शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
5
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
6
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
7
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
8
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
9
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
10
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
12
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
13
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
14
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
15
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
16
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
17
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
18
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
19
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
20
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

सोयाबीनला फाटा, कपाशीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST

सोयाबीन पिकाचा विक्रमी पेरणी झाली, परंतु गतवर्षी बियाणे बोगस निघाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार ...

सोयाबीन पिकाचा विक्रमी पेरणी झाली, परंतु गतवर्षी बियाणे बोगस निघाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. दुबार पेरणी केली असता, पीक जोमात आले. परंतु, अतिपावसामुळे शेंगा आल्या नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. मूग व उडीद पिकालाही शेंगा आल्या नसल्याने शेतकऱ्यांच्या पुढे मोठे संकट उभे झाले होते. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दाभाडा, कावली, वसाड, शिदोडी, वाठोडा, चिंचपूर, जळगाव, गुंजी, अशोकनगर, गव्हा निपाणी, वाघोली आदी गावांतील शेतकऱ्यांनी तूर व कपाशी या पिकांना अधिक पसंती दिली आहे. या तालुक्यांमध्ये अप्पर वर्धा धरणाचे पाणी येत असल्याने शेतकरी खरीप व रबी या दोन्ही हंगामात पेरणी करतात.

तालुक्यात बैलजोड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यांत्रिक शेती करतात. मात्र, पेरणीसाठी मजूर हे लागतातच. त्यामुळे अधिक मजुरी देऊन कामे करून घ्यावी लागत असल्याचे गव्हा निपाणी येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

परिसरात मोठ्या प्रमाणात पडीक जमीन होती. परंतु, गतवर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी त्या जमिनी खरेदी करून पेरणीयोग्य बनविल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो, असे पशुपालकांचे म्हणणे आहे.