शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

फुलोऱ्यावरील सोयाबीनची फुलगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:38 IST

खरिपात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेला सोयाबीन आता फुलोºयावर आहे. चार वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळाला. मात्र, दोन आठवड्यांपासून पावसाचा ताण असल्याने, फुलगळ होत आहे.

ठळक मुद्देउत्पादनात घट होण्याची भीती : बाष्परोधकाची फवारणी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरिपात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेला सोयाबीन आता फुलोºयावर आहे. चार वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळाला. मात्र, दोन आठवड्यांपासून पावसाचा ताण असल्याने, फुलगळ होत आहे. त्यामुळे सरासरी उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.वास्तविक सोयाबीन हे मध्यप्रदेश येथील पीक. परंतु, या दशकात वऱ्हाडात खरिपाच्या कॅश क्रापची जागा घेतल्याने कपाशी माघारली. सोयाबीनला बाजारात वाढती मागणी आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा यावर निश्चित फरक पडतो. गतवर्षी बोंडअळीने दोन लाख हेक्टरमधील कपाशी उद्धवस्त झाल्याने यंदा सोयाबीनची क्षेत्रवाढ झाली. यंदाच्या खरिपात साधारणत: दोन लाख ९३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक आहे. जिल्ह्यात यंदा ६ लाख ८० हजार हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी झाल्याने एकूण क्षेत्राच्या ४५ टक्के सोयाबीन आहे. आतापर्यत सोयाबीनची वाढही चांगली झाली. १०० ते ११० दिवसांचे हे पीक ४५ दिवसांननंतर आता फुलोऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपासून पावसात खंड आहे. त्यातही ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे फुलोराचे रुपांतर शेंगामध्ये होण्याऐवजी फुलगळ होण्याचा धोका अधिक आहे. शेंगा पकडल्याच तर त्यामधील दाणा बारीक राहण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारात पिकाचे उत्पन्नात २५ ते ४० टक्के घट येण्याची शक्यता असल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पावसाने पळविले आहे.फुलोºयावर अन् शेंगा भरताना पाऊस आवश्यकसोयाबीनचे पीक पावसाला अतिसंवेदनशील आहे. पीक फुलोºयावर असताना पावसाची आवश्यकता असते. अन्यथा फुलोर गळून पडतो. तसेच सोबीनच्या शेंगा पक्वहोण्याच्या कालावधीत पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा शेंगा पोचट राहून दानादेखील बारीक पडतो. यामुळे पिकाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात तूट येते. संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यास पाण्याची पाळी देणे गरजेचे असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले.अन्यथा नुकसान होण्याची शक्यताजिल्ह्यातील सोयाबीन सध्या फुलोऱ्यावर आहे. मात्र, पावसाचा खंड असल्याने पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५) याची १०० लिटर पाण्यात १ किलो अशी फवारणी आवश्यक आहे. हे बाष्परोधक व न्युट्रीएंटचे काम करीत असल्याने किमान १५ दिवस तरी पावसाचा ताण पीक सहन करू शकते, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषीशास्त्रज्ञ योगेश इंगळे यांनी सांगितले.