शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

तालुक्यात फक्त चार मंडळांतच सोयाबीन पीक विमा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST

सोयाबीनच्या ६ हजार ६७४ विमाधारक शेतकऱ्यां पैकी,फक्त चार मंडळातील १ हजार ७५४ शेतकऱ्यांच मिळणार विमा तिन मंडळातील ४ हजार ...

सोयाबीनच्या ६ हजार ६७४ विमाधारक शेतकऱ्यां पैकी,फक्त चार मंडळातील १ हजार ७५४ शेतकऱ्यांच मिळणार विमा

तिन मंडळातील ४ हजार ९२० शेतकऱ्यांना विमा कंपनीने,निकषांचा आधार घेऊन विमा नाकारला

चांदूर बाजार : तालुक्यात गतवर्षी खरीप पिकाची पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत होती. त्यामुळे सोयाबीन शेतीत नुकसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळण्याची अपेक्षा होती. पीक विमा कंपनीने मात्र तालुक्यातील सातपैकी फक्त चार महसूल मंडळांतील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकासाठी विमा प्रस्ताव मंजूर केले आहेत.

तालुक्या गतवर्षी अंदाजे १६ हजार १४३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा होता. यापैकी ५१४५ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा शेतकऱ्यांनी काढला होता. यात तालुक्यातील ६ हजार ६७४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी १ हजार ७५४ शेतकऱ्यांनाच विमा कंपनीने विमा भरपाई मंजूर केली. विमा मंजूर केलेल्या मंडळांमध्ये चांदूर बाजार, करजगाव, शिरजगाव कसबा, तळेगाव मोहना हे चार महसूल मंडळ, तर विमा नाकारलेल्या मंडळांमध्ये आसेगाव, बेलोरा, ब्राम्हणवाडा थडी या तीन महसूल मंडळांचा समावेश आहे. या तीन महसूल मंडळांतील ४ हजार ९२० शेतकरी विम्यापासून वंचित आहेत.

सोयाबीनचा विमा नाकारलेल्या तीन मंडळापैकी आसेगाव मंडळात सोयाबीनचा पेरा ४ हजार ७५४ हेक्टरवर होता. पैकी २ हजार ५१८ हेक्टर क्षेत्रासाठी २ हजार ४७५ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. बेलोरा मंडळात सोयाबीनचा पेरा ४ हजार ८३० हेक्टर होता. पैकी १ हजार ३२४ हेक्टरसाठी १ हजार २३५ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. ब्राम्हणवाडा थडी मंडळात १ हजार १८६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. पैकी २१७ हेक्टरसाठी २११ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता.

विमा प्रस्ताव स्वीकारलेल्या चांदूर बाजार मंडळात ३ हजार ३९० क्षेत्रावर सोयाबीनच्या पेरा करण्यात आला होता. पैकी ९९२ हेक्टरसाठी ९४८ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. तळेगाव मोहना मंडळात १ हजार ६७२ हेक्टर सोयाबीन पेरा होता. पैकी ४११ हेक्टरसाठी ४३० शेतकऱ्यांनी विमा काढला होता. शिरजगाव कसबा मंडळात २७१ हेक्टर इतकाच सोयाबीन पेरा होता. पैकी २७० हेक्टरसाठी २८० शेतकऱ्यांनी विमा काढला होता. करंजगाव मंडळात फक्त १४० हेक्टरवरच सोयाबीन पेरा होता. पैकी ५७ हेक्टरसाठी ५२ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. या चार मंडळातील १ हजार ७५४ शेतकऱ्यांनाच पीक विम्याचा लाभ देण्याचा निर्णय पीक विमा कंपनीने घेतला आहे. शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव करणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात केंद्र व राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.