोदी’, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणेंनी भाजप आणि मोदींवर हल्ला चढविला. काँग्रेस, रिपाइंच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे येथे आयोजित जाहीर प्रचारसभांना ते संबोधित करीत होते. सर्वसामान्य जनतेसाठी ज्या जीवनावश्यक औषधींचे भाव काँग्रेस शासनाने स्थिर ठेवले, त्या ६९२ औषधींपैकी तब्बल १०८ औषधींना मोदी शासनाने स्थिर किमतीच्या यादीतून बाहेर काढले. याचा फायदा उद्योजकांना देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही राणेंनी यावेळी केला. मोदी सरकारवर घणाघाती टीका करताना राणे म्हणाले की, मोदींनी नाशिकच्या कांद्याची निर्यात बंद करुन तेथील शीतगृहात आता ईजिप्तचा कांदा भरला आहे. मालवाहतुकीसाठी असलेली मुंबईची गोदी बंद करुन गुजरातला नेली. त्या गोदीची १८०० एकर जमीन गुजरातच्या उद्योगपतींना दिली. ठाणे येथील संरक्षणविषयक प्रशिक्षण केंद्रसुध्दा गुजरातला पळविण्यात आले. सध्याचे पंतप्रधान देशाचे की फक्त गुजरातचे हे, कळण्यास मार्ग नाही, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला. आता मोदी ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चलो मोदी के साथ’ असा नारा देत आहेत. महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवरायांनी गुजरातवर अनेक चढाया केल्या. तेव्हा गुजरातवाले शिवरायांना नको नको ते बोलत असत. आज तेच शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागताहेत. खरेच शिवाजी महाराज यांना आशीर्वाद देतील का, असा संतप्त सवालही राणे यांनी यावेळी उपस्थित केला. ‘अच्छे दिन’ आले; पण कोणाचे? मोदींच्या मित्रांचे. त्यांची संपत्ती चार महिन्यांत दुप्पट, तिप्पट झाली, असा आरोप करीत नारायण राणे यांनी मोदींच्या विदेश दौऱ्यावरही टीका केली. मोदी विदेशात गेले, तेथील उद्योजकांना भारतात उद्योगधंद्यासाठी बोलाविले. भारतात चांगली साधन संपत्ती आहे, असे सांगितले. पण, ही साधन संपत्ती, हे रस्ते, वीज, पाणी कोणी उभे केले? काँग्रेसनेच ना? असे राणे म्हणाले. सेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत बोलताना राणे म्हणाले, कालपर्यंत सेना-भाजपची युती होती, तोपर्यंत सर्व सुरळीत होते. युती तुटली आणि आज भाजपवाले शिवसेनेला उंदीर म्हणत आहेत. काँग्रेसने विरोधक असूनही शिवसेनेला फक्त मांजरच म्हटले होते. पण, त्यांचेच एकेकाळचे साथीदार त्यांच्यावर अत्यंत लाजीरवाणी टीका करीत आहेत.मोदी म्हणतात, गोपीनाथ मुंडे त्यांच्या लहान भावाप्रमाणे होते. पण, हा लहान भाऊ केंद्रीय मंत्री असूनदेखील मोदी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी का झाले नाहीत? अशा प्रखर शब्दांत राणेंनी मोदींवर हल्लाबोल केला. जोगेंद्र कवाडे यांनीही यावेळी भाजप व बसपचा खरपूस समाचार घेतला.