शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

तालुक्यात फक्त चार मंडळांतच सोयाबीन पीक विमा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST

सोयाबीनच्या ६ हजार ६७४ विमाधारक शेतकऱ्यां पैकी,फक्त चार मंडळातील १ हजार ७५४ शेतकऱ्यांच मिळणार विमा तिन मंडळातील ४ हजार ...

सोयाबीनच्या ६ हजार ६७४ विमाधारक शेतकऱ्यां पैकी,फक्त चार मंडळातील १ हजार ७५४ शेतकऱ्यांच मिळणार विमा

तिन मंडळातील ४ हजार ९२० शेतकऱ्यांना विमा कंपनीने,निकषांचा आधार घेऊन विमा नाकारला

चांदूर बाजार : तालुक्यात गतवर्षी खरीप पिकाची पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत होती. त्यामुळे सोयाबीन शेतीत नुकसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळण्याची अपेक्षा होती. पीक विमा कंपनीने मात्र तालुक्यातील सातपैकी फक्त चार महसूल मंडळांतील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकासाठी विमा प्रस्ताव मंजूर केले आहेत.

तालुक्या गतवर्षी अंदाजे १६ हजार १४३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा होता. यापैकी ५१४५ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा शेतकऱ्यांनी काढला होता. यात तालुक्यातील ६ हजार ६७४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी १ हजार ७५४ शेतकऱ्यांनाच विमा कंपनीने विमा भरपाई मंजूर केली. विमा मंजूर केलेल्या मंडळांमध्ये चांदूर बाजार, करजगाव, शिरजगाव कसबा, तळेगाव मोहना हे चार महसूल मंडळ, तर विमा नाकारलेल्या मंडळांमध्ये आसेगाव, बेलोरा, ब्राम्हणवाडा थडी या तीन महसूल मंडळांचा समावेश आहे. या तीन महसूल मंडळांतील ४ हजार ९२० शेतकरी विम्यापासून वंचित आहेत.

सोयाबीनचा विमा नाकारलेल्या तीन मंडळापैकी आसेगाव मंडळात सोयाबीनचा पेरा ४ हजार ७५४ हेक्टरवर होता. पैकी २ हजार ५१८ हेक्टर क्षेत्रासाठी २ हजार ४७५ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. बेलोरा मंडळात सोयाबीनचा पेरा ४ हजार ८३० हेक्टर होता. पैकी १ हजार ३२४ हेक्टरसाठी १ हजार २३५ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. ब्राम्हणवाडा थडी मंडळात १ हजार १८६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. पैकी २१७ हेक्टरसाठी २११ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता.

विमा प्रस्ताव स्वीकारलेल्या चांदूर बाजार मंडळात ३ हजार ३९० क्षेत्रावर सोयाबीनच्या पेरा करण्यात आला होता. पैकी ९९२ हेक्टरसाठी ९४८ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. तळेगाव मोहना मंडळात १ हजार ६७२ हेक्टर सोयाबीन पेरा होता. पैकी ४११ हेक्टरसाठी ४३० शेतकऱ्यांनी विमा काढला होता. शिरजगाव कसबा मंडळात २७१ हेक्टर इतकाच सोयाबीन पेरा होता. पैकी २७० हेक्टरसाठी २८० शेतकऱ्यांनी विमा काढला होता. करंजगाव मंडळात फक्त १४० हेक्टरवरच सोयाबीन पेरा होता. पैकी ५७ हेक्टरसाठी ५२ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. या चार मंडळातील १ हजार ७५४ शेतकऱ्यांनाच पीक विम्याचा लाभ देण्याचा निर्णय पीक विमा कंपनीने घेतला आहे. शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव करणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात केंद्र व राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.