शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात ४ हजार हेक्टरमधील सोयाबीन दडपले

By admin | Updated: July 24, 2014 23:39 IST

तालुक्यात गेल्या तीन दिवसांत पडलेल्या पावसाने दीड हजार हेक्टरमधील शेतीत पाणी साचले, तर चार हजार हेक्टरातील सोयाबीन पूर्णत: दडपडले आहे. पूर्वी कमी पावसाने तर आता झालेल्या

धामणगाव(रेल्वे) : तालुक्यात गेल्या तीन दिवसांत पडलेल्या पावसाने दीड हजार हेक्टरमधील शेतीत पाणी साचले, तर चार हजार हेक्टरातील सोयाबीन पूर्णत: दडपडले आहे. पूर्वी कमी पावसाने तर आता झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार संकट ओढवले आहे़तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ५५ हजार ५४० हेक्टर असून आतापर्यंत सोयाबीन १७ हजार ४७ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे़ कापूस १८ हजार ३६५ टक्के पेरणी आटोपली आहे़ तर तुरीची पेरणी ४ हजार ४६२ हेक्टरमध्ये झाली आहे़ धामणगाव तालुक्यात गत तीन दिवसांत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे़ दीडशे घरांत पावसाचे पाणी शिरले तर नदी काठावरील असलेल्या शेत जमिनीतील पिके मातीसह खरडून गेली. तालुका प्रशासनाने अहवाल तयार करण्याला सुरूवात केली असली तरी शासनाच्यावतीने कोणत्याही नदी काठावर आपादग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांचा मोबदला मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़अधिक पावसामुळे वर्धा, चंद्रभागा मोती कोळसा, खोलाड, विदर्भ या नद्यांना आलेला महापूर तसेच बगाजी सागर धरणातील सोडलेल्या पाण्यामुळे दीड हजार हेक्टरमध्ये पाणी साचले. गुरुवारपर्यंत शेतात पाण्याचे डबके साचले आहेत़ चिंचपूर, शिदोडी या पुर्नवसित गावांची स्थिती अधिक बिकट आहे़ मागील दहा वर्षांत कमी उत्पन्न व दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली होती़ यंदा कधी कमी व कधी अधिक पाऊस शेतकऱ्यांच्या जिवावर उठणारा आहे़ शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे़ (तालुका प्रतिनिधी)