शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

घातक अमरवेलीच्या विळख्यात सोयाबीन

By admin | Updated: August 4, 2015 00:14 IST

जिल्ह्यातील सोयाबीनसह द्विदल धान्यपिकावर मागील दोन ते तीन वर्षांपासून ‘अमरवेल’ ही परोपकारी वेल मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

शेती पिकावर संकट : रोपांच्या अन्नरसाचे शोषण, उत्पन्नात घटअमरावती : जिल्ह्यातील सोयाबीनसह द्विदल धान्यपिकावर मागील दोन ते तीन वर्षांपासून ‘अमरवेल’ ही परोपकारी वेल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जवळपास सर्वच तालुक्यांत अमरवेलीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. यामध्ये रोपाच्या अन्नरसाचे शोषण होत असल्याने सरासरी उत्पादनात घट येते. पूर्णपणे नियंत्रणात आणणे कठीण असणाऱ्या या वेलीच्या निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यापैकी ३ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी ३० जुलैपर्यंत झाली आहे. यासोबतच तूर, मूग व उडीद यासारखी द्विदल पिकेही आहेत. या पिकावर ‘अमरवेल’ या घातक परोपजिवी तणाचा प्रादुर्भाव झाला आहे. जगभरात या अमरवेलीच्या १७० प्रजाती आढळून येतात. हे तण परोपजिवी असल्याने द्विदल पिकाप्रमाणेच, द्विदल तणावरदेखील त्यांचा जीवनचक्र पूर्ण करतात. बाल्यावस्थेत असताना ही वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीचे खोड तसेच पानावर चिकटते व जमिनीपासून विलग होते. त्यानंतर ती झाडावरील अन्नद्रव्ये सूक्ष्म दातासारख्या असणाऱ्या ‘होस्ट्ररिया’च्या सहाय्याने शोषूण घेतात. यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते. अमरवेलीमुळे १०० टक्के नुकसान झाल्याचीही उदाहरणे आहेत. ‘अमरवेल’ या परोपजिवी तणाचे नियंत्रण करण्यासाठी जगात अजूनपर्यंत हमखास योजना अस्तित्वात नाही. या वेलीचा बंदोबस्त करणे जिकरीचे काम आहे. एकाच पद्धतीचा अवलंब न करता एकात्मिक तण व्यवस्थापनाद्वारे याचे नियंत्रण करणे अनिवार्य ठरते. अमरवेलीच्या यशस्वीपणे व्यवस्थापन करताना प्रादुर्भावग्रस्त भागातील शेतकरी बांधवांनी तसेच ज्या गावांमधील ग्रामपंचायतीद्वारे सामूहिकरित्या पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. या अमवेलीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे कठीण आहे. मात्र सामूहिक प्रयत्नांनी प्रतिबंध करूशकतो. शेतकऱ्यांनी प्रादेशिक संशोधन केंद्राद्वारा सुचविलेल्या उपाययोजनांसाठी सामाजिक जनजागृती होणे गरजेचे आहे. - राजेंद्र जाणे, कृषिशास्त्रज्ञ.अमरवेल या परोपजिवी वेलीमुळे पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो. याविषयी संशोधन होणे महत्त्वाचे आहे. कृषी विभागाचे कुठलेही धोरण यासंदर्भात नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. या परोपजिवी तणामुळे द्विदल शेतीपिकांचे जे नुकसान होते त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी. - जहिरुद्दीन इनामदार, शेतकरी.