शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

५ लाख एकरांतील सोयाबीन उद्ध्वस्त

By admin | Updated: September 13, 2016 00:15 IST

जिल्ह्यातील सव्वासात लाख एकरांतील सोयाबीनचे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.

सर्वेक्षण केव्हा ? : ३५ दिवसांपासून पावसात खंड; पीक विम्याचा लाभ मिळावागजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यातील सव्वासात लाख एकरांतील सोयाबीनचे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा स्थितीत सोयाबीन पावसाची नितांत गरज आहे. अन्यथा शेंगा पोचट राहून थेट उत्पादनावर परिणाम होतो. जिल्ह्यात मागील ३५ दिवसांपासून पावसाचा खंड आहे. पुढच्या तीन दिवसांत पाऊस न आल्यास संरक्षित सिंचनाची सोय असलेले क्षेत्र वगळता किमान ५ लाख एकरांतील सोयाबीन हातचे जाणार, अशी स्थिती उद्भवली आहे. जिल्ह्यात १ जूनपासून अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १११ टक्के पाऊस पडला. पेरणीपासून समाधानकारक व पोषक पाऊस असल्यामुळे सोयाबीनसह सर्वच पिके बहरात आली. सोयाबीन पीक सध्या शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. पाऊस आल्यास शेंगांमधील दाणा भरला जातो. पाऊस नसल्यास दाणा बारीक राहतो व थेट उत्पादनावर परिणाम होतो. जिल्ह्यात मात्र ७ आॅगस्टपासून पावसात खंड पडला आहे. त्यामुळे हलक्या व माध्यम स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीन पिकांनी माना टाकल्या अहेत. काळ्या जमिनीत किमान आठवडा निघू शकतो. मात्र, इतर जमिनीतील किमान २ लाख हेक्टरमधील सोयाबिनचे पीक पावसाअभावी आताच उद्धवस्त झाले आहे. उर्वरित ३ लाख हेक्टरमधील सरासरी उत्पन्नात येत्या तीन दिवसांत पाऊस न आल्यास किमान ५० टक्क्यांची घट येणार आहे. जिल्ह्यात साधारणपणे २ लाख हेक्टरमध्ये संरक्षित सिंचनाची सुविधा आहे. केवळ याच शेतकऱ्यांना सोयाबीनचे उत्पन्न होऊ शकते. कपाशीची मुळे खोलवर जात असल्याने पिके काही काळ तग धरु शकतात. मात्र, पाऊस न आल्यास कपाशीची स्थिती देखील विदारक होऊ शकते. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी ३ लाख २३ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र होते. या तुलनेत २ लाख ९१ हजार ३७ हेक्टर क्षेत्रात सोयाबिनची पेरणी झाली. शासनाच्या अहवालाकडे लक्षअमरावती : अंजनगावात १५ हजार ४२० हेक्टर, जिल्ह्यात खरिपाच्या एकूण सरासरी क्षेत्राच्या किमान ४० टक्के क्षेत्रात सोयाबनचे पीक आहे. यंदा सुरूवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु ३५ दिवसांपासून पावसात खंड पडल्यामुळे ३ वर्षांनुसार यंदाही सोयाबीन पीक हातचे जाणार, अशी स्थिती आहे. प्रतिकूल परिस्थितील घटकांमुळे पीकाचे नुकसान होत असल्यास हवामान घटकांचे आकडेवारीवरून प्राप्त होणाऱ्या छायाचित्रात अनुसरून राज्य शासनाकडील पीक बाधित क्षेत्राचा अवहाल, पर्जन्यमानाची व इतर कृषी हवामानविषयक आकडेवारी, प्रसारमाध्यमांचा अहवाल अशा प्रतिनिधीना निर्देशांकाच्या आधारे अपेक्षित नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के मर्यादेत नुकसान भरपाईची रक्कम आगाऊ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत हे निकष स्पष्ट केले असल्याने जिल्हा प्रशासनाचा वस्तुनिष्ट अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विमा योजनेच्या निकषात पावसात खंड घटक समाविष्ट यंदाच्या खरीप हंगामापासून सुरु करण्यात अलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच पूर, पावसातील खंड व दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास अपेक्षित नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेत नुकसान भरपाईची रक्कम आगाऊ देणार व ही नुकसान भरपाई अंतिम नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल. याबाबत राज्य शासन व संबंधित विमा कंपनीमार्फत कारवाई करण्यात येईल, असे या योजनेच्या वैशिष्ठात स्पष्ट असल्याने कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला पाहिजे. पीकाने ‘अन्टीथ्रेट’ अवस्था ओलांडली सोयाबीन हे ८५ ते १०५ दिवसांच्या कालावधीत पीक आहे. जूनमध्ये पेरणी झालेले सोयाबीनची स्थिती बरी आहे. परंतु जुलै महिन्यातील सोयाबीनला पावसाची आवश्यकता आहे. पावसात खंड असल्याने अधिक बास्पीभवन होऊ नये म्हणून सोयाबीनचे पाने दिवसा मलून होऊन पाठमोरा भाग समोर येतो ही ‘अन्टीथ्रेट’ अवस्था पावसाचा ताण सहान करण्यासाठी सोयाबीन रोप स्वताला तयार करते, आता अवस्थादेखील पार पडली आहे. येत्या तीन दिवसांत पाऊस न आल्यास सोयाबीनच्या शेंगा पोचट राहून याचा थेट असर सरासरी उत्पन्नावर होणार असल्याची माहिती प्रादेशिक अनुसंधान केंद्राचे शास्त्रज्ञ योगेश इंगळे यांनी दिली. अद्याप शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत, याविषयी जिल्हा प्रशासनाला अहवाल मागवितो. शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे शासनाचे धोरण आहे. - प्रवीण पोटे, पालकमंत्री.