शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:14 IST

राजुरा बाजार : यावर्षी खरीप हंगामात मान्सून परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे काढणीच्या अवस्थेत नुकसान झाले. यामुळे पुढील खरीप हंगामात ...

राजुरा बाजार : यावर्षी खरीप हंगामात मान्सून परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे काढणीच्या अवस्थेत नुकसान झाले. यामुळे पुढील खरीप हंगामात या पिकासाठी बियाण्यांची टंचाई भासण्याची शक्यता असल्याने घरचेच सोयाबीन राखून ठेवा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.पुढील खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन लागवड करायची आहे, त्यांनी आपल्या गावात किंवा परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबिन राखून ठेवले आहे, त्यांच्याकडून आताच सोयाबिन खरेदी करून ठेवावे म्हणजे उत्पादन खर्चात बचत होईल व पुढील हंगामात बियाणे न मिळाल्यामुळे होणारा मनस्तापदेखील टाळता येईल. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची स्वत:ची व गावातील शेतकऱ्यांची गरज भागविता येऊ शकते. पुढील खरीप हंगामात सोयाबिन बियाण्यांची टंचाई भासण्याची शक्यता आहे. परिणामी खुल्या बाजारातील सोयाबीन बियाणे हे महागडे होऊ शकते.

त्यामुळे हा उपाय कृषी विभागाने सुचविला आहे.

-------------गत खरीप हंगामात पावसाळा लांबल्याने सोयाबीन बियाण्याची प्रतवारी घसरली. शेतक०यांकडे चांगले सोयाबीन असल्यास, बाजारात न विकता उगवण क्षमता तपासून राखून ठेवल्यास बियाणे म्हणून वापरता येईल.

-संतोष सातदिवे, तालुका कृषी अधिकारी, वरूड