शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सहा लाख हेक्टरांतील पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: July 1, 2017 00:05 IST

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ९७ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली.

पावसाने पळविले तोंडचे पाणी : ३० हजार हेक्टरमध्ये दुबार पेरणीची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ९७ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. मात्र, जिल्ह्यात मान्सूनचा दमदार पाऊस नसल्यामुळे किमान ३० ते ४० हजार हेक्टरमधील पेरण्यांना मोड येण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांत पाऊस न आल्यास ५० ते ६० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे.यंदाही पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. रोहिणी पाठोपाठ मृगनक्षत्रदेखील कोरडे गेले. आर्द्रावर शेतकऱ्यांची मदार असताना आठ दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या. पावसाने हुलकावणी दिली. हवामान खात्याने मान्सून सक्रिय होणार असल्याचे सांगितले असले तरी जोवर १०० मिमी पाऊस होत नाही, तोवर पेरण्या करू नयेत, असा कृषी विभागाचा सल्ला आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यात ९७ हजार ३५५ हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या. ही १३.४ टक्केवारी आहे. यामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४९० हेक्टर, अचलपूर तालुक्यात दोन हजार १९२ हेक्टर, चांदूरबाजार तालुक्यात ७,७५५ हेक्टर, धामणगाव रेल्वे तालुक्यात १४ हजार ८३४ हेक्टर, चांदूररेल्वे तालुक्यात ३३७ हेक्टर, तिवसा तालुक्यात ११ हजार ३७२ हेक्टर, मोर्शी तालुक्यात १९ हजार ९२ हेक्टर, वरूड तालुक्यात तीन हजार ५८८ हेक्टर,व दर्यापूर तालुक्यात दोन हजार ६८३ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली.जिल्ह्यात जून महिन्यात किमान १४६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र ९६.५ मिमी पाऊस पडला. प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची ६६.१ टक्केवारी आहे तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा ११.८ टक्केच पाऊस आहे. २४ तासांत जिल्ह्यात ५.६ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक २९.९ मिमी तिवसा तालुक्यात व १२.९ मिमी नांदगाव तालुक्यात पडला.अशी झाली पिकनिहाय पेरणीजिल्ह्यात सद्यस्थितीत ९७ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन ३१ हजार ७४७ हेक्टर, कापूस ३७ हजार २३३ हेक्टर, तूर १५ हजार ९० हेक्टर, धान ३ हजार ९१९ हेक्टर, ज्वार ४ हजार ४३५ हेक्टर, मका २ हजार ४७० हेक्टर, मूग १ हजार ५६७ हेक्टर, उडिद ५७० हेक्टर, भुईमूग ७४ हेक्टर व तिळाची ३७ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.मूग, उडदाचे क्षेत्र होणार बादपाऊस बेपत्ता असल्यामुळे खरिपातील अल्पावधीच्या म्हणजेच ६० दिवसांचा कालावधी असणारे मूग व उडदाचे पीक बाद होण्याची शक्यता आहे. ही दोन्ही पिके सोयाबीनच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. पावसाची दडी अधिक असल्यास ही पिके कपाशीच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता अधिक आहे. विदर्भात तूर्तास सार्वत्रिक पाऊस नाहीअमरावती : अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या उत्तम वाटचालीसाठी हवामानशास्त्रावर आधारित परिस्थिती योग्य आहे. परंतु अरबी समुद्रामधून ढगांचा प्रवाह कमी प्रमाणात होत असल्यामुळे पश्चिम विदर्भात अद्यापही मान्सूनची स्थिती कमकुवत असल्याचे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते, सौराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वारे ४.५ किमी.उंचीवर आहेत. येथून मध्य-पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तर मध्यप्रदेश व उत्तर छत्तीसगड, उत्तर ओडिसाकडे ओढला जात असल्याने पावसाळी मेघ मोठ्या प्रमाणात उत्तरेकडे खेचले जात आहेत. उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहात असून त्याच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात बरा पाऊस पडत आहे. पश्चिम विदर्भात विखुरलेला पाऊस पडत आहे.