शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सोयाबीन फुलोरा अवस्थेत, पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:16 IST

फोटो - नांदगाव खंडेश्वर १२ पी नांदगाव खंडेश्वर : शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक जोमात दिसत असताना गेल्या काही दिवसांपासून ...

फोटो - नांदगाव खंडेश्वर १२ पी

नांदगाव खंडेश्वर : शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक जोमात दिसत असताना गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. सोयाबीनचे पीक फुलोरा अवस्थेत असून त्यास कळी धरणेचा कालावधी सुरू झाला आहे. अशा अवस्थेत पावसाचा खंड सोयाबीन उत्पादनावर परिणाम करू शकतो, ही भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

सोयाबीन पिकात अन्नद्रव्य शोषून घेणाऱ्या बारीक मुळ्याचे जाळावरच जमिनीत तयार झालेली असतात. पावसाच्या खंडामुळे जमिनीला भेगा पडल्या, तर त्या तुटण्याची भीती असते. पिकाला अन्नद्रव्य कमी प्रमाणात मिळाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. कपाशीचे पीक पाती, फुले व बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत असल्याने पावसाच्या खंडामुळे पातींची गळ सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. तालुक्यात ४९ हजार ४९४ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा आहे. ६ हजार १७० हेक्टर क्षेत्रात कपाशीचे पीक, ९ हजार २२६ हेक्टर क्षेत्रात तूर, ४२८ हेक्टर क्षेत्रात मूग व ३५६ हेक्टर क्षेत्रात उडीद पिकाचा पेरा आहे.

---------------------

हलक्‍या जमिनीतील सोयाबीन पावसाच्या खंडामुळे उन्हात सुकल्यागत होत आहे. फुले गळण्याची शक्यता निर्माण झाल्याने उत्पादनात घट होणार आहे.

- राजेंद्र सरोदे, शेतकरी, माहुली चोर

----------

खरबी गुंड शिवारात व आजूबाजूच्या परिसरात सुमारे तीन आठवड्यांपासून पावसाचा खंड आहे. फुल व कळी अवस्थेत असलेले सोयाबीनचे पीक धोक्‍यात आले आहे.

- जीविता विनोद जगताप, सरपंच, वाघोडा

---------------

कोठोडा शिवारात गेल्या बारा दिवसांपेक्षाही जास्त पावसाचा खंड असल्याने फुलोर अवस्थेत असलेले सोयाबीनचे पीक धोक्‍यात आले. उत्पादनात घट होण्याची भीती आहे.

- नितीन इंगोले, शेतकरी, कोठोडा

---------------

दोन-चार दिवसांत पाऊस आला नाही, तर सोयाबीनचे फुल गळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

- सूरज ठाकरे, शेतकरी, पहूर

पद्माकर भेंडे, शेतकरी पहुर.)

120821\img20210812113703.jpg

पावसाचा खंड, पिके धोक्यात.