शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

फुलोऱ्यावरील सोयाबीनची फुलगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:38 IST

खरिपात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेला सोयाबीन आता फुलोºयावर आहे. चार वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळाला. मात्र, दोन आठवड्यांपासून पावसाचा ताण असल्याने, फुलगळ होत आहे.

ठळक मुद्देउत्पादनात घट होण्याची भीती : बाष्परोधकाची फवारणी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरिपात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेला सोयाबीन आता फुलोºयावर आहे. चार वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळाला. मात्र, दोन आठवड्यांपासून पावसाचा ताण असल्याने, फुलगळ होत आहे. त्यामुळे सरासरी उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.वास्तविक सोयाबीन हे मध्यप्रदेश येथील पीक. परंतु, या दशकात वऱ्हाडात खरिपाच्या कॅश क्रापची जागा घेतल्याने कपाशी माघारली. सोयाबीनला बाजारात वाढती मागणी आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा यावर निश्चित फरक पडतो. गतवर्षी बोंडअळीने दोन लाख हेक्टरमधील कपाशी उद्धवस्त झाल्याने यंदा सोयाबीनची क्षेत्रवाढ झाली. यंदाच्या खरिपात साधारणत: दोन लाख ९३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक आहे. जिल्ह्यात यंदा ६ लाख ८० हजार हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी झाल्याने एकूण क्षेत्राच्या ४५ टक्के सोयाबीन आहे. आतापर्यत सोयाबीनची वाढही चांगली झाली. १०० ते ११० दिवसांचे हे पीक ४५ दिवसांननंतर आता फुलोऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपासून पावसात खंड आहे. त्यातही ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे फुलोराचे रुपांतर शेंगामध्ये होण्याऐवजी फुलगळ होण्याचा धोका अधिक आहे. शेंगा पकडल्याच तर त्यामधील दाणा बारीक राहण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारात पिकाचे उत्पन्नात २५ ते ४० टक्के घट येण्याची शक्यता असल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पावसाने पळविले आहे.फुलोºयावर अन् शेंगा भरताना पाऊस आवश्यकसोयाबीनचे पीक पावसाला अतिसंवेदनशील आहे. पीक फुलोºयावर असताना पावसाची आवश्यकता असते. अन्यथा फुलोर गळून पडतो. तसेच सोबीनच्या शेंगा पक्वहोण्याच्या कालावधीत पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा शेंगा पोचट राहून दानादेखील बारीक पडतो. यामुळे पिकाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात तूट येते. संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यास पाण्याची पाळी देणे गरजेचे असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले.अन्यथा नुकसान होण्याची शक्यताजिल्ह्यातील सोयाबीन सध्या फुलोऱ्यावर आहे. मात्र, पावसाचा खंड असल्याने पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५) याची १०० लिटर पाण्यात १ किलो अशी फवारणी आवश्यक आहे. हे बाष्परोधक व न्युट्रीएंटचे काम करीत असल्याने किमान १५ दिवस तरी पावसाचा ताण पीक सहन करू शकते, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषीशास्त्रज्ञ योगेश इंगळे यांनी सांगितले.