शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

सहा लाख हेक्टरांतील पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: July 1, 2017 00:05 IST

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ९७ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली.

पावसाने पळविले तोंडचे पाणी : ३० हजार हेक्टरमध्ये दुबार पेरणीची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ९७ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. मात्र, जिल्ह्यात मान्सूनचा दमदार पाऊस नसल्यामुळे किमान ३० ते ४० हजार हेक्टरमधील पेरण्यांना मोड येण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांत पाऊस न आल्यास ५० ते ६० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे.यंदाही पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. रोहिणी पाठोपाठ मृगनक्षत्रदेखील कोरडे गेले. आर्द्रावर शेतकऱ्यांची मदार असताना आठ दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या. पावसाने हुलकावणी दिली. हवामान खात्याने मान्सून सक्रिय होणार असल्याचे सांगितले असले तरी जोवर १०० मिमी पाऊस होत नाही, तोवर पेरण्या करू नयेत, असा कृषी विभागाचा सल्ला आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यात ९७ हजार ३५५ हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या. ही १३.४ टक्केवारी आहे. यामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४९० हेक्टर, अचलपूर तालुक्यात दोन हजार १९२ हेक्टर, चांदूरबाजार तालुक्यात ७,७५५ हेक्टर, धामणगाव रेल्वे तालुक्यात १४ हजार ८३४ हेक्टर, चांदूररेल्वे तालुक्यात ३३७ हेक्टर, तिवसा तालुक्यात ११ हजार ३७२ हेक्टर, मोर्शी तालुक्यात १९ हजार ९२ हेक्टर, वरूड तालुक्यात तीन हजार ५८८ हेक्टर,व दर्यापूर तालुक्यात दोन हजार ६८३ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली.जिल्ह्यात जून महिन्यात किमान १४६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र ९६.५ मिमी पाऊस पडला. प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची ६६.१ टक्केवारी आहे तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा ११.८ टक्केच पाऊस आहे. २४ तासांत जिल्ह्यात ५.६ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक २९.९ मिमी तिवसा तालुक्यात व १२.९ मिमी नांदगाव तालुक्यात पडला.अशी झाली पिकनिहाय पेरणीजिल्ह्यात सद्यस्थितीत ९७ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन ३१ हजार ७४७ हेक्टर, कापूस ३७ हजार २३३ हेक्टर, तूर १५ हजार ९० हेक्टर, धान ३ हजार ९१९ हेक्टर, ज्वार ४ हजार ४३५ हेक्टर, मका २ हजार ४७० हेक्टर, मूग १ हजार ५६७ हेक्टर, उडिद ५७० हेक्टर, भुईमूग ७४ हेक्टर व तिळाची ३७ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.मूग, उडदाचे क्षेत्र होणार बादपाऊस बेपत्ता असल्यामुळे खरिपातील अल्पावधीच्या म्हणजेच ६० दिवसांचा कालावधी असणारे मूग व उडदाचे पीक बाद होण्याची शक्यता आहे. ही दोन्ही पिके सोयाबीनच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. पावसाची दडी अधिक असल्यास ही पिके कपाशीच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता अधिक आहे. विदर्भात तूर्तास सार्वत्रिक पाऊस नाहीअमरावती : अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या उत्तम वाटचालीसाठी हवामानशास्त्रावर आधारित परिस्थिती योग्य आहे. परंतु अरबी समुद्रामधून ढगांचा प्रवाह कमी प्रमाणात होत असल्यामुळे पश्चिम विदर्भात अद्यापही मान्सूनची स्थिती कमकुवत असल्याचे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते, सौराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वारे ४.५ किमी.उंचीवर आहेत. येथून मध्य-पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तर मध्यप्रदेश व उत्तर छत्तीसगड, उत्तर ओडिसाकडे ओढला जात असल्याने पावसाळी मेघ मोठ्या प्रमाणात उत्तरेकडे खेचले जात आहेत. उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहात असून त्याच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात बरा पाऊस पडत आहे. पश्चिम विदर्भात विखुरलेला पाऊस पडत आहे.