शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

सोयाबीन उद्ध्वस्त, तरीही आणेवारी ६९ !

By admin | Updated: October 1, 2015 00:15 IST

जिल्ह्यात ५० टक्क्यांवर पेरणीक्षेत्र असणारे सोयाबीनचे पीक पावसाअभावी आणि कीड, रोगांमुळे उद्ध्वस्त झाले असताना ...

 गजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात ५० टक्क्यांवर पेरणीक्षेत्र असणारे सोयाबीनचे पीक पावसाअभावी आणि कीड, रोगांमुळे उद्ध्वस्त झाले असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने ६९ पैसे इतक्या नजरअंदाज पैसेवारीचा अहवाल बुधवारी शासनाकडे पाठविला. यामुळे जिल्हा दुष्काळी स्थितीतून बाहेर पडला असल्याने हा महसूल विभागाचा तुघलकी निर्णय असल्याचा आरोेप शेतकरी करीत आहेत.प्रचलित ५० पैशांपेक्षा कमी अधिक उत्पन्नाच्या निकषाप्रमाणे सन २०१५-२०१६ या वर्षाकरिता जिल्ह्यातील १,९८१ गावांत ६९ पैसे इतक्या नजरअंदाज पैसेवारीचा हा अहवाल आहे. शासनाच्या १६ सप्टेंबरच्या आदेशान्वये ६७ पैशांपेक्षा कमी-अधिक निकषानुसार जिल्ह्याच्या ५९ पैसे नजरअंदाज पैसेवारीचा अहवाल १८ सप्टेंबरला जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता. त्यामुुळे ही दुष्काळजन्य स्थिती गृहित धरण्यात आली होती. परंतु शासनाने २३ सप्टेंबरला पैसेवारीचे सुधारीत निकष मागे घेऊन प्रचलित ५० पैशांपेक्षा कमी-अधिक या निकषाप्रमाणे पैसेवारी जाहीर करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला. त्यानुसार ३० सप्टेंबरला जिल्ह्याची ६९ पैसे इतकी पैसेवारी जाहीर करण्यात आली. या खरीप हंगामात पेरणीनंतर पावसाने मारलेली दडी त्यानंतर पुन्हा ३६ दिवसांचा प्रदीर्घ खंड, पिवळ्या मोझॅकचा अटॅक आदींमुळे सोयाबीनचे पीक संकटात आले आहे. या हंगामात सोयाबीनचे ५० टक्के क्षेत्र आहे. फुलोरावर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊस न पडल्याने सोयाबीनच्या शेंगा पोचट राहिल्यात.तुघलकी अंदाज : ५० पैशांचा प्रचलित निकषआठवड्यात फिरविला निर्णयकेंद्राकडून मदत मागविण्यासाठी शासनाने १५ सप्टेंबरला म्हणजेच १५ दिवसांपूर्वी पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक जिल्ह्यांचा समावेश दुष्काळीस्थितीत व्हावा, यासाठी ६७ पैशांपेक्षा कमी-अधिक असा निर्णय महसूल विभागाने घेतला. जिल्ह्याची पैसेवारी ५९ पैसे जाहीर झाली असताना सुधारित निकष मागे घेऊन २३ सप्टेंबरला ५० पैशांपेक्षा कमी-अधिक हा निकष जाहीर केला. अवघ्या १२ दिवसांत जिल्ह्याची पैसेवारी ही ५९ पैशांवरुन ६९ पैशांवर पोहोचली. यामुळे जिल्हा दुष्काळीस्थितीतून बाहेर पडला आहे. १५ नोव्हेंबरला सुधारित पैसेवारीजिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात आली. यानंतर खरीप पिकांसाठी पुन्हा १५ नोव्हेंबरला सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात येते व अंतिम पैसेवारी ही १५ जानेवारीला जाहीर करण्यात येते. त्यानुसार शासन दुष्काळीस्थितीचा निर्णय घेते.