शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

घातक अमरवेलीच्या विळख्यात सोयाबीन

By admin | Updated: August 4, 2015 00:14 IST

जिल्ह्यातील सोयाबीनसह द्विदल धान्यपिकावर मागील दोन ते तीन वर्षांपासून ‘अमरवेल’ ही परोपकारी वेल मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

शेती पिकावर संकट : रोपांच्या अन्नरसाचे शोषण, उत्पन्नात घटअमरावती : जिल्ह्यातील सोयाबीनसह द्विदल धान्यपिकावर मागील दोन ते तीन वर्षांपासून ‘अमरवेल’ ही परोपकारी वेल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जवळपास सर्वच तालुक्यांत अमरवेलीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. यामध्ये रोपाच्या अन्नरसाचे शोषण होत असल्याने सरासरी उत्पादनात घट येते. पूर्णपणे नियंत्रणात आणणे कठीण असणाऱ्या या वेलीच्या निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यापैकी ३ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी ३० जुलैपर्यंत झाली आहे. यासोबतच तूर, मूग व उडीद यासारखी द्विदल पिकेही आहेत. या पिकावर ‘अमरवेल’ या घातक परोपजिवी तणाचा प्रादुर्भाव झाला आहे. जगभरात या अमरवेलीच्या १७० प्रजाती आढळून येतात. हे तण परोपजिवी असल्याने द्विदल पिकाप्रमाणेच, द्विदल तणावरदेखील त्यांचा जीवनचक्र पूर्ण करतात. बाल्यावस्थेत असताना ही वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीचे खोड तसेच पानावर चिकटते व जमिनीपासून विलग होते. त्यानंतर ती झाडावरील अन्नद्रव्ये सूक्ष्म दातासारख्या असणाऱ्या ‘होस्ट्ररिया’च्या सहाय्याने शोषूण घेतात. यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते. अमरवेलीमुळे १०० टक्के नुकसान झाल्याचीही उदाहरणे आहेत. ‘अमरवेल’ या परोपजिवी तणाचे नियंत्रण करण्यासाठी जगात अजूनपर्यंत हमखास योजना अस्तित्वात नाही. या वेलीचा बंदोबस्त करणे जिकरीचे काम आहे. एकाच पद्धतीचा अवलंब न करता एकात्मिक तण व्यवस्थापनाद्वारे याचे नियंत्रण करणे अनिवार्य ठरते. अमरवेलीच्या यशस्वीपणे व्यवस्थापन करताना प्रादुर्भावग्रस्त भागातील शेतकरी बांधवांनी तसेच ज्या गावांमधील ग्रामपंचायतीद्वारे सामूहिकरित्या पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. या अमवेलीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे कठीण आहे. मात्र सामूहिक प्रयत्नांनी प्रतिबंध करूशकतो. शेतकऱ्यांनी प्रादेशिक संशोधन केंद्राद्वारा सुचविलेल्या उपाययोजनांसाठी सामाजिक जनजागृती होणे गरजेचे आहे. - राजेंद्र जाणे, कृषिशास्त्रज्ञ.अमरवेल या परोपजिवी वेलीमुळे पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो. याविषयी संशोधन होणे महत्त्वाचे आहे. कृषी विभागाचे कुठलेही धोरण यासंदर्भात नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. या परोपजिवी तणामुळे द्विदल शेतीपिकांचे जे नुकसान होते त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी. - जहिरुद्दीन इनामदार, शेतकरी.