शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

फुलोऱ्यावरील सोयाबीनची फुलगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:38 IST

खरिपात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेला सोयाबीन आता फुलोºयावर आहे. चार वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळाला. मात्र, दोन आठवड्यांपासून पावसाचा ताण असल्याने, फुलगळ होत आहे.

ठळक मुद्देउत्पादनात घट होण्याची भीती : बाष्परोधकाची फवारणी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरिपात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेला सोयाबीन आता फुलोºयावर आहे. चार वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळाला. मात्र, दोन आठवड्यांपासून पावसाचा ताण असल्याने, फुलगळ होत आहे. त्यामुळे सरासरी उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.वास्तविक सोयाबीन हे मध्यप्रदेश येथील पीक. परंतु, या दशकात वऱ्हाडात खरिपाच्या कॅश क्रापची जागा घेतल्याने कपाशी माघारली. सोयाबीनला बाजारात वाढती मागणी आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा यावर निश्चित फरक पडतो. गतवर्षी बोंडअळीने दोन लाख हेक्टरमधील कपाशी उद्धवस्त झाल्याने यंदा सोयाबीनची क्षेत्रवाढ झाली. यंदाच्या खरिपात साधारणत: दोन लाख ९३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक आहे. जिल्ह्यात यंदा ६ लाख ८० हजार हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी झाल्याने एकूण क्षेत्राच्या ४५ टक्के सोयाबीन आहे. आतापर्यत सोयाबीनची वाढही चांगली झाली. १०० ते ११० दिवसांचे हे पीक ४५ दिवसांननंतर आता फुलोऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपासून पावसात खंड आहे. त्यातही ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे फुलोराचे रुपांतर शेंगामध्ये होण्याऐवजी फुलगळ होण्याचा धोका अधिक आहे. शेंगा पकडल्याच तर त्यामधील दाणा बारीक राहण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारात पिकाचे उत्पन्नात २५ ते ४० टक्के घट येण्याची शक्यता असल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पावसाने पळविले आहे.फुलोºयावर अन् शेंगा भरताना पाऊस आवश्यकसोयाबीनचे पीक पावसाला अतिसंवेदनशील आहे. पीक फुलोºयावर असताना पावसाची आवश्यकता असते. अन्यथा फुलोर गळून पडतो. तसेच सोबीनच्या शेंगा पक्वहोण्याच्या कालावधीत पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा शेंगा पोचट राहून दानादेखील बारीक पडतो. यामुळे पिकाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात तूट येते. संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यास पाण्याची पाळी देणे गरजेचे असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले.अन्यथा नुकसान होण्याची शक्यताजिल्ह्यातील सोयाबीन सध्या फुलोऱ्यावर आहे. मात्र, पावसाचा खंड असल्याने पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५) याची १०० लिटर पाण्यात १ किलो अशी फवारणी आवश्यक आहे. हे बाष्परोधक व न्युट्रीएंटचे काम करीत असल्याने किमान १५ दिवस तरी पावसाचा ताण पीक सहन करू शकते, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषीशास्त्रज्ञ योगेश इंगळे यांनी सांगितले.