शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

तालुक्यात फक्त चार मंडळांतच सोयाबीन पीक विमा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST

सोयाबीनच्या ६ हजार ६७४ विमाधारक शेतकऱ्यां पैकी,फक्त चार मंडळातील १ हजार ७५४ शेतकऱ्यांच मिळणार विमा तिन मंडळातील ४ हजार ...

सोयाबीनच्या ६ हजार ६७४ विमाधारक शेतकऱ्यां पैकी,फक्त चार मंडळातील १ हजार ७५४ शेतकऱ्यांच मिळणार विमा

तिन मंडळातील ४ हजार ९२० शेतकऱ्यांना विमा कंपनीने,निकषांचा आधार घेऊन विमा नाकारला

चांदूर बाजार : तालुक्यात गतवर्षी खरीप पिकाची पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत होती. त्यामुळे सोयाबीन शेतीत नुकसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळण्याची अपेक्षा होती. पीक विमा कंपनीने मात्र तालुक्यातील सातपैकी फक्त चार महसूल मंडळांतील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकासाठी विमा प्रस्ताव मंजूर केले आहेत.

तालुक्या गतवर्षी अंदाजे १६ हजार १४३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा होता. यापैकी ५१४५ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा शेतकऱ्यांनी काढला होता. यात तालुक्यातील ६ हजार ६७४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी १ हजार ७५४ शेतकऱ्यांनाच विमा कंपनीने विमा भरपाई मंजूर केली. विमा मंजूर केलेल्या मंडळांमध्ये चांदूर बाजार, करजगाव, शिरजगाव कसबा, तळेगाव मोहना हे चार महसूल मंडळ, तर विमा नाकारलेल्या मंडळांमध्ये आसेगाव, बेलोरा, ब्राम्हणवाडा थडी या तीन महसूल मंडळांचा समावेश आहे. या तीन महसूल मंडळांतील ४ हजार ९२० शेतकरी विम्यापासून वंचित आहेत.

सोयाबीनचा विमा नाकारलेल्या तीन मंडळापैकी आसेगाव मंडळात सोयाबीनचा पेरा ४ हजार ७५४ हेक्टरवर होता. पैकी २ हजार ५१८ हेक्टर क्षेत्रासाठी २ हजार ४७५ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. बेलोरा मंडळात सोयाबीनचा पेरा ४ हजार ८३० हेक्टर होता. पैकी १ हजार ३२४ हेक्टरसाठी १ हजार २३५ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. ब्राम्हणवाडा थडी मंडळात १ हजार १८६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. पैकी २१७ हेक्टरसाठी २११ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता.

विमा प्रस्ताव स्वीकारलेल्या चांदूर बाजार मंडळात ३ हजार ३९० क्षेत्रावर सोयाबीनच्या पेरा करण्यात आला होता. पैकी ९९२ हेक्टरसाठी ९४८ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. तळेगाव मोहना मंडळात १ हजार ६७२ हेक्टर सोयाबीन पेरा होता. पैकी ४११ हेक्टरसाठी ४३० शेतकऱ्यांनी विमा काढला होता. शिरजगाव कसबा मंडळात २७१ हेक्टर इतकाच सोयाबीन पेरा होता. पैकी २७० हेक्टरसाठी २८० शेतकऱ्यांनी विमा काढला होता. करंजगाव मंडळात फक्त १४० हेक्टरवरच सोयाबीन पेरा होता. पैकी ५७ हेक्टरसाठी ५२ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. या चार मंडळातील १ हजार ७५४ शेतकऱ्यांनाच पीक विम्याचा लाभ देण्याचा निर्णय पीक विमा कंपनीने घेतला आहे. शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव करणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात केंद्र व राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.